शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

दुष्काळग्रस्तांना रोज ६० हजार लिटर पाणी

By admin | Updated: April 26, 2016 00:26 IST

रामकृष्ण मठाची सामाजिक बांधिलकी : पेडगाव, मांडवे, तडवळेत टँकरची सेवा

सातारा : कमी पर्जन्यमान व दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेमुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी जलस्त्रोत आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बळीराजाची ही अवस्था पाहून त्यांना दिलासा देण्यासाठी रामकृष्ण मठ, पुणे यांच्यामार्फत सातारा जिल्ह्यात दुष्काळी भागात खटाव तालुक्यातील पेडगाव, मांडवे, तडवळे या गावांत पाणी टँकर सुरू करण्यात आले आहे.या सेवेचा प्रारंभ नायब तहसीलदार सुधाकर धार्इंजे यांच्या हस्ते करण्यात आला. या तीन गावांतील साधारण ९००० लोकांना दररोज ६० हजार लिटर पाण्याचे वाटप करण्यात येणार असून, हे सेवाकार्य जून २०१६ अखेर चालणार आहे. रामकृष्ण सेवा मंडळ, सातारा यांच्या सहकार्याने हे सेवा कार्य चालणार आहे.या कार्यास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, वडूज तहसीलदार अमोल कांबळे यांनी सहकार्य केल्याचे मंडळाचे कार्यवाह नंदकुमार सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी पेडगाव, मांडवे, तडवळे गावचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ, रामकृष्ण सेवा मंडळ साताऱ्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खटाव तालुक्यातील पेडगाव, मांडवे व तडवळे येथे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांना तसेच शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रामकृष्ण मठाच्या वतीने या तीन्ही गावांमध्ये पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्या आनंदाचे वातावरण आहे. जून महिन्यापर्यंत हे टॅँकर सुरू राहणार आहेत. (प्रतिनिधी)