शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

जनावरांनाही बसतोय दुष्काळी चटका!

By admin | Updated: February 2, 2016 01:02 IST

उन्हामुळे गवत करपले : चारा छावण्या सुरू करा; माण-खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, जाशी सह परिसरात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसानंतर पुन्हा पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपाचा हंगामही वाया गेला. जनावरांसाठी चाराही नाही. अपुऱ्या पावसामुळे ज्वारीची वाढच झाली नसल्याने अपुरे वाढलेले ज्वारीचे बाटुक किती दिवस पुरणार, असा प्रश्न आता पशुपालकांसमोर उभा आहे. माण व खटाव तालुका परिसरात सकाळ, संध्याकाळ ऊसवाड्याच्या गाड्या फिरू लागल्या आहेत. अव्वाच्या सव्वा दराने ऊस विकला जात आहे; पण तेही घेणं आता सर्वसामान्यांना परवडत नाही. सहा रुपयांना एक पेंडी विकली जात असली, तरी त्यामध्ये सात ते आठच वाडे असतात. त्यामुळे रोजचा शंभर ते दीडशे रुपये एका जनावराला खर्च करणे सामान्य पशुपालकाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परिसरातील शेळ्या-मेंढ्यापालकही मेटाकुटीला आले आहेत. पावसाअभावी दिवसेंदिवस माळरानही ओसाड, भकास दिसत आहेत. गवताच्या वाळून गेलेल्या काड्या कुरतडत माळावर जनावरे चाऱ्यासाठी फिरत आहेत. उन्हाच्या झळा बसू लागल्याने या भागात पाणी टंचाईचे संकट मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या भयाण परिस्थितीला तोंड देण्याऐवजी आत्ताच जनावरे विकली, तर किमान ती शेतकऱ्यांच्या दावणीला तरी जातील. या भाबड्या समजुतीने जनावरांचे हाल पाहावत नसल्याने पशुपालक जनावरांना मिळेल त्या किमतीला बाजारात विकत आहे. चारा नसल्याने ज्या शेतकऱ्यांकडे तीन-चार जनावरे होती तेथे आता फक्त एखादेच जनावर दिसत आहे. (वार्ताहर) एका पेंडीला आठ रुपये माण तालुक्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा बिकट बनला आहे. उन्हामुळे माळरानावर गवतही राहिले नाही. शेतकरी जनावरांसाठी उसाचे वाडे विकत घेत आहेत. मात्र, वाड्याच्या एका पेंडीला सात ते आठ रुपये मोजावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना एका जनावरासाठी दिवसाकाठी शंभर ते दीडशे रुपये खर्च येत असून तो परवडणारा नाही. चारा छावणी सुरू करण्याची मागणी होत आहे.