शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:49 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याचा गाजावाजा करत दुष्काळ लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. ‘घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ,’ ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याचा गाजावाजा करत दुष्काळ लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. ‘घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ,’ अशी जणू ही परिस्थिती आहे.संपूर्ण एप्रिल महिन्यात उन्हाळ्याने भलतेच हैराण केले. आता मे महिन्याच्या तोंडावर पोहोचल्यानंतर पुढे काय होईल, याची धास्ती सर्वांनाच लागून राहिली आहे. अनेक गावे टंचाईग्रस्त झाली आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ दुष्काळी जनतेवर आली आहे. केवळ माण, खटावमध्येच नव्हे तर फलटण, कोरेगाव, खंडाळा इतकंच काय तर पावसाचे आगर असणाºया वाई, महाबळेश्वर आणि जावळी या तालुक्यांतही पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी जास्त लागते तसेच जनावरांना जगवितानाही शेतकºयांची त्रेधा उडताना पाहायला मिळत आहे. बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे. शेततळी कोरडी पडू लागली आहेत.या परिस्थितीत प्रशासन केवळ आकडेवारी करत दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ फिरविताना दिसत आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव येत असतानाही प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू...कलेढोण परिसरातील लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.चार ते पाच दिवसांत टँकर सुरू न केल्यास तहसीलदारकार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाआहे. गारुडी, हिवरवाडी, ढोकळवाडी, अनफळ, कान्हरवाडी, पाचवड, औतरवाडी, विखळे गावांतील लोकांची पिण्याचे पाण्यासाठी टँकरसुरू करावी, अशी मागणी गेल्या फेब्रुवारीपासून सुरू आहे. पंचायतसमिती सदस्या मेघाताई पुकळे यांनी गटविकास अधिकारी तसेचतहसीलदार, प्रांताधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन टँकरची मागणी केली. त्यासाठी पाठपुरावाही केला; परंतु तरीही एकाही गावात टँकर सुरू नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.बोअरचे पाणी आटले; टॅँकरच्या मंजुरीला मिळेना मुहूर्त...अनफळे, ता. खटाव येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू असून, पाण्याचा एकमेव आधार असलेल्या बोअरवेलचे पाणीसुद्धा दोन महिन्यांपूर्वी आटले आहे. सध्या येथील खंडोबा मंदिरालगत असलेल्या बोअरवेलमधून सकाळी अर्धा तासच पाणी ग्रामस्थांना मिळत असून, एका कुटुंबाला केवळ चार ते पाच घागरी पाणी मिळत आहे. ग्रामपंचायतीने गेल्या दीड महिन्यापूर्वी शासन दरबारी टँकरची मागणी केली असून, अद्यापही टँकर मंजुरीला मुहूर्त मिळाला नाही.प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे संतापखटाव-माणमधील अनेक गावे तहानेने व्याकूळ असताना प्रशासन मात्र वेळकाढूपणा करीत आहे. टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवणारे अधिकारी आता टंचाईच्या प्रस्तावात त्रुटी काढून टँकर सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून, जीव गेल्यावर टँकर सुरू करणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे. यंदा खटाव व माणमधील सुमारे ७० ते ८० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांनी टँकर सुरू होण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेत. मात्र, दोन महिन्यांपासून ते शासन दरबारी धूळखात पडलेत.