शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:49 IST

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याचा गाजावाजा करत दुष्काळ लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. ‘घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ,’ ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याला उन्हाच्या झळांनी हैराण केले आहे. त्यातच आग ओकणाऱ्या सूर्यामुळे जमिनीतील उपलब्ध पाणीही मोठ्या प्रमाणावर शोषून घेतले जात आहे. या परिस्थितीत दुष्काळावर मात करण्याऐवजी जिल्हा प्रशासन मात्र पाणी साठल्याचा गाजावाजा करत दुष्काळ लपवायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. ‘घशाला कोरड अन् मृगजळाची भुरळ,’ अशी जणू ही परिस्थिती आहे.संपूर्ण एप्रिल महिन्यात उन्हाळ्याने भलतेच हैराण केले. आता मे महिन्याच्या तोंडावर पोहोचल्यानंतर पुढे काय होईल, याची धास्ती सर्वांनाच लागून राहिली आहे. अनेक गावे टंचाईग्रस्त झाली आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ दुष्काळी जनतेवर आली आहे. केवळ माण, खटावमध्येच नव्हे तर फलटण, कोरेगाव, खंडाळा इतकंच काय तर पावसाचे आगर असणाºया वाई, महाबळेश्वर आणि जावळी या तालुक्यांतही पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी जास्त लागते तसेच जनावरांना जगवितानाही शेतकºयांची त्रेधा उडताना पाहायला मिळत आहे. बोअरवेल, विहिरींनी तळ गाठला आहे. शेततळी कोरडी पडू लागली आहेत.या परिस्थितीत प्रशासन केवळ आकडेवारी करत दुष्काळग्रस्तांच्या जखमांवर मीठ फिरविताना दिसत आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव येत असतानाही प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे.पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू...कलेढोण परिसरातील लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.चार ते पाच दिवसांत टँकर सुरू न केल्यास तहसीलदारकार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाआहे. गारुडी, हिवरवाडी, ढोकळवाडी, अनफळ, कान्हरवाडी, पाचवड, औतरवाडी, विखळे गावांतील लोकांची पिण्याचे पाण्यासाठी टँकरसुरू करावी, अशी मागणी गेल्या फेब्रुवारीपासून सुरू आहे. पंचायतसमिती सदस्या मेघाताई पुकळे यांनी गटविकास अधिकारी तसेचतहसीलदार, प्रांताधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन टँकरची मागणी केली. त्यासाठी पाठपुरावाही केला; परंतु तरीही एकाही गावात टँकर सुरू नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे.बोअरचे पाणी आटले; टॅँकरच्या मंजुरीला मिळेना मुहूर्त...अनफळे, ता. खटाव येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू असून, पाण्याचा एकमेव आधार असलेल्या बोअरवेलचे पाणीसुद्धा दोन महिन्यांपूर्वी आटले आहे. सध्या येथील खंडोबा मंदिरालगत असलेल्या बोअरवेलमधून सकाळी अर्धा तासच पाणी ग्रामस्थांना मिळत असून, एका कुटुंबाला केवळ चार ते पाच घागरी पाणी मिळत आहे. ग्रामपंचायतीने गेल्या दीड महिन्यापूर्वी शासन दरबारी टँकरची मागणी केली असून, अद्यापही टँकर मंजुरीला मुहूर्त मिळाला नाही.प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे संतापखटाव-माणमधील अनेक गावे तहानेने व्याकूळ असताना प्रशासन मात्र वेळकाढूपणा करीत आहे. टंचाई जाहीर झाली नसल्याचे तुणतुणे वाजवणारे अधिकारी आता टंचाईच्या प्रस्तावात त्रुटी काढून टँकर सुरू करण्यास चालढकल करीत आहेत. असंवेदनशील प्रशासनाविरुद्ध नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असून, जीव गेल्यावर टँकर सुरू करणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे. यंदा खटाव व माणमधील सुमारे ७० ते ८० गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. संबंधित गावांनी टँकर सुरू होण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेत. मात्र, दोन महिन्यांपासून ते शासन दरबारी धूळखात पडलेत.