शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

दुष्काळाची झळ; पण आल्यानं दिलं बळ!

By admin | Updated: September 7, 2015 20:59 IST

जाधववाडी : बेभरवशाच्या पर्जन्यावर मात करत अर्थशास्त्र पदवीधराची शेतीत कमाल

शेतीशिवाय मजा नाय’ या वाक्यानुसार तरुण शेतकऱ्याची आपली माती व शेतीबद्दल असणारा जिव्हाळा. तसेच ज्या क्षेत्रात पाण्याअभावी कसलेच उत्पादन घेता येत नव्हते. अशा ठिकाणी जिद्द व चिकाटीच्या बळावर बेभरवशावर पडणाऱ्या पर्जन्यावर मात करत अर्थशास्त्र विषयाची पदवी प्राप्त करूनही शेतीत भविष्यपूर्ण यशस्वी प्रयोग करण्याची मनापासून ओढ जाधववाडी, ता. कोरेगाव येथील प्रगतशील युवा शेतकऱ्याची दिसून येत आहे.जाधववाडी, ता. कोरेगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर ‘ढग्या’ नावाच्या परिसरात सचिन रामचंद्र जाधव या युवा शेतकऱ्याच्या वडिलांनी ३० गुंठ्याचे क्षेत्र खरेदी केले होते. हा जिल्ह्याच्या पूर्वेकडील परिसर नेहमीच अल्प प्रमाणात पावसाचा असल्याने दुष्काळी म्हणून ओळखला जातो. कसलाही पाण्याचा स्त्रोत नसणाऱ्या या ओसाड माळरानावर शेती विकसित करण्याचा धाडसी प्रयोग जाधव यांनी घेतला. यासाठी प्रथम जेसीबी व ट्रॅक्टरने जमिनीचे सपाटीकरण करून जमीन दुरुस्त केली. त्यानंतर विहीर खोदली; परंतु विहिरीलाही पाणी कमी लागल्याने बोर मारली.दरम्यान, स्वत:चा खर्च फेल गेला. यामुळे मुबलक पाणी मिळत असल्याने या ‘ढग्या’ नावाच्या परिसरात ३० गुंठ्याच्या क्षेत्रात आल्याचे पीक आधुनिक ट्रिपद्वारे करण्यात आले. संपूर्णत: वाळूमिश्रित मातीत आले लावण्यात आले आहे. लहान बाळाप्रमाणे संगोपन करत भर उन्हात आले पिकाच्या उत्तम जोपासण्यामुळे केवळ २ महिने व २० दिवसांत आल्याचं दोन फुटांपर्यंत उंची वाढली आहे. सध्या हे पीक १५ ते २० बांडीवर असून, प्रतिगुंठा दोन-तीन गाड्या उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.सचिन जाधव यांनी आले पिकाची लागण ८ जून २०१५ रोजी केली असून, याची मशागत करण्यासाठी यापूर्वी दहा ट्रॉली शेणखत व एक हजार किलो गांडूळ खत वापरले आहे. या आल्याची लागण दीड फूट बेडवर केलेली असून, तीन कुडी पद्धतीने केली आहे. पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. या अगोदर त्या जागेत ज्वारीचे पीक घेण्यात आले होते; परंतु त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने हे क्षेत्र कष्टाच्या बळावर बागायती करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत प्रयत्न करून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे पिकाच्या वाढीवरून दिसून येत आहे. यापूर्वी या क्षेत्रात आले पीक कधीही न घेतल्याने यंदा आले पीक घेण्याचा धाडसी प्रयोग त्यांनी केला. आले पिकाची अर्धा ते पाऊण फुटावर लागण करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती गावाच्या परिसरातील औषधविक्री करणाऱ्यापासून घेतली आहे. दीड महिन्यापासून पहिली आळवणी तर ८० दिवसांनंतर दुसरी आळवणी करण्यात आली. वीस दिवसांत दूध भर, तर पन्नास दिवसांनंतर पहिली बाळभर करण्यात आली. पाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी पाटाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी बीएपी १०-२६-२६ (मिश्रखत) पोटॅश, सिलिकॉन, सिक्वेन्स, हुमनी लागू नये, यासाठी निंबोळी पेंड, तांबा पेरी, अमोनिया आदी रासायनिक खतांचा वापर करून ५०० किलो गांडूळ खत वापरण्यात येत आहे. गोमुत्राची फवारणी दहा दिवसांतून एकदा ड्रिपवरून तर पुढील दहा दिवसांतून वरून फवारणी केली जात आहे.आंतरपिक मिरचीया ३० गुंठ्यातील आले लागवडीसोबत आंतरपिक घेण्यासाठी ३०० रोपे सितारा व लवंगी मिरची या जातीची लागवड केली. ठिबक सिंचनावर हे आंतरपिक असल्याने या मिरच्यांची रोपे देखील उत्तम आली आहेत. यातून होणारे उत्पादन पुण्याच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्याचा त्यांचा मानस आहे.