शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची झळ; पण आल्यानं दिलं बळ!

By admin | Updated: September 7, 2015 20:59 IST

जाधववाडी : बेभरवशाच्या पर्जन्यावर मात करत अर्थशास्त्र पदवीधराची शेतीत कमाल

शेतीशिवाय मजा नाय’ या वाक्यानुसार तरुण शेतकऱ्याची आपली माती व शेतीबद्दल असणारा जिव्हाळा. तसेच ज्या क्षेत्रात पाण्याअभावी कसलेच उत्पादन घेता येत नव्हते. अशा ठिकाणी जिद्द व चिकाटीच्या बळावर बेभरवशावर पडणाऱ्या पर्जन्यावर मात करत अर्थशास्त्र विषयाची पदवी प्राप्त करूनही शेतीत भविष्यपूर्ण यशस्वी प्रयोग करण्याची मनापासून ओढ जाधववाडी, ता. कोरेगाव येथील प्रगतशील युवा शेतकऱ्याची दिसून येत आहे.जाधववाडी, ता. कोरेगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर ‘ढग्या’ नावाच्या परिसरात सचिन रामचंद्र जाधव या युवा शेतकऱ्याच्या वडिलांनी ३० गुंठ्याचे क्षेत्र खरेदी केले होते. हा जिल्ह्याच्या पूर्वेकडील परिसर नेहमीच अल्प प्रमाणात पावसाचा असल्याने दुष्काळी म्हणून ओळखला जातो. कसलाही पाण्याचा स्त्रोत नसणाऱ्या या ओसाड माळरानावर शेती विकसित करण्याचा धाडसी प्रयोग जाधव यांनी घेतला. यासाठी प्रथम जेसीबी व ट्रॅक्टरने जमिनीचे सपाटीकरण करून जमीन दुरुस्त केली. त्यानंतर विहीर खोदली; परंतु विहिरीलाही पाणी कमी लागल्याने बोर मारली.दरम्यान, स्वत:चा खर्च फेल गेला. यामुळे मुबलक पाणी मिळत असल्याने या ‘ढग्या’ नावाच्या परिसरात ३० गुंठ्याच्या क्षेत्रात आल्याचे पीक आधुनिक ट्रिपद्वारे करण्यात आले. संपूर्णत: वाळूमिश्रित मातीत आले लावण्यात आले आहे. लहान बाळाप्रमाणे संगोपन करत भर उन्हात आले पिकाच्या उत्तम जोपासण्यामुळे केवळ २ महिने व २० दिवसांत आल्याचं दोन फुटांपर्यंत उंची वाढली आहे. सध्या हे पीक १५ ते २० बांडीवर असून, प्रतिगुंठा दोन-तीन गाड्या उत्पादन मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.सचिन जाधव यांनी आले पिकाची लागण ८ जून २०१५ रोजी केली असून, याची मशागत करण्यासाठी यापूर्वी दहा ट्रॉली शेणखत व एक हजार किलो गांडूळ खत वापरले आहे. या आल्याची लागण दीड फूट बेडवर केलेली असून, तीन कुडी पद्धतीने केली आहे. पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. या अगोदर त्या जागेत ज्वारीचे पीक घेण्यात आले होते; परंतु त्यातून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने हे क्षेत्र कष्टाच्या बळावर बागायती करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत प्रयत्न करून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे पिकाच्या वाढीवरून दिसून येत आहे. यापूर्वी या क्षेत्रात आले पीक कधीही न घेतल्याने यंदा आले पीक घेण्याचा धाडसी प्रयोग त्यांनी केला. आले पिकाची अर्धा ते पाऊण फुटावर लागण करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती गावाच्या परिसरातील औषधविक्री करणाऱ्यापासून घेतली आहे. दीड महिन्यापासून पहिली आळवणी तर ८० दिवसांनंतर दुसरी आळवणी करण्यात आली. वीस दिवसांत दूध भर, तर पन्नास दिवसांनंतर पहिली बाळभर करण्यात आली. पाण्याच्या योग्य निचऱ्यासाठी पाटाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी बीएपी १०-२६-२६ (मिश्रखत) पोटॅश, सिलिकॉन, सिक्वेन्स, हुमनी लागू नये, यासाठी निंबोळी पेंड, तांबा पेरी, अमोनिया आदी रासायनिक खतांचा वापर करून ५०० किलो गांडूळ खत वापरण्यात येत आहे. गोमुत्राची फवारणी दहा दिवसांतून एकदा ड्रिपवरून तर पुढील दहा दिवसांतून वरून फवारणी केली जात आहे.आंतरपिक मिरचीया ३० गुंठ्यातील आले लागवडीसोबत आंतरपिक घेण्यासाठी ३०० रोपे सितारा व लवंगी मिरची या जातीची लागवड केली. ठिबक सिंचनावर हे आंतरपिक असल्याने या मिरच्यांची रोपे देखील उत्तम आली आहेत. यातून होणारे उत्पादन पुण्याच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्याचा त्यांचा मानस आहे.