शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

दुष्काळी वसना नदीत खळाळले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:15 IST

आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भागची वरदायनी असलेली वसना नदीही वाहु लागली आहे. वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले.

ठळक मुद्देपरतीच्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला

वाठार स्टेशन, 2 : पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाडा असा नामोल्लेख केला जात असलेल्या कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भाग यंदाही अपुºया पावसामुळे अडचणीत सापडला होता. राज्यात सर्वदूर पाऊस पडत असताना या भागातील दुष्काळ मात्र हटत नव्हता. या भागची वरदायनी असलेली वसना नदीही गेल्या अनेक वर्षांपासूून वाहिली नसल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुष्काळी वसना नदी वाहु लागली आहे.  वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले.

 वसना नदी पुनर्भरण आराखडा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला.  तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या आराखडा निश्चित करत जलसंधारण मंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे  वसना नदी पुनर्भरणाबाबत चा अहवाल सादर केला. त्यानंतर वसना नदीपात्रातील सोळशी ते पळशी या  दरम्यान वसना नदीत २७ बंधाºयांना मंजुरी देण्यात आली. यासाठी १२ कोटी १५ लाखांच्या खर्चासही मान्यता मिळाली. या प्रमाणे वसना नदीपात्रात आजअखेर जवळपास २५ बंधारे पुर्णत्वास आले.

गेल्यावर्षी यातील काही बंधाºयात पाणीसाठा झाला होता. मात्र, हे पाणी काही दिवसातच आटुन गेल्यामुळे या भागाची दुष्काळी परस्थिती  कायम राहिली.एका बाजुने या भागात पाणीसाठा होण्यासाठी जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतू पावसाअभावी बंधारे, ओढे कोरडे पडले होते.

पावसाळा संपत आला तरी या भागातील सर्वच पाझर तलाव, नदी पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने  वसना नदीसह लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहु लगले आहेत.

नदीपात्रात सोळशी पासून पळशी पर्यंत असलेले सर्व केटी वेअर बंधारे ही ओसंडुन वाहू लागले आहेत. यामुळे नदी परिसरातील बहुतांशी गावांचा तात्पुरता का होईना पाणी प्रश्न मिटला आहे.जलयुक्त शिवार ही लोकचळवळ बनू लागली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी हे आभियान वरदान ठरले आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी अडविल्यामुळे भुजल पातळी वाढणार असून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.- मनोज अनपट,अनपटवडी