शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
3
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
7
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
8
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
9
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
10
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
11
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
12
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
13
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
14
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
15
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
18
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
19
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
20
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश

दुष्काळी वसना नदीत खळाळले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 16:15 IST

आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भागची वरदायनी असलेली वसना नदीही वाहु लागली आहे. वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले.

ठळक मुद्देपरतीच्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला

वाठार स्टेशन, 2 : पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाडा असा नामोल्लेख केला जात असलेल्या कोरेगाव तालुक्याचा उत्तर दुष्काळी भाग यंदाही अपुºया पावसामुळे अडचणीत सापडला होता. राज्यात सर्वदूर पाऊस पडत असताना या भागातील दुष्काळ मात्र हटत नव्हता. या भागची वरदायनी असलेली वसना नदीही गेल्या अनेक वर्षांपासूून वाहिली नसल्याने या परिसरात चिंतेचे वातावरण होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुष्काळी वसना नदी वाहु लागली आहे.  वसनेत पाणी बघून अनेकांचे डोळे पाणावले.

 वसना नदी पुनर्भरण आराखडा दोन वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला.  तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी या आराखडा निश्चित करत जलसंधारण मंत्री पंकजा मुंढे यांच्याकडे  वसना नदी पुनर्भरणाबाबत चा अहवाल सादर केला. त्यानंतर वसना नदीपात्रातील सोळशी ते पळशी या  दरम्यान वसना नदीत २७ बंधाºयांना मंजुरी देण्यात आली. यासाठी १२ कोटी १५ लाखांच्या खर्चासही मान्यता मिळाली. या प्रमाणे वसना नदीपात्रात आजअखेर जवळपास २५ बंधारे पुर्णत्वास आले.

गेल्यावर्षी यातील काही बंधाºयात पाणीसाठा झाला होता. मात्र, हे पाणी काही दिवसातच आटुन गेल्यामुळे या भागाची दुष्काळी परस्थिती  कायम राहिली.एका बाजुने या भागात पाणीसाठा होण्यासाठी जलयुक्त शिवार, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतू पावसाअभावी बंधारे, ओढे कोरडे पडले होते.

पावसाळा संपत आला तरी या भागातील सर्वच पाझर तलाव, नदी पात्र कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने  वसना नदीसह लहान बंधारे पूर्ण क्षमतेने भरुन वाहु लगले आहेत.

नदीपात्रात सोळशी पासून पळशी पर्यंत असलेले सर्व केटी वेअर बंधारे ही ओसंडुन वाहू लागले आहेत. यामुळे नदी परिसरातील बहुतांशी गावांचा तात्पुरता का होईना पाणी प्रश्न मिटला आहे.जलयुक्त शिवार ही लोकचळवळ बनू लागली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी हे आभियान वरदान ठरले आहे. नदीतून वाहून जाणारे पाणी अडविल्यामुळे भुजल पातळी वाढणार असून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटला आहे.- मनोज अनपट,अनपटवडी