शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून दुष्काळ डोहात बुडविला!

By admin | Updated: July 28, 2015 21:27 IST

रामडोह, कुंभारडोह झाले वाहते : खटाव तालुक्यातील श्रीराम सागर तलाव दुथडी भरून लागला वाहू

वडूज : वरुड, ता. खटाव येथील कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी आपटा शिवार येथे लोकसहभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने रामडोह, कुंभारडोह तयार केले होते. या भागात पडलेल्या पावसामुळे दोन्ही डोहांना पाणी आले असून, श्रीराम सागर तलावही दुथडी भरून वाहत आहे. येथील दुष्काळ लोकसहभागातून डोहात बुडविला असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.वरुड येथील आपटा शिवार येथे लोकसहभागातून नांदेडचे मन्ना महाराज यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही प्रमाणात पाणी प्रवाहित झाले होते; परंतु यासाठी यांत्रिक गरज भासल्याने मन्ना महाराज यांनी आवाहन केल्यानंतर जेसीबी, पोकलॅन व ट्रॅक्टरने उर्वरित खोदकाम सुरू केले. त्यनंतर पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाले. त्यामुळे या कार्याला थोडेफार यश आले आहे.या कामात अनेक अडचणी येत होत्या. त्यावर पर्याय शोधून उपाययोजना राबविल्या जात होत्या. येथील पाणी प्रवाहित झाले; मात्र तेथे मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने तो मनुष्यबळाचा वापर करून काढणे अशक्य होते. ही बाब लक्षात घेऊन मदतीचे आवाहन करण्यात आले. प्रसिद्धीपासून कोसो दूर असणाऱ्या मन्ना महराजांना हे कार्य करून अजून पुढील कामे अपेक्षित आहेत. याठिकाणी सेवाभावी वृत्तीने दान करत आहेत. शासनाने या दुष्काळी भागात कोट्यवधी रुपये खर्चून जलसंधारणाची व जलयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेतली आहेत. मात्र, अपुऱ्या पावसामुळे याठिकाणी पाणीसाठी होत नाही. मात्र, भूगर्भातील प्रवाहित पाणीसाठा ओळखून ग्रामस्थांनी दिलेले श्रमदान लाखमोलाचे ठरत आहे. (प्रतिनिधी)या ओढ्यावरील हे खोदकाम पूर्णक्षमतेने झाल्यानंतर पाझर तलावाखालील वरुड व सिद्धेश्वर-कुरोली या गावास सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तुडुंब भरून पाण्याचा कायमचा प्रश्न मिटणार आहे. त्याप्रमाणे दोन्ही गावांतील जिरायत व बागायती असे मिळून १७५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या कामाला लोक सहभागाबरोबरीने शासनाची जोड मिळाली तर या दोन्ही गावांचे नंदनवन होईल.साठी कष्ट करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे.-शशिकांत जाधव(सरपंच, वरुड)गाडलेला ओढा पुनर्जीवितअनेक वर्षांपासून भूगर्भात गाढलेला ओढा पुनर्जीवित करून शेकडो फुटांवर असलेला पाझर तलाव्यात हे पाणी साचून आहे. या गावाची तहान भागून कायमचा दुष्काळ हटावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. पाणी साठले असून, ते प्रवाहित झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. गाळ नेण्याचे आवाहनराम व सीतेच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या भूगर्भातील खोदकामामुळे निघालेला गाळ ग्रामस्थांनी न्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.खोलवर खोदकामामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, तो या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नेल्यास हा परिसर स्वच्छ होऊन पाणी पूर्णक्षमतेने प्रवाहित होऊन वरुड व कुरोली येथील पाझर तलाव दुथडी भरून वाहतील. त्यामुळे या परिसरातील विहिरींचे पुनर्भरण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास एक प्रकारे मदतच होणार आहे.-ज्ञानदेव माने (शेतकरी, वरुड)