शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

लोकसहभागातून दुष्काळ डोहात बुडविला!

By admin | Updated: July 28, 2015 21:27 IST

रामडोह, कुंभारडोह झाले वाहते : खटाव तालुक्यातील श्रीराम सागर तलाव दुथडी भरून लागला वाहू

वडूज : वरुड, ता. खटाव येथील कायमस्वरूपी दुष्काळावर मात करण्यासाठी आपटा शिवार येथे लोकसहभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने रामडोह, कुंभारडोह तयार केले होते. या भागात पडलेल्या पावसामुळे दोन्ही डोहांना पाणी आले असून, श्रीराम सागर तलावही दुथडी भरून वाहत आहे. येथील दुष्काळ लोकसहभागातून डोहात बुडविला असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.वरुड येथील आपटा शिवार येथे लोकसहभागातून नांदेडचे मन्ना महाराज यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर काही प्रमाणात पाणी प्रवाहित झाले होते; परंतु यासाठी यांत्रिक गरज भासल्याने मन्ना महाराज यांनी आवाहन केल्यानंतर जेसीबी, पोकलॅन व ट्रॅक्टरने उर्वरित खोदकाम सुरू केले. त्यनंतर पाण्याचा प्रवाह प्रवाहित झाले. त्यामुळे या कार्याला थोडेफार यश आले आहे.या कामात अनेक अडचणी येत होत्या. त्यावर पर्याय शोधून उपाययोजना राबविल्या जात होत्या. येथील पाणी प्रवाहित झाले; मात्र तेथे मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने तो मनुष्यबळाचा वापर करून काढणे अशक्य होते. ही बाब लक्षात घेऊन मदतीचे आवाहन करण्यात आले. प्रसिद्धीपासून कोसो दूर असणाऱ्या मन्ना महराजांना हे कार्य करून अजून पुढील कामे अपेक्षित आहेत. याठिकाणी सेवाभावी वृत्तीने दान करत आहेत. शासनाने या दुष्काळी भागात कोट्यवधी रुपये खर्चून जलसंधारणाची व जलयुक्त शिवार योजनेची कामे हाती घेतली आहेत. मात्र, अपुऱ्या पावसामुळे याठिकाणी पाणीसाठी होत नाही. मात्र, भूगर्भातील प्रवाहित पाणीसाठा ओळखून ग्रामस्थांनी दिलेले श्रमदान लाखमोलाचे ठरत आहे. (प्रतिनिधी)या ओढ्यावरील हे खोदकाम पूर्णक्षमतेने झाल्यानंतर पाझर तलावाखालील वरुड व सिद्धेश्वर-कुरोली या गावास सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी तुडुंब भरून पाण्याचा कायमचा प्रश्न मिटणार आहे. त्याप्रमाणे दोन्ही गावांतील जिरायत व बागायती असे मिळून १७५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या कामाला लोक सहभागाबरोबरीने शासनाची जोड मिळाली तर या दोन्ही गावांचे नंदनवन होईल.साठी कष्ट करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे.-शशिकांत जाधव(सरपंच, वरुड)गाडलेला ओढा पुनर्जीवितअनेक वर्षांपासून भूगर्भात गाढलेला ओढा पुनर्जीवित करून शेकडो फुटांवर असलेला पाझर तलाव्यात हे पाणी साचून आहे. या गावाची तहान भागून कायमचा दुष्काळ हटावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. पाणी साठले असून, ते प्रवाहित झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. गाळ नेण्याचे आवाहनराम व सीतेच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या भूगर्भातील खोदकामामुळे निघालेला गाळ ग्रामस्थांनी न्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.खोलवर खोदकामामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, तो या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नेल्यास हा परिसर स्वच्छ होऊन पाणी पूर्णक्षमतेने प्रवाहित होऊन वरुड व कुरोली येथील पाझर तलाव दुथडी भरून वाहतील. त्यामुळे या परिसरातील विहिरींचे पुनर्भरण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास एक प्रकारे मदतच होणार आहे.-ज्ञानदेव माने (शेतकरी, वरुड)