शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

दुष्काळी शेतकरी गप्प ‘गार’च!

By admin | Updated: December 26, 2014 00:52 IST

रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १७ हजार ६०० हेक्टर आहे. यावर्षी दोन लाख ४५ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी

नितीन काळेल - सातारा  -कधी जेमतेम पाऊस तर कधी दुष्काळ, अशा स्थितीत जगणाऱ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना यंदा निसर्गाचा चांगलाच फटका बसला. मार्च महिन्यात दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. फळबागा कोलमडल्या. त्यानंतर डिसेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाका दिल्याने शेतकरी पुन्हा गप्प ‘गार’ झाला. जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी तर पश्चिमेकडील भाग हा सुजलाम्- सुफलाम् समजला जातो. पूर्व भागात खरीप हंगामात बाजरी, मटकी, कडधान्ये घेण्यात येतात. तर पश्चिम भागात ऊस, सोयाबीन, भात आदींसारखी महत्त्वपूर्ण पीक घेतली जातात. असे असले तरी अलीकडील काही वर्षांत दुष्काळी भागातील आर्थिकस्तर उंचावत असल्याचे दिसत आहे. याला कारण म्हणजे फळबागा. दुष्काळी, माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगावचा काही भाग या तालुक्यांत डाळिंब, द्राक्षांच्या फळबागा होत आहेत. त्याचबरोबर ऊसक्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. पाऊस चांगला झाला तर येथील शेतकरी ‘राजा’ होऊनच वावरत असतो; पण दुष्काळात पूर्ण कोलमडून पडतो. मागील दोन वर्षांपूर्वीचा दुष्काळ मागे टाकून येथील शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबल्या. काही ठिकाणी पेरण्याच झाल्या नाहीत. परिणामी खरीप हंगामात ८४.१६ टक्के इतक्याच पेरण्या होऊ शकल्या. खरिपातील सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ८३ हजार ९०९ हेक्टर असून, त्या तुलनेत तीन लाख २३ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. खरीप हंगामात माण तालुक्यातील तीन गावे ५० पेक्षा कमी पैसेवारीची म्हणून जाहीर करण्यात आली होती. रब्बी हंगामातील सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १७ हजार ६०० हेक्टर आहे. यावर्षी दोन लाख ४५ हजार ९०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. शंभर टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उशिरा होऊनही चांगला पाऊस झाला. खरीप हंगामात काही दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले, काही दुकाने निलंबित करण्यात आली होती. त्यामध्ये खतांचे ९, बियाण्यांचे ८, कीटकनाशक विक्री परवानाधारकांचे ७, खताचे १७ आदींवर कारवाईचा जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत बडगा उगारण्यात आला होता. तसेच बियाण्यांचे ३१९, खतांचे ११६ नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. जिल्ह्यात यावर्षी १३२ टक्के पाऊस जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९१८.८९ मि.मी. एवढे आहे. ३१ आॅक्टोबर अखेर जिल्ह्यात १२१६.०२ मि.मी. पाऊस झाला. हंगामाच्या सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ही १३२ एवढी आहे. सातारा तालुक्यात ११४ टक्के, जावळी १०२, टक्के, खंडाळा ११६, महाबळेश्वर २५४ टक्के, कोरेगाव ७३ टक्के, माण ८७ टक्के असा पाऊस झाला. दरम्यान, राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने यंदा भात पिकाची नवीन योजना सुरू झाली. ऊस ठिबक सिंचन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शतकोटी वृक्ष लागवडीअंतर्गत साडेचार लाख झाडे लावण्यात आली.यावर्षी जिल्हा परिषदेने कृषी पर्यटनावर आधारित नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. इच्छुक शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून त्यांना आर्थिक प्राप्ती होण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले.