शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

दुष्काळ हटतोय अन् शेळीपालन व्यवसाय घटतोय-माण-खटाव तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:55 IST

सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत

ठळक मुद्देजनावरांच्या संख्येत दीड लाखाने घट; स्थानिकांचे रोजगारासाठी पुणे, मुंबईला स्थलांतर

योगेश घोडके ।सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी दीड लाखाने शेळ्या मेंढ्यांची संख्येत घट झाली आहे.जिल्ह्यात दुष्काळ पट्ट्यात माण, खटाव, फलटण ही तालुके येतात. या तालुक्यांत प्रमुख्याने शेती व मेंढपाळचा मुख्य व्यवसाय. मात्र पाणी व चाऱ्याच्या टंचाईमुळे या व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागामार्फत केलेल्या २०१२ च्या पशुगणनेनुसार या तालुक्यात शेळी व मेंढ्यांच्या प्रमाणात १ लाख ३७ हजार १८६ इतकी घट झाल्याची दिसून येत आहे.माण-खटाव या दोन तालुक्यांत शेळ्या व मेंढ्यांची अधिक प्रमाणात आहे. मात्र याठिकाणी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे. या तालुक्यांतील लोक हंगामानुसार शेतीती उत्पन्न घेत असतात. तसेच जोडधंदा म्हणून शेळीपालनचा व्यवसाय करतात. या तालुक्यात सतत दुष्काळ असल्याने अनेक कुटुंबे कामासाठी पुणे-मुंबई या सारख्या शहरांमध्ये जाऊन वास्तव करत आहेत. काहीजण शेतजमीन देखरेखीसाठी घराकडे आई-वडिलांनाच सोडून जातात. पूर्वी या भागामध्ये प्रत्येकाच्या घरी शेळा, मेंढ्यांचा कळप असायचा. दुष्काळात ही मंडळी आपली लवाजमा घेऊन सुगम भागात जात असे.सध्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करू लागले. त्यांना चाराही मिळेनासा झाल्याने अनेक कुटुंबे शेळ्या,मेंढ्या विक्रीस सुरुवात केली. हाताला व्यवसाय मिळत नसल्याने मेंढपाळची मुले ही परंपरागत व्यवसाय न करता शिक्षणात पुढे जाऊन मोठमोठ्या शहरात विसावू लागली.पशुगणेनुसार माण-खटाव तालुक्यांतील आकडेवारी२००७ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ८८ हजार २४१ तर मेंढ्या ९७हजार २५ व खटाव तालुक्यात ५९ हजार ५२ तर मेंढ्या ३९ हजार ३९१ अशी नोंद करण्यात आली.२०१२ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ७८ हजार ८८५ तर मेंढ्या ९४ हजार २६६ व खटावमध्ये २९ हजार ०६८ तर मेंढ्या १८ हजार ७६५ अशी नोंद करण्यात आली.ूमाण व खटाव तालुक्यांत पाणी व चाºयाची टंचाई निार्मण झाली आहे. तसेच युवकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे पारंपरिक व्यवसाय सोडून मुले शिक्षणात रमली आहेत. सध्या उच्च शिक्षण घेऊन पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे शेळीपालनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.- विनोद पवार, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी