शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दुष्काळ हटतोय अन् शेळीपालन व्यवसाय घटतोय-माण-खटाव तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:55 IST

सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत

ठळक मुद्देजनावरांच्या संख्येत दीड लाखाने घट; स्थानिकांचे रोजगारासाठी पुणे, मुंबईला स्थलांतर

योगेश घोडके ।सातारा : जलयुक्त आणि वॉटर कपची कामे सध्या माण-खटाव या दुष्काळी तालुक्यांत होत असल्यामुळे दुष्काळाची ओळख आता हळूहळू लोप पावत आहे. परंतु या दोन्ही तालुक्यातं पूर्वीपासून सुरू असणारा शेळीपालन व्यवसाय आता नाहीसा होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत सरासरी दीड लाखाने शेळ्या मेंढ्यांची संख्येत घट झाली आहे.जिल्ह्यात दुष्काळ पट्ट्यात माण, खटाव, फलटण ही तालुके येतात. या तालुक्यांत प्रमुख्याने शेती व मेंढपाळचा मुख्य व्यवसाय. मात्र पाणी व चाऱ्याच्या टंचाईमुळे या व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पशुधन विभागामार्फत केलेल्या २०१२ च्या पशुगणनेनुसार या तालुक्यात शेळी व मेंढ्यांच्या प्रमाणात १ लाख ३७ हजार १८६ इतकी घट झाल्याची दिसून येत आहे.माण-खटाव या दोन तालुक्यांत शेळ्या व मेंढ्यांची अधिक प्रमाणात आहे. मात्र याठिकाणी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे. या तालुक्यांतील लोक हंगामानुसार शेतीती उत्पन्न घेत असतात. तसेच जोडधंदा म्हणून शेळीपालनचा व्यवसाय करतात. या तालुक्यात सतत दुष्काळ असल्याने अनेक कुटुंबे कामासाठी पुणे-मुंबई या सारख्या शहरांमध्ये जाऊन वास्तव करत आहेत. काहीजण शेतजमीन देखरेखीसाठी घराकडे आई-वडिलांनाच सोडून जातात. पूर्वी या भागामध्ये प्रत्येकाच्या घरी शेळा, मेंढ्यांचा कळप असायचा. दुष्काळात ही मंडळी आपली लवाजमा घेऊन सुगम भागात जात असे.सध्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेळीपालनाचा व्यवसाय करू लागले. त्यांना चाराही मिळेनासा झाल्याने अनेक कुटुंबे शेळ्या,मेंढ्या विक्रीस सुरुवात केली. हाताला व्यवसाय मिळत नसल्याने मेंढपाळची मुले ही परंपरागत व्यवसाय न करता शिक्षणात पुढे जाऊन मोठमोठ्या शहरात विसावू लागली.पशुगणेनुसार माण-खटाव तालुक्यांतील आकडेवारी२००७ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ८८ हजार २४१ तर मेंढ्या ९७हजार २५ व खटाव तालुक्यात ५९ हजार ५२ तर मेंढ्या ३९ हजार ३९१ अशी नोंद करण्यात आली.२०१२ च्या पशुगणनेनुसार माणमध्ये शेळ्या ७८ हजार ८८५ तर मेंढ्या ९४ हजार २६६ व खटावमध्ये २९ हजार ०६८ तर मेंढ्या १८ हजार ७६५ अशी नोंद करण्यात आली.ूमाण व खटाव तालुक्यांत पाणी व चाºयाची टंचाई निार्मण झाली आहे. तसेच युवकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे पारंपरिक व्यवसाय सोडून मुले शिक्षणात रमली आहेत. सध्या उच्च शिक्षण घेऊन पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे शेळीपालनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.- विनोद पवार, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी