शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

आटणीत दुष्काळी; कलाकुसरीत बंगाली...

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

सोन्यासारखं जीवन : श्रीलंका, दुबईमध्येही गलाई व्यवसायिक

सोने म्हटले की समोर येते ते सोनार समाज व शोरुमवाले विक्रेते. पण, सोने शुध्द करणे व त्यापासून दागिने बनविणारेही तितकेच महत्वपूर्ण असतात. सोने शुध्द करण्यात सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोक आहेत. त्यालाच आपण आटणी (गलाई) व्यवसायिक म्हणतो. तर कलाकूसर दागिने बनविण्यात पश्चिम बंगालचे कारागिर पुढे आहेत. आजच्या स्थितीत देशात काय किंवा परदेशातही आटणी व्यवसायात दुष्काळी भागातीलच लोक आहेत. साताऱ्यातील माण खटाव तालुक्यातील अनेकांनी यात जम बसविला आहे. सांगली जिल्ह्यातील आटणी व्यावसायिक श्रीलंका, दुबईमध्येही कार्यरत आहेत. सोने-चांदीचा व्यवसाय शेकडो वर्षांपासून सुरू आहे. सोन्याच्या दागिन्याचा भल्याभल्यांना मोह आहे. सोन्यापासून दागिने बनविताना ते शुध्द करुन घ्यावे लागते. म्हणजेच त्याला सोने रिफायनरी म्हणतात. ग्रामीण भागात त्याला आटणी म्हणून ओळखले जाते. देशात किंवा परदेशातही आटणी व्यावसायिक पसरला आहे. हा व्यावसायिक हा फक्त दुष्काळी भागातील आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुका, सातारा जिल्ह्यात तर २०० च्यावर आटणी व्यावसायिक कार्यरत आहेत तर सातारा शहरात किमान ३० जण आहेत. आटणी व्यावसायिक मजुरीवर काम करतात. त्यांना टक्केवारीनुसार पैसे मिळतात. सोन्याची टक्केवारी काढणे, सोने शुध्द करणे यानुसार त्यांना पैसे मिळतात. आटणीच्या व्यावसायासाठी दगडी कोळसा, अ‍ॅसिड आणि नवसागर लागते. सातारा जिल्ह्यात असे कारागिर हजारभर आहेत. वर्ष, दोन वर्षांतून ते बंगालला जातात. आटणी व्यावसायिकांची काही प्रसिध्द गावे...आटणी व्यावसायात दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे आहेत. या व्यावसायामुळे त्यांच्या गावांची नावे प्रसिध्द झाली आहेत. यामध्ये माण तालुक्यातील वरकुटे मलवडी, शेनवडी, महाबळेश्वरवाडी. खानापूर तालुक्यातील पारे, वेजेगाव, भूड, जाधववाडी, मंगरूळ, रेवणगाव, बेनापूर, बलवडी (खानापूर), चिंचणी. आटपाडी तालुक्यातील आटपाडी, करगणी, माडगुळे, तडवळे, नेलकरंजी. तसेच तासगाव ताुलक्यातील अनेक गावांतील लोक या व्यवसायात आहेत. एवढेच काय खानापूर तालुक्यातील काहीजण तर श्रीलंका, दुबई, अंदमान निकोबार येथे आटणी व्यावसाय करीत आहेत.