शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कायम दुष्काळी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:30 IST

मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासना चा राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा द्वितीय क्रमांकाचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात ...

मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासनाचा राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा द्वितीय क्रमांकाचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.किवळ गावाने शासन तसेच सह्याद्री कारखान्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून पाणी अडवा व पाणी जिरवा मोहीम हाती घेतली. शेतीला तर पाणी नाहीच; पण पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून असणाºया या गावाने कंबर कसली. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ५० हजार मीटर लांबीच्या ड्रीप सीसीटीचे काम केले. अनेक ठिकाणी बांध बंदिस्तीची कामे केली. २३ साखळी बंधारे उभारले. ४५ बांध बांधले. ४०० अर्दन स्ट्रक्चर बांध बांधले. ग्रामस्थांमध्ये ठिबक सिंंचनाबाबत जागृती करण्याबरोबरच सलग ३ वर्षे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवाड करून वृक्ष संगोपनाचे काम युद्धपातळीवर केले.२०१५-१६ मध्ये शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत शासन, सह्याद्री कारखाना व लोकसहभागातून राज्यातला पहिला ओढाजोड प्रकल्प किवळ गावाने यशस्वी केला. त्याबरोबरच १० दगडी सिमेंट बंधारे व खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. २३ माती नालाबांधाचा सांडवा दुरुस्ती करून खोलीकरण करण्यात आले. ३ गॅबियन बंधाºयाबरोबरच तलावातील गाळ काढून खोली वाढविण्यात आली. अशी विविध कामे पूर्ण केल्याने पूर्वीपेक्षा २०० हेक्टर जादा क्षेत्र ओलिताखाली नेण्यास मदत झाली. त्यामुळे लोकसहभागातून ऐतिहासिक कामे करणाºया किवळ गावास जिल्हास्तरीय जलसिंचन पुरस्कार मिळाला आहे.पंधरा हजारनागरिकांनी दिली भेटकायम दुष्काळी शिक्का असलेल्या किवळ गावाने केलेली ऐतिहासिक क्रांती पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे १५ हजार लोकांनी गत ३ वर्षांत भेट देऊन गावाने केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. गावाने मनावर घेतले तर कोणतेही काम अवघड नाही, अशी किवळकरांची प्रशंसा करून केलेल्या कामाची नागरिकांकडून पोचपावती देण्यात आली.