शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कायम दुष्काळी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:30 IST

मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासना चा राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा द्वितीय क्रमांकाचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात ...

मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासनाचा राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा द्वितीय क्रमांकाचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.किवळ गावाने शासन तसेच सह्याद्री कारखान्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून पाणी अडवा व पाणी जिरवा मोहीम हाती घेतली. शेतीला तर पाणी नाहीच; पण पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून असणाºया या गावाने कंबर कसली. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ५० हजार मीटर लांबीच्या ड्रीप सीसीटीचे काम केले. अनेक ठिकाणी बांध बंदिस्तीची कामे केली. २३ साखळी बंधारे उभारले. ४५ बांध बांधले. ४०० अर्दन स्ट्रक्चर बांध बांधले. ग्रामस्थांमध्ये ठिबक सिंंचनाबाबत जागृती करण्याबरोबरच सलग ३ वर्षे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवाड करून वृक्ष संगोपनाचे काम युद्धपातळीवर केले.२०१५-१६ मध्ये शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत शासन, सह्याद्री कारखाना व लोकसहभागातून राज्यातला पहिला ओढाजोड प्रकल्प किवळ गावाने यशस्वी केला. त्याबरोबरच १० दगडी सिमेंट बंधारे व खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. २३ माती नालाबांधाचा सांडवा दुरुस्ती करून खोलीकरण करण्यात आले. ३ गॅबियन बंधाºयाबरोबरच तलावातील गाळ काढून खोली वाढविण्यात आली. अशी विविध कामे पूर्ण केल्याने पूर्वीपेक्षा २०० हेक्टर जादा क्षेत्र ओलिताखाली नेण्यास मदत झाली. त्यामुळे लोकसहभागातून ऐतिहासिक कामे करणाºया किवळ गावास जिल्हास्तरीय जलसिंचन पुरस्कार मिळाला आहे.पंधरा हजारनागरिकांनी दिली भेटकायम दुष्काळी शिक्का असलेल्या किवळ गावाने केलेली ऐतिहासिक क्रांती पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे १५ हजार लोकांनी गत ३ वर्षांत भेट देऊन गावाने केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. गावाने मनावर घेतले तर कोणतेही काम अवघड नाही, अशी किवळकरांची प्रशंसा करून केलेल्या कामाची नागरिकांकडून पोचपावती देण्यात आली.