शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कायम दुष्काळी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:30 IST

मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासना चा राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा द्वितीय क्रमांकाचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात ...

मसूर : किवळ गावाने एकजुटीतून दुष्काळाचा कलंक पुसून टाकला आहे. सातत्याने तीन वर्षे केलेल्या विविध कामांमुळे गाव टँकरमुक्त तर झालेच त्याबरोबरच गावातील शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याची किमया ग्रामस्थांनी केली आहे. नुकताच या गावाला महाराष्ट्र शासनाचा राजमाता जिजाऊ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा द्वितीय क्रमांकाचा जलमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.किवळ गावाने शासन तसेच सह्याद्री कारखान्यासह विविध संस्थांच्या माध्यमातून पाणी अडवा व पाणी जिरवा मोहीम हाती घेतली. शेतीला तर पाणी नाहीच; पण पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवर अवलंबून असणाºया या गावाने कंबर कसली. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत ५० हजार मीटर लांबीच्या ड्रीप सीसीटीचे काम केले. अनेक ठिकाणी बांध बंदिस्तीची कामे केली. २३ साखळी बंधारे उभारले. ४५ बांध बांधले. ४०० अर्दन स्ट्रक्चर बांध बांधले. ग्रामस्थांमध्ये ठिबक सिंंचनाबाबत जागृती करण्याबरोबरच सलग ३ वर्षे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवाड करून वृक्ष संगोपनाचे काम युद्धपातळीवर केले.२०१५-१६ मध्ये शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत शासन, सह्याद्री कारखाना व लोकसहभागातून राज्यातला पहिला ओढाजोड प्रकल्प किवळ गावाने यशस्वी केला. त्याबरोबरच १० दगडी सिमेंट बंधारे व खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. २३ माती नालाबांधाचा सांडवा दुरुस्ती करून खोलीकरण करण्यात आले. ३ गॅबियन बंधाºयाबरोबरच तलावातील गाळ काढून खोली वाढविण्यात आली. अशी विविध कामे पूर्ण केल्याने पूर्वीपेक्षा २०० हेक्टर जादा क्षेत्र ओलिताखाली नेण्यास मदत झाली. त्यामुळे लोकसहभागातून ऐतिहासिक कामे करणाºया किवळ गावास जिल्हास्तरीय जलसिंचन पुरस्कार मिळाला आहे.पंधरा हजारनागरिकांनी दिली भेटकायम दुष्काळी शिक्का असलेल्या किवळ गावाने केलेली ऐतिहासिक क्रांती पाहण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे १५ हजार लोकांनी गत ३ वर्षांत भेट देऊन गावाने केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. गावाने मनावर घेतले तर कोणतेही काम अवघड नाही, अशी किवळकरांची प्रशंसा करून केलेल्या कामाची नागरिकांकडून पोचपावती देण्यात आली.