शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

पाणी पिताय... मग जरा थांबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:42 IST

सातारा : आपण जे पाणी पितोय ते गाळून व उकळून पितोय का? ते पाणी किती शुद्ध आहे किंवा नाही, ...

सातारा : आपण जे पाणी पितोय ते गाळून व उकळून पितोय का? ते पाणी किती शुद्ध आहे किंवा नाही, याची तपासणी करतोय का? पाणी पिण्यापूर्वी ते निर्जंतूक करतोय का? असे प्रश्न आपल्याला जर कोणी विचारले तर उत्तर नाही हेच येणार. कारण दूषित पाणी हे अनेक आजारांचे मूळ कारण असून, साथरोग टाळण्यासाठी पाणी पिताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

(चौकट)

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

उलटी, टायफॉईड, कॉलरा, गॅस्ट्रो, व्हायरल इन्फेक्शन, हेपेटायटीस ए/ई, काविळ

(चौकट)

आजारांची लक्षणे

गॅस्ट्रो या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात.

- टायफॉईड दूषित पाण्यामुळे होतो. टायफॉईड झाल्यास रुग्णाला ताप येतो. पोटात दुखते. उपचार न घेतल्यास जंतू रक्तात मिसळतात.

- उलट्या, ताप, लघवी पिवळी होणं किंवा भूक मंदावणे ही काविळीची लक्षणं आहेत. डोळे पिवळे दिसायला लागतात. महिना ते दीड महिना या आजाराची लक्षणं कायम राहतात.

(चौकट)

पाणी पिताना ही घ्या काळजी...

- पाण्याची भांडी दररोज स्वच्छ धुवून त्यात पाणी भरावे.

- पिण्याचे पाणी हे नेहमी गाळून व उकळून प्यावे.

- त्यात मेडिक्लोरचे काही थेंब टाकावे.

- त्यामुळे पाण्यात साचलेली माती अथवा गाळ तळाशी जातो.

- बाहेरील पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.

(चौकट)

सातारा शहराला होणारा पाणी पुरवठा

कास तलाव : ५.५० लाख लीटर

शहापूर : ७.५० लाख लीटर

जीवन प्राधिकरण : २७ लाख लीटर

(चौकट)

प्रशासनाकडून घेतली जातेय खबरदारी

सातारा शहरात पालिकेची दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. ही केंद्र पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गाळमुक्त केली जातात. गढूळ पाणी निवळण्यासाठी चुुना आणि तुरटी तर निर्जंतूक करण्यासाठी ब्लिचिंग पावडर टाकली जाते. फिल्टर बेडमधून पाणी शुद्ध करण्याचे काम निरंतर सुरू असते.