शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या घराचे स्वप्न होणार साकार...!

By admin | Updated: May 22, 2015 00:17 IST

गृहप्रकल्पाचे रविवारी भूमिपूजन : आजी-माजी सैनिकांना मिळणार स्वस्तात घरे

सातारा : सशस्त्र व अर्धबल सैनिकांना परवडणाऱ्या दरात घरे आणि इतर सुविधा मिळाव्यात, यासाठी रक्षक इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. पुण्यात दोन आणि सोलापूरमधील गृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असतानाच साताऱ्यातील खिंडवाडी येथील सातारा पॉलिटेक्निकसमोर उभारण्यात येणाऱ्या ‘रक्षक कॉलनी’ या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार, २४ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार असल्याची माहिती रक्षक संस्थेचे संचालक व अध्यक्ष विंग कमांडर तिरुमारन (निवृत्त) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, ‘विश्वास पात्र आणि परवडणाऱ्या सुविधा सशस्त्र व अर्धबल सैनिकांना एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून रक्षकची स्थापना मे २०१२ मध्ये करण्यात आली. सैनिकी कारकीर्दीमध्ये दुर्गम स्थानी राहणे आणि वारंवार बदल्यांच्या निमित्ताने देशभर फिरत राहणे, हे सर्व सैनिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सैनिक आपल्या भर तारुण्यात बराचसा काळ वेगवेगळ्या मिलिटरी कॅम्पसमध्ये कधी कुटुंबासोबत किंवा कधी कुटुंबाच्याशिवाय घालवतात. मिलिटरी कॅम्पसच्या वातावरणात त्यांच्या जीवनाला एक वेगळे वळण लागते व एका विशिष्ट प्रकारची जीवनशैली त्यांच्या अंगी रुजते. ही सर्व भटकंती करताना हे सर्व सैनिक आपल्या घरापासून, आपल्या समाजापासून आणि नातेवाइकांपासून नकळत दुरावले जातात. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांना परत गावी स्थायिक होतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ‘सैनिकांनी सैनिकांसाठी घेतलेला पुढाकार,’ या बीद्र वाक्याला व आपल्या मूळ ध्येयाला समोर ठेवून रक्षक इन्फ्रास्ट्रक्चर कार्य करत आहे. साताऱ्यातील खिंडवाडी येथे सातारा पॉलिटेक्निकच्या समोर सैनिकांसाठी नव्याने सुरू होणाऱ्या ‘रक्षक कॉलनी’ या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठी लाईफ इन्फंट्रीचे लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) हे असून, भूतपूर्व वायुसेना अध्यक्ष आणि सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक (निवृत्त) हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजी निकम हेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास आजी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही तिरुमारन यांनी केले. हा गृहप्रकल्प जवळपास ११ एकर जागेवर उभा राहणार असून, यात ४५० घरे आहेत. बाजारभावांपेक्षा कमी दरात आणि सर्व सुख सुविधा असलेल्या हा गृहप्रकल्प असून आजी-माजी सैनिकांना एकाच ठिकाणी घरे मिळावेत, या उद्देशाने हा प्रकल्प उभा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ब्रिगेडियर सुनील माझगावकर (निवृत्त), बाला केशवन, बबन गोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)