शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

दारूपुढे गावदर‘बार’ तोकडा!

By admin | Updated: January 30, 2015 22:18 IST

परवानगीची गरज नाही : ‘राज्य उत्पादन शुक्ल’च्या परिपत्रकाने उंचावल्या भुवया

भुर्इंज : पाचवड, ता. वाई येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच बिअरबार सुरू करण्यात आला. याबाबत जिल्ह्यात याची चर्चा होत असतानाच कोणत्याही ठिकाणी बिअर बार सुरू करावयाचा असेल तर त्याला ग्रामपंचायत परवानगीची गरजच नाही, असा स्पष्ट खुलासा राज्य उत्पादन शुल्कच्या परिपत्रकातील नियमावलीतून समोर आल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.पाचवड येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच बिअर बार सुरू करण्यात आला. यावरून दि. २६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गदारोळ झाला. या सर्व प्रकरणात ग्रामपंचातीच्या पदाधिकाऱ्यांवर काही ग्रामस्थांनी संशयाची सुई फिरविली. मात्र, याबाबत बिअर बार परवानगीचे परिपत्रक पाहिले असता त्यामध्ये ग्रामपंचायत परवानगीचा उल्लेखच नाही. उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या याच ग्यानबाच्या मेखीचा फायदा घेऊन पाचवड गावच्या हद्दीत बिअर बार सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी या प्रकारावरून ग्रामपंचायतीच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बारला परवानगीची गरज नसेल तर इतर व्यवसायांना तरी ग्रामपंचायतीची परवानगी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत अधिकारांवर घाला असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना अधिकाधिक अधिकार दिले जात असताना दुसरीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क ग्रामपंचायतीचे अस्तित्वच नाकारणार असेल तर गावापेक्षा बिअर बार मोठा आहे काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)इतर व्यवसायांना परवानगी कशी?सातारा जिल्ह्यात दारुबंदीची चळवळ आक्रमक असल्याने पूरक बाब म्हणून अशी परवानगी मागितली जात असली तरी ती अत्यावश्यक नाही. त्यामुळे बारसाठी जर ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसेल, तर इतर व्यवसायांसाठी तरी कशासाठी हवी? असा सवाल पाचवड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून होत असून उत्पादन शुल्कच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकारावर घाला कशासाठी?पाचवड गावच्या हद्दीत जो बार सुरू झाला आहे त्याला ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी नाही. हा बार सुरू होताच आम्ही आक्षेप नोंदविला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, तहसीलदार आदी ठिकाणी लेखी तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र एकाही ठिकाणी आमची नोंद घेतली नाही. बारला ग्रामपंचातीच्या परवानगीची गरज नसेल तर इतर व्यवसायांनाही तशी परवानगी घेण्याची गरज नाही, असे समजण्यास जनता कचरणार नाही. असे झाले तर ग्रामपंचातीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हा ग्रामपंचायत अधिकारांवर घाला असून सगळा प्रकार संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया सदस्य महेश गायकवाड व भरत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.