शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

दारूपुढे गावदर‘बार’ तोकडा!

By admin | Updated: January 30, 2015 22:18 IST

परवानगीची गरज नाही : ‘राज्य उत्पादन शुक्ल’च्या परिपत्रकाने उंचावल्या भुवया

भुर्इंज : पाचवड, ता. वाई येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच बिअरबार सुरू करण्यात आला. याबाबत जिल्ह्यात याची चर्चा होत असतानाच कोणत्याही ठिकाणी बिअर बार सुरू करावयाचा असेल तर त्याला ग्रामपंचायत परवानगीची गरजच नाही, असा स्पष्ट खुलासा राज्य उत्पादन शुल्कच्या परिपत्रकातील नियमावलीतून समोर आल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.पाचवड येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच बिअर बार सुरू करण्यात आला. यावरून दि. २६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गदारोळ झाला. या सर्व प्रकरणात ग्रामपंचातीच्या पदाधिकाऱ्यांवर काही ग्रामस्थांनी संशयाची सुई फिरविली. मात्र, याबाबत बिअर बार परवानगीचे परिपत्रक पाहिले असता त्यामध्ये ग्रामपंचायत परवानगीचा उल्लेखच नाही. उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या याच ग्यानबाच्या मेखीचा फायदा घेऊन पाचवड गावच्या हद्दीत बिअर बार सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी या प्रकारावरून ग्रामपंचायतीच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बारला परवानगीची गरज नसेल तर इतर व्यवसायांना तरी ग्रामपंचायतीची परवानगी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत अधिकारांवर घाला असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना अधिकाधिक अधिकार दिले जात असताना दुसरीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क ग्रामपंचायतीचे अस्तित्वच नाकारणार असेल तर गावापेक्षा बिअर बार मोठा आहे काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)इतर व्यवसायांना परवानगी कशी?सातारा जिल्ह्यात दारुबंदीची चळवळ आक्रमक असल्याने पूरक बाब म्हणून अशी परवानगी मागितली जात असली तरी ती अत्यावश्यक नाही. त्यामुळे बारसाठी जर ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसेल, तर इतर व्यवसायांसाठी तरी कशासाठी हवी? असा सवाल पाचवड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून होत असून उत्पादन शुल्कच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकारावर घाला कशासाठी?पाचवड गावच्या हद्दीत जो बार सुरू झाला आहे त्याला ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी नाही. हा बार सुरू होताच आम्ही आक्षेप नोंदविला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, तहसीलदार आदी ठिकाणी लेखी तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र एकाही ठिकाणी आमची नोंद घेतली नाही. बारला ग्रामपंचातीच्या परवानगीची गरज नसेल तर इतर व्यवसायांनाही तशी परवानगी घेण्याची गरज नाही, असे समजण्यास जनता कचरणार नाही. असे झाले तर ग्रामपंचातीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हा ग्रामपंचायत अधिकारांवर घाला असून सगळा प्रकार संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया सदस्य महेश गायकवाड व भरत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.