शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

भाजपला डोस, तर स्थानिक नेत्यांनाही ठणकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST

सातारा : ‘माझं मंत्रिमंडळ मी स्वत: निवडतो. मला कोणी मंत्री करू शकत नाही. माझं मंत्रिमंडळ माझे मित्र आहेत. तेच ...

सातारा : ‘माझं मंत्रिमंडळ मी स्वत: निवडतो. मला कोणी मंत्री करू शकत नाही. माझं मंत्रिमंडळ माझे मित्र आहेत. तेच आमचे कॅबिनेट मंत्रिपद आहे,’ असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपला मंत्रिमंडळ विस्ताराआधीच डोस दिला, तर लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे ऋण फेडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. ती त्यांनी पार पाडावी, असे इतर पक्षातील नेत्यांनाही त्यांनी ठणकावले.

उदयनराजेंनी शुक्रवारी सर्वांना धक्का देत सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरच्या पाहणीचे निमित्त करुन थेट उद‌्घाटनच करून टाकले. त्यानंतर जलमंदिर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ग्रामपंचायतीपासून केंद्रीय पातळीवरील नेत्यांपर्यंत सर्वांचाच समाचार घेतला.

उदयनराजे म्हणाले, ‘मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात डोक्यातून नाही, तर मनातून विचार केला. माझ्या मनाला पटते, ते मी करतो. कोरोनाची पार्श्वभूमी पाहता, लोकांची संपूर्ण वाताहात झाली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या मनात विचार आला की जो काय निधी निवडणुकीवर खर्च होणार आहे, तो तिथे खर्च होण्यापेक्षा गरजू आणि उपेक्षितांच्या औषधोपचाराठी निधी मिळाला, तर ते सोन्याहून पिवळे होईल. मी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन केले, त्याला तसा प्रतिसादही मिळाला. त्यांचे मी मनापासून आभार मानतो.’

दरम्यान, ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक लागली, त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांचा हट्ट नडला. याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, ग्रामपंचायतीत राजकारण करत बसण्यापेक्षा समाजाचे ऋण कुठेतरी फेडले पाहिजे, हा विचार काही लोकांच्या मनात येत नाही. मी आयुष्यात कधी राजकारण केले नाही, तर समाजकारण केले. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यामुळे मला बरं वाटलं. बिनविरोधच्या निर्णयाचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व्हायला पाहिजे होते. लोकप्रतिनिधींनी याबाबत विचार केला पाहिजे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर लोक महत्त्वाचे, समाज महत्त्वाचा आहे. जे लोक आपल्याला मतदान करतात, त्यांच्या जिवावर आपण सत्ता काबीज करतो, त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकशाही असल्याने मी कोणाला जबरदस्ती करणार नाही. नेत्यांनी आत्मचिंतन केलं, तर खूप निधी जो वाया जाणार आहे, तो वाचेल. प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करुन देणे हे माझे कर्तव्य समजतो.’

औरंगाबादचे संभाजीनगर व्हावे

औरंगाबादचे नामकरण बदलण्याच्या विषयावर सविस्तर विचार केला पाहिजे. यातून कसलाही उद्रेक होऊ नये. कोणाची मानहानी होऊ नये. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे पूर्वज होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा तर ते केवळ महाराज म्हणून त्यांच्याकडे लोकांनी पाहिले नाही. अनेक ठिकाणी आपण पाहतो, बॉम्बेचे मुंबई झाले, मग लोकशाहीत लोक निर्णय घेतील, असे स्पष्टीकरणही उदयनराजेंनी केले.