शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मराठा समाजाचा अंत पाहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST

रामापूर : आघाडी सरकारच्या माध्यमातून योग्य पाऊल पुढे टाकणे गरजेचे होते; मात्र ते न झाल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे ...

रामापूर : आघाडी सरकारच्या माध्यमातून योग्य पाऊल पुढे टाकणे गरजेचे होते; मात्र ते न झाल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. मराठा समाजाचा अंत पाहू नये. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात हे आंदोलन सुरू झाले तर सरकारमधील आमदार व मंत्र्यांना तालुक्यातील लोक फिरू देणार नाहीत, असा इशारा देऊन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न करावा, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी पाटण येथे व्यक्त केले.

मराठा आरक्षणावरील स्थगिती थांबून मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मिळावे, त्याचबरोबर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरतीप्रक्रिया स्थगित करावी आदी मागण्यांसाठी पाटण तालुका मराठा समाजाच्या वतीने पाटण तहसील कार्यालयासमोर बेमुदत राज्यव्यापी साखळी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी माथाडी नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते.

नरेंद्र पाटील म्हणाले, हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही; पण आम्ही मराठा आहोत. आमच्या मराठा बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. पक्षीय राजकारणापेक्षा आपण समाजाच्या बाजूने उभे राहावे. प्रत्येक समाज हा मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा आहे? मग सरकारला अडचण कोणती आहे, असा सवाल करून मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. तरी या आंदोलनाचा सकारात्मक दृष्टिकोनातून सरकारने विचार करावा.

यावेळी नितीन पिसाळ व संजय इंगवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांना मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा, आधी घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात यशवंतराव जगताप, लक्ष्मण चव्हाण, शंकरराव मोहिते, संजय इंगवले, नितीन पिसाळ, मंगेश पाटणकर, नगराध्यक्ष अजय कवडे, पवन तिकुडवे, गणेश पवार, प्रमोद पवार, अभिषेक नायकवडी, अर्जुन सत्रे, विजय देसाई, तुषार शेजवळ, संतोष इंदुलकर, राहुल देसाई, राजाराम मोटे यांच्यासह मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

फोटो -