शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची ...

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची आग या डोंगरावर भडकली आहे. त्यामुळे ‘नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा’ असे आवाहन या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वनविभागानेही जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी वणवा लागण्याचे प्रकार घडत असताना, हे लोण आता फलटण तालुक्यातही येऊन पोहोचले आहे. दुधेबावी परिसरातील भवानी आईच्या डोंगराला गेले दोन दिवस वणवा लागलेला आहे. भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्याच्या आगीत गवत व वनविभागाने लावलेली अनेक झाडे जाळून खाक झाली आहेत, तर अनेक मोठ्या झाडांनाही झळा बसल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गवत जळाल्याने परिसरातील येथे चरायला नेत असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे, तसेच आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी, अंडी, घरटी जळून खाक होत असल्याने, येथील वनसंपदाही नष्ट होत आहे.

त्यामुळे परिसरात वणव्याचा प्रकार लक्षात आला, तर तातडीने तो विझविण्यासाठी प्रयत्न करावेत व वनविभागाशी संपर्क साधावा. जर कुणी वणवा लावण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा प्रवृत्तींना अटकाव करणे आवश्यक आहे.

हे करू नये -

१. डोंगरकपारीमध्ये स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे.

२. डोंगरकपारीमध्ये बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नयेत.

३. डोंगरकपारीतील अथवा वनालगतच्या शेतातील झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.

४. रात्री डोंगरकपारीतून जाताना हातात टेंभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. त्याऐवजी बॅटरी घेऊन जावे.

५. डोंगरकपारीलगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये.

आगीचा परिणाम असा होतो -

१. गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.

२. वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते.

३. चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात.

४. ती अशक्‍त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात.

५. पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात.

६. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते.

७. जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो.

८. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.

९. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.

१०. कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.

११. विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होतात.

कोट-

आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक त्या शेजारील असलेल्या शेतात पाचट वैगरे पेटवत असतात. त्यामुळे डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. डोंगराजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

- मारुती निकम, परिक्षेत्र वनअधिकारी, फलटण

06कोळकी

दुधेबावी, ता.फलटण येथे भवानी आईच्या डोंगरावर वणवा लागला होता. (छाया: सतीश कर्वे)