शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची ...

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची आग या डोंगरावर भडकली आहे. त्यामुळे ‘नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा’ असे आवाहन या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वनविभागानेही जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी वणवा लागण्याचे प्रकार घडत असताना, हे लोण आता फलटण तालुक्यातही येऊन पोहोचले आहे. दुधेबावी परिसरातील भवानी आईच्या डोंगराला गेले दोन दिवस वणवा लागलेला आहे. भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्याच्या आगीत गवत व वनविभागाने लावलेली अनेक झाडे जाळून खाक झाली आहेत, तर अनेक मोठ्या झाडांनाही झळा बसल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गवत जळाल्याने परिसरातील येथे चरायला नेत असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे, तसेच आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी, अंडी, घरटी जळून खाक होत असल्याने, येथील वनसंपदाही नष्ट होत आहे.

त्यामुळे परिसरात वणव्याचा प्रकार लक्षात आला, तर तातडीने तो विझविण्यासाठी प्रयत्न करावेत व वनविभागाशी संपर्क साधावा. जर कुणी वणवा लावण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा प्रवृत्तींना अटकाव करणे आवश्यक आहे.

हे करू नये -

१. डोंगरकपारीमध्ये स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे.

२. डोंगरकपारीमध्ये बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नयेत.

३. डोंगरकपारीतील अथवा वनालगतच्या शेतातील झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.

४. रात्री डोंगरकपारीतून जाताना हातात टेंभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. त्याऐवजी बॅटरी घेऊन जावे.

५. डोंगरकपारीलगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये.

आगीचा परिणाम असा होतो -

१. गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.

२. वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते.

३. चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात.

४. ती अशक्‍त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात.

५. पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात.

६. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते.

७. जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो.

८. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.

९. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.

१०. कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.

११. विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होतात.

कोट-

आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक त्या शेजारील असलेल्या शेतात पाचट वैगरे पेटवत असतात. त्यामुळे डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. डोंगराजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

- मारुती निकम, परिक्षेत्र वनअधिकारी, फलटण

06कोळकी

दुधेबावी, ता.फलटण येथे भवानी आईच्या डोंगरावर वणवा लागला होता. (छाया: सतीश कर्वे)