शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नावजीनाथांच्या किवळमध्येही डॉल्बी पराभूत्

By admin | Updated: June 1, 2015 00:15 IST

आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

मसूर : मसूरच्या पूर्वेस सुमारे चार किलोमीटर अंतरावर किवळ (ता. कराड) गाव आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या ओढाजोड प्रकल्पामुळे व पाणलोटची अनेक कामे झाल्यामुळे सध्या या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीत सहभागी होऊन आता गावकऱ्यांनी एक पाउल पुढे टाकले असून, डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यापासून गावात कुठेही डॉल्बीचा निनाद ऐकायला येत नसल्याने आबालवृध्दांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.किवळ गावास महाराष्ट्रातून अनेक गावांतून लोक भेटी देऊन येथील पाणलोटच्या कामाचे कौतुक करत आहेत. या गावातील ग्रामस्थांनी लोकसहभाग व शासनाच्या मदतीने पाणलोटची अनेक कामे केली असून, एकेकाळी टँकरग्रस्त असणारे हे गाव टँकरमुक्त केले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री जोतिर्लिंगाचे निस्सीम भक्त संत नावजीनाथांचे किवळ म्हणून या गावाची ख्याती महाराष्ट्रभर आहे. लग्नात डॉल्बीेच्या तालावर तरूणांच्या बरोबरीने वयोवृध्द आणि शेवटी नवरा-नवरीही ठेका धरत असत. डॉल्बीच्या आवाजाने घरांतील भांडी खाली पडत. डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकत असताना संपूर्ण गाव निमूटपणे सर्व सहन करीत असत. पण ‘लोकमत’च्या चळवळीमुळे मानसिकता बदलू लागली आहे. गुळुंबप्रमाणे आपलेही गाव डॉल्बीमुक्त करण्यासाठी किवळच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर)शासन व लोकसहभागातून गावामध्ये अनेक समाजोपयोगी कामे झाली आहेत. आता एक पाउल पुढे टाकून वृध्दांना, आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून गावात डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे. - कल्पना साळुंखे, सरपंच, किवळसंत नावजीनाथांमुळे गावाची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे सर्वजण मिळून आदर्श गाव होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यातूनच आम्ही डॉल्बीबंदीचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. - सुनील साळुंखे, उपसरपंच, किवळ