शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आपापसातील भांडणे दूर ठेवून एकत्र काम करा

By admin | Updated: July 2, 2016 23:53 IST

रामराजे : राष्ट्रवादी तालुका मेळाव्यात ‘मिशन इलेक्शन’ची घोषणा

सातारा : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांची पेरणी गावागावामध्ये झाली पाहिजे. आता सुरुवातीचा काळ राहिलेला नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात तरुणांपर्यंत पवारांचे विचार पोहोचवून त्यांना प्रवाहात आणले पाहिजे. आगामी निवडणुका वेगळ्या आहेत. आत्तापर्यंत सत्तेत राहून निवडणुका जिंकल्या. आता पहिल्यांदाच सत्तेबाहेर राहून निवडणूक लढायची असून, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवण्यासाठी आळस झटकून, आपसातील भांडण विसरून कामाला लागावे,’ असा आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंंबाळकर यांनी दिला. दरम्यान, ‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सातारा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता आणू,’ असा निर्धार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे आयोजित सातारा तालुका मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती सतीश चव्हाण, महिला व बाल कल्याण समिती सभपती वैशाली फडतरे, सदस्य राजू भोसले, जितेंद्र सावंत, किरण साबळे-पाटील, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) कोणतेही आव्हान नेस्तनाबूत करू : शिवेंद्रसिंहराजे भोसले ‘पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार तालुकानिहाय मेळावे होत आहेत. सातारा जिल्हा आणि सातारा तालुका हा त्यांच्या विचाराने राष्ट्रवादीशी बांधला गेलेला आहे. दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता एकवटला की कोणतंही आव्हान आम्ही नेस्तनाबूूत करू, याची मला खात्री आहे,’ असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले. सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीड : शशिकांत शिंदे ‘माझ्या पहिल्या विजयात दिवंगत अभयसिंहराजे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात आ. शिवेंद्रसिंहराजे सातारा तालुक्याची धुरा तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत. आपला बालेकिल्ला काल होता, आज आहे आणि कायम राहणार आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चीड, नाराजी आहे. कट कारस्थाने करून सहकार मोडीत काढण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत.’