शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

वारकऱ्यांच्या सेवेत कसूर नको

By admin | Updated: July 2, 2015 22:38 IST

फलटण आढावा बैठक : सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना सुनावले

फलटण : ‘ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सूचनांची अंमलबजावणी करावी,’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला नियोजनासंदर्भात फलटण येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. नियोजनाच्या आढावा बैठकीत सुविधांच्या अपूर्णतेबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधित विभागप्रमुखांना व शासकीय अधिकाऱ्यांना सूचना करून तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले.लाखो भाविक वारकऱ्यासह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पाच दिवसांच्या मुक्कामासह सातारा जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. या कालावधीतील शासकीय नियोजनाचा आढावा घेण्यासाठी फलटण येथील सांस्कृतिक भवनात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे माणिकराव सोनवलकर, आनंदराव शेळके-पाटील, रमेश धायगुडे-पाटील व यांच्यासह फलटण उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार विवेक जाधव, गटविकासाधिकारी नीलेश काळे उपस्थित होते.जिल्ह्यातील संपूर्ण पालखी मार्गावर रस्ते रुंदीकरण, साईडपट्ट्या भरून घेणे, रस्त्याच्या कडेची झाडेझुडपे काढणे, रस्त्यावरील खड्डे भरणे, पर्यायी रस्ते दुरुस्ती करणे, तरडगाव येथील अर्धवट उड्डाण पुलाच्या बांधकामातील बाहेर आलेल्या सळ्या वाकवून घेणे, उभे रिंगण होणाऱ्या ठिकाणी रोड दुभाजक भरून घेणे, ओढ्यावरील साईडपट्ट्या भरून बॅरिगेट करणे बाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या.आरोग्य विभागास सूचना देताना वैद्यकीय अधिकारी वाढवा, प्रथमोपचार पेट्या उपलब्ध करून देणे, पाणी निर्जंतुक करणे, रुग्णवाहिकांचे योग्य नियोजन करावे, स्वच्छतेचे फलक लावा, मोबाईल टॉयलेटमध्ये स्वच्छता राखण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.पालखी मार्ग व मुक्कामाच्या गावात वाहतुकीत अडथळा येऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने व गावाबाहेरच एसटीची वाहतूक करण्याबाबत सूचना करण्यात आल्या तर पालखी काळात लोणंद, फलटण परिसरात विजेचे लोडशेडिंग न करण्याच्या सूचना वीजवितरण कंपनीला देण्यात आल्या.नीरा कॅनॉलवरील फलटण येथील दोन्ही पुलांवरमध्ये दुभाजक करून एका बाजूने वारकरी व दुसऱ्या बाजूने वाहने जाण्याबाबतची सोय करण्याचे सांगून, वाहतुकीतील अडथळा दूर करण्यासाठी क्रेनची व्यवस्था करावी व नगरपालिकेने कंट्रोल रूम करून माहिती घेण्याचेही आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.सोहळ्याच्या निमित्ताने १२ हजार लिटरचे ४ टँकर रॉकेल व ५००० गॅस सिलिंडर मागविले असल्याचे फलटणचे तहसीलदार विवेक जाधव यांनी सांगितले.यावेळी पालखी सोहळ्याचे विश्वस्त सरनाईक यांनी स्वागत कमानीचा अडथळा, पालखी तळावर दुपारांचे पाण्याच्या टँकरची गरज, पाण्यातील ‘टीसीएल’चे योग्य प्रमाण याबाबत सूचना केली. (प्रतिनिधी)३२ टँकरची सोय पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ३२ टँकरचे नियोजन केले आहे. दिंडीचालकांच्या टँकरर्सना पाणी पुरवठ्यासाठी लोणंद, तरडगाव व येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, फलटण नगरपालिकेची पाणीपुरवठा योजना व खासगी विहिरींमधून पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर नीरा उजवा कालव्यामध्ये दि. १४ जुलैपासूनच पाणी सोडले जाणार आहे.