शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

‘डबल इंजिन’ म्हणून हेटाळणी नको वाटत

By admin | Updated: September 5, 2014 00:19 IST

शिक्षक दाम्पत्याची समस्या : दोघांच्या नोकरीतकुटुंब, मुलांकडं होतंय दुर्लक्षे

मोहन मस्कर-पाटील -सातारा -शिक्षक दाम्पत्य अतिशय सुखकारक आणि भाग्यवान मानले जात असलेतरी समाजाच्या नजरेतून ‘डबल इंजिन’ (दोन पगार घेणाऱ्या व्यक्ती) म्हणून होणारी हेटाळणी नको वाटते, अशी प्रतिक्रिया अनेक शिक्षक दाम्पत्यांची आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने अनेक शिक्षक दाम्पत्यांच्या समस्या, निर्माण होणाऱ्या अडचणी या अनुषंगाने बोलल्यानंतर अनेकांनी समाजाच्या नकारात्मक दृष्टिकोनावर भाष्य केले.सातारा जिल्ह्यात आजमितीस आठ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक आहेत. यापैकी पंधराशेच्या आसपास शिक्षक दाम्पत्य आहेत. जिल्हा परिषद वगळता अन्य खासगी शिक्षण संस्थांमध्येही शिक्षकांची संख्या जिल्हा परिषद शाळांइतकीच तितकीच आहे. अनेकदा काही ठिकाणी पत्नी जिल्हा परिषद शाळेत तर पती खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक अथवा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. काही प्रमाणात हे चित्र उलटेदेखील आहे. रयत, स्वामी विवेकानंद, भारती विद्यापीठ आदी मोठ्या संस्थांमध्येही काही शिक्षक दाम्पत्य आढळून येतात. या संस्थामंध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या काही शिक्षकांच्या शिक्षिका पत्नी अथवा शिक्षिकांचे शिक्षक पती इतरत्र कार्यरत आहेत. जिल्हा परिषद आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक दाम्पत्यांची आकडेवारी लक्षात घेता ती अडीच हजारांच्या पुढे आहे.शिक्षक दाम्पत्य म्हणजे समाजात फार भाग्यवान मानले जाते. दोन पगार असल्यामुळे समाजामध्ये त्यांची तुलना ‘डबल इंजिन’ म्हणून केली जाते. ही बाब शिक्षकांना नेहमीच खटकत असल्याचे अनेक शिक्षक सांगतात. त्याला कारणेही अनेक आहेत. गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे वाढलेले पगार आणि त्यामुळे घरी आलेली संपन्नता शेजारी आणि ते जेथे राहतात त्यांच्या नजरेतून कधीच सुटलेली नाही. घरी ऐश्वर्य नांदत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. काही शिक्षक मंडळी वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत. शिक्षक दाम्पत्य असण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही तितकेच आहेत. आर्थिक संपन्नता दारी येत असलीतरी अनेकदा मुलांच्या शिक्षणासाठी मात्र खासगी शिकवणीवर भर द्यावा लागतो. ज्या खेडेगावातून पुढे आलेले असतो, त्या परिसराकडे अथवा येथील माणसांकडे लक्ष देणेही फारसे जमत नाहीत. ही देखील खंत अनेक शिक्षक दाम्पत्यांची आहे. पूर्वी बदल्या होताना एकाच तालुक्यात शिक्षक दाम्पत्यांना नियुक्ती मिळावी म्हणून आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. आता नवीन नियमावलीमुळे ही समस्या थोडीफार कमी झाली आहे.शिष्यवृत्तीचे यश हे दाम्पत्यामुळेचसातारा जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये ज्या शाळेतील मुले चमकली त्यापाठीमागे शिक्षक दाम्पत्यच होती. पती-पत्नी शिक्षक असल्यामुळे गुणवत्तापूर्ण अध्ययन करतात, त्यामुळेच शिष्यवृत्ती निकालाचे चित्र नेहमीच चांगले दिसले. जावळी तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये हे चिक्ष पाहायला मिळाले. समाजातील काही घटकांना शिक्षकांना मिळणारे वेतन दिसते. मात्र, त्यामागे शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या, अडचणी आणि त्याचबरोबर अशैक्षणिक कामांचा ढिगारा कधी दिसत नाही. याची नेहमीच खंत वाटते. नोकरी करत असताना अनेकदा कुटुंबांकडे दुर्लक्ष होते. - शामराव वाघमोडे, भारती वाघमोडे (कुमठे)पती-पत्नी शिक्षक आहेत, म्हणून आमच्या कुटुंबांमध्ये अथवा आम्हाला स्वत:ला त्याचा अभिमान वाटतो. मात्र, समाजाचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असल्यासारखे वाटते. शिक्षकांच्या सामाजिक सुरक्षिततेचाही विचार करायला हवा असे, आम्हाला वाटते. - विठ्ठल माने, रजनी माने (वाई)