शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:08 IST

सातारा : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टा च्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचे प्रशासन योग्यरीत्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी आपली मते परखडपणे व्यक्त केली. न्यायव्यवस्थेबाबत उघडपणे बोलणे हे धक्कादायक आहे. तर काहींनी हा वाद अंतर्गत आपापसात मिटवावा. न्यायव्यवस्थेमध्ये सामाजिकीकरण आणू ...

सातारा : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाचे प्रशासन योग्यरीत्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप केला. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वकिलांनी आपली मते परखडपणे व्यक्त केली. न्यायव्यवस्थेबाबत उघडपणे बोलणे हे धक्कादायक आहे. तर काहींनी हा वाद अंतर्गत आपापसात मिटवावा. न्यायव्यवस्थेमध्ये सामाजिकीकरण आणू नये, अन्यथा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, अशी भीतीही वकिलांनी व्यक्त केली.न्यायव्यवस्था ही भारतीय लोकशाहीचा स्तंभ आहे. या स्तंभावरच लोकांचा विश्वास राहिला आहे. बाकीच्या ठिकाणचा कमी होत चालला आहे. आणि त्याच संस्थेमध्ये जर असे प्रकार व्हायला लागले तर या गोष्टीचा परिणाम न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडण्यावर होईल. त्यानंतर लोकशाहीला व कायदे पाळण्याला आणि न्यायव्यवस्थेला हे सगळे हानिकारक आहे. हे प्रकार आपापसात मिटविले गेले पाहिजेत. त्याचे सामाजिकरण होऊ नये, अन्यथा हे न्यायव्यवस्थेला हानिकारक होईल.- अ‍ॅड. अशोक जाधव,जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्षन्यायव्यवस्था ही चौथा आणि अतिशय विश्वासू स्तंभ आहे. आजही भारतामध्ये न्यायव्यवस्थेला आदर आहे, असे असताना न्याय व्यवस्थेविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका करणे असमर्थनीय आहे.तसेच ही न्यायव्यवस्थेसाठी धक्कादायक बातमी आहे.- अ‍ॅड. चंद्रकांत बेबलेसातारा.सर्व न्यायमूर्ती प्रचंड अनुभवी आहेत. त्यांची अतंर्गत घुसमट ही शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांपुढे मांडली. याचा येणाºया काळात खूप परिणाम होणार आहे. हा विषय संपणे गरजेचे आहे. नाहीतर कुणाचाही न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही. हे लोकशाहीला मारक होईल.- अ‍ॅड. संग्राम मुंढेकर,साताराभारताच्या संविधानाने संसद, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि प्रसार माध्यमांना स्वांतत्र दिले आहे. त्यांना त्यांचे काम करत असताना काही हक्क दिले आहे. ते आपापले काम करत असताना संविधानाच्या मूल्यांवर गदा येत असेल तर निश्चित हे लोकशाहीसाठी घातक आहे. व्यवस्थेतील त्रुटी त्यांच्या पातळीवर सोडवायला हव्या होत्या. मात्र तसे झाले नाही हे दुर्देव.-अ‍ॅड. मेघराज भोईटेसातारालोकशाहीत सर्वात जास्त विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायाधीशांनीच न्याय व्यवस्थेबद्दल माध्यमांमध्ये प्रश्न निर्माण करणे खेदजनक आहे. हा प्रकार म्हणजे एकमेकांच्या अंतर्गत कुरघोड्या असण्याची शक्यता आहे. त्या चव्हाट्यावर यायला नको होत्या. यामुळे सर्वसामान्यांपुढे न्याय व्यवस्थेबाबत वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.-अ‍ॅड. मुकुंद सारडासातारा