शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

शेती माल विकण्याची करू नका घाई

By admin | Updated: December 23, 2015 01:31 IST

जिल्हा बँकेचे अवाहन : नाबार्ड,ओरिगो अन् जिल्हाबॅकेकडून होणार शेतकऱ्याला आर्थिक मदत

वाठार स्टेशन : कर्जात अडकलेला शेतकरी कर्ज परत फेडण्यासाठी नेहमीच शेतातील माल विकण्याची घाई करतो. पर्यायाने बाजारपेठेत दर नसला तरी हा माल काडीमोल किमतीत विकण्याची त्याची तयारी असते; परंतु आता शेतकऱ्याचा हा शेतीमाल गावातच असलेल्या विकास सेवा सोसायट्यांंच्या गोडावूनमध्ये ठेवून त्या शेतीमालावर ७५ टक्के रक्कम घेऊ शकणार आहेत. शिवाय आपला शेतीमाल जेव्हा बाजारपेठेत दर मिळेल त्या वेळी विकू शकणार आहेत, ही किमया आता जिल्हा बँक,नाबार्ड आणि ‘ओरिगो’ कमोडेटीज यांनी वेअरहाऊस रिसिप्ट फायनांंन्स या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.या कराराद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वेअरहाऊस रिसिप्ट फायनांन्स देण्याबाबतची योजना राबविण्याचा निर्धार जाहीर केला आहे.शेतीत उत्पन्न काढल्यानंतर शेतकरी लगेच माल विकण्याची घाई करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने आपला माल व्यापाऱ्यांना द्यावा लागतो. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द सोसायटीच्या कार्यालयात या योजनेबाबत नुकताच शेतकरी जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने,व्यवस्थापक डी.जी पोपळे,आर. के गायकवाड,ओरिगोचे निकम,डी.जी. ओकाटे,संदीप भिसे,मंगेश काटकर,भाग्यवंत कणसे,भागवत घाडगे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कदम,विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष योगेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.आर. के. गायकवाड म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत शेतकऱ्यांमध्ये या प्रकल्पाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. आगामी हंगामामध्ये शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी पीएसीएसची स्थापना करण्यात येणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून राज्यभर ‘वेअरहाऊस रिसिप्ट फायनांन्स’ ची उच्च क्षमता स्थापित करण्यावर भर देण्यात येणार आहे. हा उपक्रम २० पीएमसीएस स्थापन करण्यासह जवळपास १५ हजार शेतकऱ्यांंना साह्य केले जाणार आहे. (वार्ताहर) महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात सुरूवात शेतकऱ्यांना कच्चा माल,उत्पादन वितरण आदीमध्ये साह्य करण्याच्या हेतूने विविध व्यवसायामध्ये कार्यरत राहण्यासाठी पीएसीएसला प्रोत्साहित करण्यामध्ये सहभागी राहणार आहेत. पहिल्या टप्यातील आंध्रप्रदेश,तेलंगणा या राज्यातील यशानंतर महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यातील सुरुवात झाली आहे.