शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

तारळी प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नका

By admin | Updated: October 19, 2015 23:42 IST

शिवेंद्रसिंंहराजेंनी ठणकावले : सातारा तालुक्यातील लोकांचे तातडीने पुनर्वसन करा

सातारा : ‘तारळी धरणासाठी सातारा तालुक्यातील ठोसेघर, खालची पवारवाडी, वरची पवारवाडी, मोरेवाडी आदी गावांतील लोकांच्या जमिनी गेल्या असून, अद्यापही या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, तातडीने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू; मगच बोपोशी-ठोसेघर तळ रिंगरोडचा सर्व्हे करू, असे आश्वासन जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दिले. तारळी प्रकल्पासाठी ठोसेघर, खालची पवारवाडी, वरची पवारवाडी, मोरेवाडी आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय असवले यांच्या दालनात तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला असवले यांच्यासह तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर मोरेवाडीचे सरपंच बजरंग मोरे, ठोसेघरचे माजी सरपंच सीताराम गायकवाड, वरची पवारवाडीचे माजी सरपंच हणमंत पवार, शंकर गायकवाड, जोतिराम गायकवाड, संतोष गायकवाड, किसन पवार, लक्ष्मण गायकवाड, सर्जेराव पवार, नामदेव दळवी, किसन बेडेकर, किसन मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तारळी प्रकल्पग्रस्तांनी तक्रारींचा पाढा वाचला. पवारवाडी (वरची) येथील प्रकल्पग्रस्तांना मायणी येथे भूखंड दिले असून, या भूखंडांवर स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे तर, उर्वरित भूखंड प्रकल्पग्रस्तांना देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. या भूखंडांवरील अतिक्रमण हटवून तातडीने भूखंड ताब्यात मिळावेत, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. तसेच बोपोशी-ठोसेघर तळ रिंगरोडसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळावा, अशीही मागणी केली. वरची पवारवाडी-खालची पवारवाडी रस्त्याचे काम पुनर्वसनाच्या निधीतून करावे. ठोसेघर येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सूर्याचीवाडी, ता. खटाव करण्यात यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. (प्रतिनिधी)आमदारांची सक्त ताकीद...प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ‘या प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता रिंगरोडचे काम केले जात आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा. ज्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन निश्चित केले आहे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करा,’ अशी सक्त ताकीद आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार येत्या आठवडाभरात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हा पुनर्वसन अधिकारी असवले यांनी बैठकीत दिले.