शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तारळी प्रकल्पग्रस्तांचा अंत पाहू नका

By admin | Updated: October 19, 2015 23:42 IST

शिवेंद्रसिंंहराजेंनी ठणकावले : सातारा तालुक्यातील लोकांचे तातडीने पुनर्वसन करा

सातारा : ‘तारळी धरणासाठी सातारा तालुक्यातील ठोसेघर, खालची पवारवाडी, वरची पवारवाडी, मोरेवाडी आदी गावांतील लोकांच्या जमिनी गेल्या असून, अद्यापही या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, तातडीने पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू; मगच बोपोशी-ठोसेघर तळ रिंगरोडचा सर्व्हे करू, असे आश्वासन जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दिले. तारळी प्रकल्पासाठी ठोसेघर, खालची पवारवाडी, वरची पवारवाडी, मोरेवाडी आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय असवले यांच्या दालनात तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला असवले यांच्यासह तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासमोर मोरेवाडीचे सरपंच बजरंग मोरे, ठोसेघरचे माजी सरपंच सीताराम गायकवाड, वरची पवारवाडीचे माजी सरपंच हणमंत पवार, शंकर गायकवाड, जोतिराम गायकवाड, संतोष गायकवाड, किसन पवार, लक्ष्मण गायकवाड, सर्जेराव पवार, नामदेव दळवी, किसन बेडेकर, किसन मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तारळी प्रकल्पग्रस्तांनी तक्रारींचा पाढा वाचला. पवारवाडी (वरची) येथील प्रकल्पग्रस्तांना मायणी येथे भूखंड दिले असून, या भूखंडांवर स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे तर, उर्वरित भूखंड प्रकल्पग्रस्तांना देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत आहे. या भूखंडांवरील अतिक्रमण हटवून तातडीने भूखंड ताब्यात मिळावेत, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. तसेच बोपोशी-ठोसेघर तळ रिंगरोडसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा मोबदला मिळावा, अशीही मागणी केली. वरची पवारवाडी-खालची पवारवाडी रस्त्याचे काम पुनर्वसनाच्या निधीतून करावे. ठोसेघर येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सूर्याचीवाडी, ता. खटाव करण्यात यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. (प्रतिनिधी)आमदारांची सक्त ताकीद...प्रकल्पग्रस्तांचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीस उपस्थित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ‘या प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता रिंगरोडचे काम केले जात आहे. प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावा. ज्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन निश्चित केले आहे, त्याच ठिकाणी पुनर्वसन करा,’ अशी सक्त ताकीद आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार येत्या आठवडाभरात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हा पुनर्वसन अधिकारी असवले यांनी बैठकीत दिले.