शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

कामगारहिताशी तडजोड नको

By admin | Updated: February 27, 2015 00:18 IST

सातारा : भारतीय मजदूर संघाचा इशारा

सातारा : ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली विदेशी भांडवलदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कामगार कायद्यात कामगारहिताचा बळी देणारे बदल करण्यास प्रारंभ केला आहे. कामगार हिताशी छेडछाड केल्यास होणाऱ्या परिणामांना मोदी सरकारच जबाबदार राहील, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस विकास खाडे यांनी दिला. कामगार कायद्यांतील बदलांना विरोध करण्यासाठी संघटनेतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. राजवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा पोलीस मुख्यालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे झालेल्या द्वारसभेत खाडे बोलत होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेंद्र काळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शामराव गोळे, जिल्हाध्यक्षा तारका शाळीग्राम, जिल्हा कार्याध्यक्ष साहेबराव वाघमळे यांनी तसेच इतरांनी कामगारांना मार्गदर्शन केले.कायद्यात बदल करून संघटित कामगारांना असंघटित क्षेत्रात ढकलायचे आणि असंघटित कामगारांंना सामाजिक सुरक्षेचे गाजर दाखवायचे, असा खेळ मोदी सरकारने सुरू केल्याचा आरोप करून खाडे म्हणाले, ‘राज्यातील फडणवीस सरकार तर ‘चहापेक्षा किटली गरम’ अशा पद्धतीने वाटचाल करीत आहे. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीच्या हक्कासाठी सध्या किमान २० कामगारसंख्या आहे. त्याऐवजी किमान ५० कामगारसंख्या ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी) खेळ चालू देणार नाहीपूर्वी ज्या उद्योगात ३०० ते ५०० कामगार काम करीत असत, तोच उद्योग आता यांत्रिकीकरण, संगणकीकरणातून ३५ ते ४० कामगारांत चालविला जातो. कायद्यात बदल केल्यास लेबर कोर्टाकडे जाणेही कठीण होणार आहे. कामगारांचे हितरक्षण म्हणून भारतीय मजदूर संघ हे खेळ चालू देणार नाही.