शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

बंधने घालू नका, आम्ही झाडे वाढवू

By admin | Updated: September 18, 2015 23:37 IST

स्थानिकांची मागणी : पठारावर जागोजागी वनकार्यालये उभारा--...पण अगोदर माणूसही वाचवा!

प्रमोद सुकरे/अरुण पवार ल्ल कऱ्हाड/ पाटण  --‘पर्यावरण व वन्यजीवांचे रक्षण करताना लोकांचे जीवन सुरक्षित राहिले पाहिजे. आमच्या भोवताली कोंडाळे करू नका. अगोदर लोकांना विश्वासात घ्या. त्यांचे रक्षण करा; बंधने घालू नका, मग आम्हीच झाडे वाढवू, असे आवाहन माजी मंत्री व विक्रमसिंह पाटणकर यांनी केले आहे.पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करणार कोण आणि नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. लोकांनी नुकसानीची किंवा वन्यप्राण्याने हल्ला केल्याची खबर द्यायला पाटणला जायचे म्हटले तर ५० ते ६० किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. कोयना येथे वन्यजीव विभागाचे कार्यालय आहे. तेथील अधिकारी म्हणतात की, ‘जर वन्यप्राण्यांने हल्ला किंवा पिकांचे नुकसान केल्यास आम्ही भरपाई देतो.’ मात्र कोयनेच्या कार्यालयातील वनकर्मचारी सतत व्याघ्र प्रकल्पात असतात. कार्यालयमध्ये एकच कर्मचारी असतो. मग यांना शोधायचे कुठे, असा प्रश्न लोकांसमोर पडतो.स्थानिक जनतेच्या हितासाठी प्राधान्य देताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर जागोजागी वन कार्यालये उभी करावी, तिथे मोठ्या प्रमाणात वनकर्मचाऱ्यांची उपलब्धतता करावी. म्हणजे स्थानिक जनतेला जर वन्य प्राण्यांकडून त्रास झाला, तर तातडीने याची दखल घेण्यात येईल आणि नुकसानभरपाई देता येईल, असाही एक पर्याय सुचविण्यात येत आहे. म्हणूनच जर कार्यालये, वनकर्मचारी व्याघ्र प्रकल्पात नसतील तर काय लोकांना वन्यप्राण्यांच्या जबड्यात देणार काय, असा सवाल व्यक्त होत आहे. वन्यजीवच्या कडक कायद्याचा किस्सा --गावकऱ्यांनी स्वत:च्या शेतातील चिंचेची दोन झाडे सरपणासाठी तोडली. या झाडांवर ३२० वटवाघळांची घरे होती. याबाबत पर्यावरणप्रेमींनी तक्रार केली. या तक्रारीची गंभीर दखल घेतली गेली. गावकऱ्यांना वनविभागाच्या कडक कायद्याला सामोरे जावे लागले. तब्बल ४५० जणांना अटक करण्यात आली.