शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

तासगावातील दादागिरीची सीआयडी चौकशी करा

By admin | Updated: August 23, 2015 23:38 IST

संजय पाटील : दहा वर्षांतील काळा इतिहास समोर येईल; पूर्वी सत्तेत असणाऱ्यांची टगेगिरी

सांगली : राष्ट्रवादीने माझ्यावर दादागिरीची टीका करण्यापेक्षा गेल्या दहा वर्षातील तासगाव तालुक्यातील दादागिरीची सीआयडी चौकशी करावी, त्यातून काही लोकांचा काळा इतिहास समोर येईल, असा प्रतिटोला खासदार संजय पाटील यांनी रविवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लगावला. ते म्हणाले की, ज्यांनी यापूर्वी अमर्याद सत्ता उपभोगली, त्यांनीच निवडणुकांमध्ये टगेगिरी केली. गेल्या दहा वर्षांची चौकशी केली, तर कुणी गुंडांना अभय दिले, कुणी बलात्कारासारख्या गुन्ह्यांवर पांघरुण घातले, हा सर्व काळा इतिहास लोकांसमोर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी इतिहास तपासून घ्यावा. आपण आजवर कोणावरही पावशेर ठेवलेले नाही. निश्चितपणे कुणी मदत केली असली तरी, आम्ही कधी मदतीचे श्रेय घेतले नाही. श्रेयवादाचे राजकारण आम्हाला जमले नाही. सध्याच्या स्थितीत भावनांच्या लाटेवर स्वार होऊन राजकारण करणेही टाळले. दुसरीकडे विरोधकांनी भावनांचा गैरवापर केला. महिला आमदारांवर कोणत्याही प्रकारची टीका करणे आपणास योग्य वाटत नाही. तेवढा शिष्टाचार आम्ही पाळला आहे. मात्र ज्यांना चौकशी करायची आहे, त्यांनी दहा वर्षांच्या इतिहासाची चौकशी करावी. सरकार दुष्काळाबाबत काहीच करीत नसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी पतंगराव कदम यांनी केला होता. त्याविषयी खासदार पाटील म्हणाले की, सत्तेत नसल्यामुळे त्यांना सगळ्याच गोष्टी चुकीच्या वाटत आहेत. वास्तविक सरकार संवेदनशील आहे. दुष्काळसदृश परिस्थितीत सिंचन योजना तातडीने चालू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. टेंभू, ताकारी योजना सुरू करून आता शासनाने म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठाही जोडला आहे. येत्या चार दिवसात विसापूर-पुणदी योजनाही कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील तलाव, पाझर तलाव, बंधारे ३० टक्क्यांपर्यंत भरून घेण्याचे नियोजन झाले आहे. दोन महिन्यांच्या वीजबिलाचा भारही शासनाने सोसला आहे. सिंचन योजना ज्या गावांमध्ये पोहोचत नाहीत, अशा गावांमध्ये तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याचेही काम सुरू झालेले आहे. त्यामुळे शासनस्तरावर चांगल्या पद्धतीने उपाययोजना सुरू आहेत. सिंचन योजनांच्या निधीबाबतही शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. भविष्यात निधी उपलब्ध होण्याच्यादृष्टीने आम्ही पाठपुरावा करणार आहोत. प्रादेशिक दुजाभाव शासनाने केलेला नाही. त्यामुळेच टंचाई जाहीर नसतानाही शासनाने सिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, याची खबरदारी आता शासन घेत आहे. (प्रतिनिधी)