शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचं दिवाळं !

By admin | Updated: October 24, 2016 00:41 IST

शेतकरी आर्थिक संकटात : उत्पादनही घटले; क्विंटलला अडीच हजार रुपये दर

कोपर्डे हवेली : गत वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तर दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय सोयाबीनचे बाजारपेठेतील दरही पडले असल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. जिरायती आणि बागायती शेतीमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी जादा पावसाने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पाणी शेतात साचून राहिल्याने कुजून गेले. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनाचा उतारा १४ क्विंटल होता. तर सध्या उतारा ५ ते ८ क्विंटल पडत आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. तर दीपावली काही दिवसांवर आल्याने खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करू लागले आहेत. दर नसल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. १४ फॅट असलेल्या सोयाबीनचा क्विंटलचा २ दोन हजार ७०० रुपये आहे. हेच दर ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांमध्ये वेगवेगळे आहेत. त्यामध्ये ५० ते १०० रुपयांचा फरक दिसत आहे. हाच दर तीन ते चार महिन्यांपूर्वी ४ हजार ८०० पर्यंत होता. १७ फॅट असणाऱ्या सोयाबीनला क्विंटलमागे १५ ते १७ किलोची तूट धरून दर देत आहेत. वाळलेल्या सोयाबीनला दर चांगला भेटतो. दर चांगला मिळण्यासाठी फॅट चांगली लागते, असे कारण व्यापारी सांगत आहेत. दर कधी वाढतील हे सध्या सांगता येत नसल्याने आणि पैशाची गरज असल्याने अनेक शेतकरी सोयाबिनची विक्री करत आहेत. प्रत्येक दिवशी दर बदलत आहेत. काही शेतकरी विक्री करावी का नको, अशा दुहेरी विचारात आहेत. कित्येक वर्षे शासनाचे धोरण सोयाबीनच्या बाबतीत उदासीन असल्याने आणि दर कोण ठरवते, याची माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्यात संताप दिसून येत आहे. (वार्ताहर) सोयाबीन ठेवायचं की विकायचं ? दीपावलीचा सण काही दिवसांवर आल्याने अनेक शेतकरी गरजेसाठी सोयाबीनची विक्री करत आहेत. तर उत्पादन घटल्याने सोयाबीन शेती तोट्यात गेली आहे. दरामध्ये सातत्य राहत नाही. त्यामुळे विक्री करावी का नको, या मानसिकेत अनेक शेतकरी आहेत. काही शेतकरी उत्पादीत केलेले सोयाबीन घरीच ठेवण्याच्या मानसिकतेत आहेत. ज्यावेळी दर वाढेल, त्यावेळी सोयाबीन विक्रीसाठी आणण्याचा विचार आहे. दर कधी वाढेल हे सांगता येत नाही. पेंडची निर्यात घटल्याचा परिणाम... सोयाबीनचे गाळप होऊन त्यातून तयार झालेली पेंड निर्यात केली जाते. मात्र, सध्या सोयाबीनच्या पेंडची निर्यात घटली आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील पेंडची किंमत जास्त आहे. त्यामुळे ही निर्यात घटली असून, त्याचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. पेंडची निर्यात जास्त झाल्यास दर वाढतो. मात्र, सध्या निर्यात कमी असल्याने सोयाबीनचा दर कमी झाला असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सोयाबीनचे उत्पादन जगभर घेतले जाते. जगभरात दरवर्षी सुमारे ३ हजार लाख टन सोयाबीन पिकते. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका १ हजार १०० लाख टन, अर्जंेटिना ६०० लाख टन, ब्राझील ९०० लाख टन, इतर राष्ट्रे ५०० लाख टनांपर्यंत या पिकाचे उत्पादन निघते. त्या तुलनेत भारतामध्ये फक्त ११० लाख टन सोयाबीन उत्पादीत होते.