शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनचं दिवाळं !

By admin | Updated: October 24, 2016 00:41 IST

शेतकरी आर्थिक संकटात : उत्पादनही घटले; क्विंटलला अडीच हजार रुपये दर

कोपर्डे हवेली : गत वर्षाच्या तुलनेत सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. तर दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय सोयाबीनचे बाजारपेठेतील दरही पडले असल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. जिरायती आणि बागायती शेतीमध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी जादा पावसाने सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पाणी शेतात साचून राहिल्याने कुजून गेले. गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनाचा उतारा १४ क्विंटल होता. तर सध्या उतारा ५ ते ८ क्विंटल पडत आहे. उत्पादन खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. तर दीपावली काही दिवसांवर आल्याने खर्चासाठी शेतकरी सोयाबीनची विक्री करू लागले आहेत. दर नसल्याने त्याची विक्री कवडीमोल दराने होत आहे. १४ फॅट असलेल्या सोयाबीनचा क्विंटलचा २ दोन हजार ७०० रुपये आहे. हेच दर ठिकठिकाणच्या व्यापाऱ्यांमध्ये वेगवेगळे आहेत. त्यामध्ये ५० ते १०० रुपयांचा फरक दिसत आहे. हाच दर तीन ते चार महिन्यांपूर्वी ४ हजार ८०० पर्यंत होता. १७ फॅट असणाऱ्या सोयाबीनला क्विंटलमागे १५ ते १७ किलोची तूट धरून दर देत आहेत. वाळलेल्या सोयाबीनला दर चांगला भेटतो. दर चांगला मिळण्यासाठी फॅट चांगली लागते, असे कारण व्यापारी सांगत आहेत. दर कधी वाढतील हे सध्या सांगता येत नसल्याने आणि पैशाची गरज असल्याने अनेक शेतकरी सोयाबिनची विक्री करत आहेत. प्रत्येक दिवशी दर बदलत आहेत. काही शेतकरी विक्री करावी का नको, अशा दुहेरी विचारात आहेत. कित्येक वर्षे शासनाचे धोरण सोयाबीनच्या बाबतीत उदासीन असल्याने आणि दर कोण ठरवते, याची माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्यात संताप दिसून येत आहे. (वार्ताहर) सोयाबीन ठेवायचं की विकायचं ? दीपावलीचा सण काही दिवसांवर आल्याने अनेक शेतकरी गरजेसाठी सोयाबीनची विक्री करत आहेत. तर उत्पादन घटल्याने सोयाबीन शेती तोट्यात गेली आहे. दरामध्ये सातत्य राहत नाही. त्यामुळे विक्री करावी का नको, या मानसिकेत अनेक शेतकरी आहेत. काही शेतकरी उत्पादीत केलेले सोयाबीन घरीच ठेवण्याच्या मानसिकतेत आहेत. ज्यावेळी दर वाढेल, त्यावेळी सोयाबीन विक्रीसाठी आणण्याचा विचार आहे. दर कधी वाढेल हे सांगता येत नाही. पेंडची निर्यात घटल्याचा परिणाम... सोयाबीनचे गाळप होऊन त्यातून तयार झालेली पेंड निर्यात केली जाते. मात्र, सध्या सोयाबीनच्या पेंडची निर्यात घटली आहे. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतातील पेंडची किंमत जास्त आहे. त्यामुळे ही निर्यात घटली असून, त्याचा परिणाम सोयाबीनवर होत आहे. पेंडची निर्यात जास्त झाल्यास दर वाढतो. मात्र, सध्या निर्यात कमी असल्याने सोयाबीनचा दर कमी झाला असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सोयाबीनचे उत्पादन जगभर घेतले जाते. जगभरात दरवर्षी सुमारे ३ हजार लाख टन सोयाबीन पिकते. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका १ हजार १०० लाख टन, अर्जंेटिना ६०० लाख टन, ब्राझील ९०० लाख टन, इतर राष्ट्रे ५०० लाख टनांपर्यंत या पिकाचे उत्पादन निघते. त्या तुलनेत भारतामध्ये फक्त ११० लाख टन सोयाबीन उत्पादीत होते.