शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीमुळे विकासकामांवर परिणाम झाला आहे. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक सकारात्मक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीमुळे विकासकामांवर परिणाम झाला आहे. आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक सकारात्मक आणि परिणामकारक काम दिसेल, असा विश्वास पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.

येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी शनिवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण केले. आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री म्हणाले, मागील जानेवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडी झाल्या आणि पुढच्या दोन महिन्यातच कोरोनाचा कहर माजला. विकास कामावर खर्च करण्यात येणारा बहुतांश निधी कोरोना महामारी उपाययोजनांमध्ये खर्च करावा लागला. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम झालेला आहे. जिल्हा परिषद सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांना काम करताना अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला अधिकचा निधी मिळावा, अशी मागणी या बैठकीमध्ये सदस्यांनी केली. या अनुषंगाने आम्ही अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. याचे सकारात्मक परिणाम निश्चितपणे भविष्य काळामध्ये पहायला मिळतील.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीबाबत नाराजी व्यक्त केली जात असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता पालकमंत्री म्हणाले, अशी कुठलीही तक्रार या बैठकीत आली नाही. मात्र, पक्षाच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या तसेच सदस्यांच्या बैठका वारंवार घेतल्या जात होत्या. मात्र, कोरोनामुळे त्यावर निर्बंध घालावे लागले. जिल्हा परिषदेची बैठक घेण्याआधी पार्टी मीटिंग घेण्याची पद्धत होती. मात्र, कोरोना काळात ती खंडित झालेली आहे. या बैठकीमुळे विकासकामांच्या अनुषंगाने सभागृहात विचारायचे प्रश्न तसेच इतर बाबींबाबत सविस्तर चर्चा होत असे. मात्र सध्या तसे होत नाही. आता याबाबत पक्षाने अधिक दक्षता घेतलेली आहे.

गैरहजर सदस्यांची पाठराखण

या बैठकीला जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ हे अनुपस्थित होते, असे सांगतानाच पालकमंत्र्यांनी मुद्दाम कोणी गैरहजर राहत नाही, असे स्पष्ट करीत धुमाळ यांची पाठराखण केली.

(बैठकीची दुसरी बातमी थोड्याच वेळात)