शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

जि. प. सभापतिपदांची पाडव्यादिनीच ‘गुढी’!

By admin | Updated: March 26, 2017 22:42 IST

अजित पवार : नेत्यांसोबत मुंबईत बैठक घेणार; १२ सदस्यांना संधी देण्याचे संकेत

सातारा : ‘जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी दि. १ एप्रिल रोजी होणार आहेत. मात्र, सभापती कोण असणार, हे गुढीपाडव्याच्या सायंकाळी मुंबईतच ठरणार आहेत. या निवडीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नेत्यांसोबत दि. २९ मार्च रोजी मुंबईत बैठक ठेवली आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींमधील निवडून आलेल्या नवनियुक्त २८६ सदस्यांचा सत्कार आमदार अजित पवार यांच्या हस्ते रविवारी साताऱ्यात झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, ‘मागील विधानपरिषद निवडणुकीत पक्षाला गालबोट लागले होते. काहींना राजीनामे मागूनही त्यांनी दिले नव्हते. आता मात्र तसे होता कामा नये, काही हवसे, नवसे, गवसे तुम्हाला येऊन चुचकारतील. पद मिळाले नाही, आता तुझे कसे होणार?, असेही सांगतील; पण त्यांच्या भूलथापांना सदस्यांनी बळी पडू नये. आपल्याला एकसंधपणे काम करायचे आहे. सभापतिपदांवर १२ सदस्यांना संधी देता येऊ शकते.’ ‘मुख्यमंत्र्यांच्या मनात सरकार पडण्याच्या संशयाचं भूत घर करून बसले आहे. याच भीतीतून सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. अल्पमतातलं सरकार वाचविण्याकरिता सरकारने हे घटनाविरोधी कृत्य करीत लोकशाहीचा खून केला आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार हे साताऱ्यात कडाडले. ‘आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली. यावर योग्य वेळ आली की निर्णय घेऊ, एवढंच उत्तर मुख्यमंत्री देत आहेत. तसेच कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या रोखल्या जातील का?, असा उलटा सवाल ते विचारत आहेत. दुष्काळ पडणार नाही, याची हमी सरकार देईल का?, असा प्रतिप्रश्न आम्ही विरोधी सदस्य म्हणून त्यांना विचारला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही कर्जमाफीची घोषणा दिली गेली होती. धनगर समाजाला महाराष्ट्रात सरकार आल्यावर अडीच वर्षांत आरक्षण देऊ, अशी घोषणाही याच भाजप सरकारने केली होती; परंतु ती घोषणाही हवेत विरली आहे. सरकारच्या या खोट्या कारभाराविरोधात विरोधी आमदारांनी आवाज उठवला तर सरकारने भीतीपोटी १९ विरोधी आमदारांचे निलंबन केले आहे. आमदारांचे निलंबन टप्प्याटप्प्याने दूर केले जाईल, असे सांगितले जात आहे. एका झटक्यात आमदारांचे निलंबन केले तसेच एका झटक्यात ते रद्द करावे, अशी मागणी आमची आहे. दि. २९ मार्च रोजी विरोधी पक्षाच्या वतीने सरकारविरोधात संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. शेतकरी विरोधातील हे सरकार आपल्याला घालवावेच लागेल,’ असे स्पष्टीकरणही आ. अजित पवार यांनी केले. जिल्हा बँकांत १०६ कोटी पडून‘नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांत १०६ कोटी रुपये जमा झाले. मात्र, हे पैसे ‘आरबीआय’ने स्वीकारले नाहीत. या बँका विरोधकांच्या ताब्यात असल्यानेच सरकारने हे कृत्य केले. त्यावर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान, अर्थमंत्री तसेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्याशी वारंवार चर्चा केली. येत्या सोमवारी त्याबाबत सकात्मक निर्णय होईल. या रकमेवरील व्याजाचा प्रश्नही आहे. त्यापैकी काही व्याज रिझर्व्ह बँक, तर काही जिल्हा मध्यवर्ती बँकांना सोसावे लागणार आहे,’ असेही आ. पवार यांनी सांगितले.