शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

जिल्हा कोरोना विस्फोटाच्या मार्गावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा कहर होता. मात्र, त्यानंतर बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा कहर होता. मात्र, त्यानंतर बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी झाले. असे असतानाच फेब्रुवारीपासून बाधितांची संख्या वाढली आहे. मार्च महिन्यात तर ६ हजार ५४८ रुग्ण वाढले तर ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संशयावरून आतापर्यंत ४ लाखांवर लोकांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती विस्फोटाच्या मार्गावर जात असल्याचे दिसू लागले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत तर कोरोनाचा कहर होता. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावरही बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला आहे. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. असे असलेतरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

नोव्हेंबर महिना दिलासादायक ठरला. ऑक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले. तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असलेतरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते. जानेवारीपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारी सुरू होताच बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. तर कोरोनामुक्तांची संख्या कमी झाली. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढला.

फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत २ हजार ४९१ नवीन रुग्ण स्पष्ट झाले. जानेवारीचा विचार करता जवळपास ११०० नवीन रुग्णांची भर पडली. तर ३६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे फेब्रुवारीत मृतांचा आकडाही १० ने वाढल्याचे दिसून आले. तर १ हजार ८५५ जण बरे झाले. तर मार्च महिन्यात स्थिती अधिक कठीण झाली.

मार्च महिन्यात कोरोनाचे नवीन ६ हजार ५४८ रुग्ण आढळले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. मागील महिन्यापेक्षा १५ ने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर १ हजार २२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

चौकट :

कोरोनामुक्तांचा आकडा ६१ हजारांजवळ

जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर ५८ हजार ९९३ कोरोनाचे रुग्ण स्पष्ट झाले. तर आतापर्यंत ६७ हजारांवर बाधित संख्या पोहोचली आहे. तसेच ६० हजार ५७५ जणांनी कोरोनावर मात केली. त्याचबरोबर आतापर्यंत १ हजार ९१२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ५५४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे.

...............