शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

गावोगावी वीजवितरणच्या ‘झटक्याची भीती!’

By admin | Updated: June 27, 2016 00:44 IST

‘वीजवितरण’चे दुर्लक्ष : गंजलेले खांब अन् उघडे ट्रान्सफार्मर झाडवेलींच्या विळख्यात; ठिकठिकाणी लोबंकळणाऱ्या तारा, पावसाळापूर्व तपासणीही नाही

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत विद्युत खांब आणि ट्रान्सफार्मरची दुरवस्था झाली आहे. अनेक गावांतील खांबांना गंज चढला असून, रस्त्याकडेला असलेल्या विद्युत वाहिन्या खाली लोंबकळत असलेल्या दिसून येत आहेत. तर ट्रान्सफार्मरला झाडवेलींनी विळखा घातला आहे. पावसाळा जवळ आला तरी अद्याप वीजवितरण विभागाकडून या धोकादायक वाकलेले खांब बदलण्यात आले नसून, झाडवेलीही हटविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात गावोगावी वीजवितरणच्या खांबांतून व तारांमधून बाहेर पडणारऱ्या ठिणग्यांची भीती निर्माण झाली आहे.पावसाळा जवळ आला की, वीजवितरण कंपनीतील अधिकारी, वायरमन व कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीजवितरण करणारे ट्रान्सफार्मर, डीपी तसेच तारांची दुरुस्ती करण्याची कामे होती घेतली जातात. पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा वीजपुरवठा खंडित होऊ नये तसेच दुर्घटना घडू नये, यासाठी वीजवितरण काळजी घेत असते; मात्र यावेळेस जून महिना संपत आला व पावसाळा सुरू झाला तरी अद्यापही वीजवितरण विभागाकडून तालुक्यातील ग्रामीण भागातील मोडकळलेले डांब, दरवाजा तुटल्याने उघड्या पडलेले डीपी बॉक्स यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.वीजवितरणकडून अद्यापर्यंत ग्रामीण भागातील वीजखांबांची दुरुस्ती केली गेली नसल्याने पावसाळ्यात पुन्हा खांब कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे, त्यापासून दुर्घटना घडणे अशा घटनांना सामोरे जावे लागणार आहे. चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या खांबांची दुरुस्ती करावी तसेच ते काढून टाकून त्याजागी नवीन खांब बसवावेत, लोंबकळणाऱ्या तारा वर ओढून घेण्यात याव्यात, तुटलेले ट्रान्सफार्मरचे दरवाजे बसवावेत, अशा कामांबाबत गेल्या सहा महिन्यांपासून पंचायत समितीच्या मासिक सभेत अधिकाऱ्यांना सभापती, सदस्यांकडून सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. मात्र, आपल्या जबाबदारीचे भान हरवून बसलेल्या या अधिकाऱ्यांना सभापती, सदस्यांच्या प्रश्नांचा जणू विसरच पडला असल्याचे सध्या दिसून येत आहे. वीजवितरणच्या कारभाराबाबत ग्राहकांसह सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अनेकवेळा मासिक सभांमधून वीजवितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करून देखील त्यांच्याकडून किती कार्यवाही केली जाते. याचे संशोधनच करणे गरजेचे असल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी जीर्ण झालेले विद्युत खांबांही तुटून पडण्याची भीती निर्माण झाली आहे.विद्युत तारांच्या तुटण्याने त्यापासून शॉक लागून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना तालुक्यात यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. त्याची भरपाई देखील वीजवितरण कंपनीकडून दिली जाते का? येणके, पोतले, विंग परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर व विद्युतखांबांना मोठ्या प्रमाणात झाडवेलींचा विळखा पडला आहे. पावसाळ्यात या भागात अनेकवेळा वीज जाण्याचे प्रसंगही घडत असतात. त्यामुळे पावसाळापूर्वी वीजवितरण कंपनीकडून या भागासह तालुक्यातील अनेक गावांत असलेल्या धोकादायक विद्युत खांब व गंजलेले लोखंडी खांब, उघडे डीपी बॉक्स दुरुस्त अथवा बदलणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक मासिक सभेत अधिकाऱ्यांवर आगपाखडगंजलेल्या खांबांना व लोंबकळणाऱ्या वीजवाहक वाहिन्यांना बदलण्याबाबत अनेकदा पंचायत समितीच्या प्रत्येक मासिक सभेत सभापती व सदस्यांकडून वीजवितरण कंपनीचे अधिकारी धारेवर धरले जातात. नुकत्याच झालेल्या मासिक सभेतही अधिकाऱ्यांवर सदस्यांनी आगपाखड केली. पावसाळापूर्व तपासणी केली आहे का? धोकादायक व वाकलेले खांब बदलण्यात आलेले आहेत का? अशी विचारणा केल्यास अधिकाऱ्यांनी ‘लवकरच करतो,’ असे सांगितले. अशा प्रकारे प्रत्येक सभेत अधिकाऱ्यांकडून सभापतींसह सदस्यांच्या सुचनांना, प्रश्नांना ऐकून घेण्याची कामे केली जात आहेत.दुर्घटना टाळण्यासाठी हे उपाय गरजेचे...पावासाळापूर्वी कर्मचाऱ्यांनी लाइन पेट्रोलिंग करावे.उघडे व मोडकळले असलेले डीपी बॉक्स दुरू स्त करावेत.जंप बदलणे, वीज तारांवरील पावडर काढणेइन्सुलेटर बदलणेजमिनीपासून उंचीवर वीजवाहक तारा ओढणेवीजवाहक तारांवरील झाडवेली हटविणेगंजलेले ट्रान्सफॉर्मर अन् वाकलेले खांबतालुक्यातील कोपर्डे हवेली, कार्वे, कोडोली, कोरेगाव, किरपे, येणके, पोतले, पाटीलमळा, विंग, चचेगाव, धोंडेवाडी, काले, उंडाळे परिसरात अनेक ठिकाणी गंजलेले, उघडे असलेले ट्रान्सफॉर्मर व वाकलेले खांब असून, त्यांची डागडुजी करणे गरजेचे आहे.