शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

विस्कळीत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:14 IST

....................... कार्वे-शेणोली रस्त्याची दुरवस्था कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कार्वे ते शेणोली रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघातांची मालिका ...

.......................

कार्वे-शेणोली रस्त्याची दुरवस्था

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील कार्वे ते शेणोली रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघातांची मालिका नेहमीच सुरू आहे. काही प्रवासी वाहनधारकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा असल्याने याकरिता हा रस्ता चाैपदरी बनविण्याची मागणी होत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अपघातांची मालिका टाळण्यासाठी लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारक प्रवाशांनी केली आहे.

.........................

घनकचऱ्यासाठी मशीन

कऱ्हाड : येथील पालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचऱ्यातील फळांचे बारीक तुकडे करण्याबरोबरच त्याच्या चाळण्यासाठीच्या सुमारे सहा लाख खर्चून दोन मशीन खरेदी करण्यात आल्या. कचऱ्यात येणाऱ्या सफरचंद, मोसंबी, डाळिंबाच्या सालींचे विघटन होण्यास विलंब होत होता. मात्र, या मशीनद्वारे ते बारीक झाल्याने लवकर विघटन होण्यास मदत होणार आहे.

................

कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडी

कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून, पोलिसांनी शिस्त लावाली, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. दिवसभर ही परिस्थिती असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

...................

नागरिक बिनधास्त

सातारा : सातारा शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढत आहे. या युद्धात मनुष्यबळाची कमतरता जाणवत असताना, त्यांना नागरिकांनी घरात बसून सहकार्य करण्याची गरज आहे. मात्र सातारकर सार्वजनिक ठिकाणी विनाकारण गर्दी करत आहेत. अनेकजण मास्कचाही वापर करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

...................

भाजी मंडई रस्त्यावर

सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर गर्दी वाढली आहे. त्यातच या परिसरात भाजी, फळ विक्रेते रस्त्याकडेला बसलेले असतात. या विक्रेत्यांना काहीवेळा पोलीस हुसकावून लावतात; पण पोलीस गेल्यानंतर ते पुन्हा येतात.

................

प्लास्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर

सातारा : सातारा नगरपालिकेने प्लास्टिकविरोधात चांगली मोहीम राबविली होती. प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर वारंवार कारवाईही करण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांवर वचक बसला होता. मात्र कोरोनाची साथ आलेली असल्याने प्रशासन या कामात व्यस्त आहेत. याचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांनी मागणी नाही केली, तरी फळविक्रेते प्लास्टिक पिशव्या देत आहेत. त्यामुळे सरसकट कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.