शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात ! (टेम्प्लेट १०२१)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:43 IST

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त ...

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त समित्या या राहिलेल्याच नाहीत. त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज होत नसल्याने तंटामुक्त झालेल्या गावांतील तंटेही आता पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. यावरून तंटामुक्त समित्या किती फायदेशीर ठरतात हे यावरून सिद्ध होते.

नजर आकडेवारीवर...

तंटामुक्त समित्या...

माण ४१

खटाव ५५

कोरेगाव ५८

फलटण ६२

कऱ्हाड ६५

...............................

समित्या नावालाच...

- अनेक गावांत तंटामुक्त समित्या या नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण, ग्रामपंचायतीत सत्ता ज्यांची असते. त्याच गटाचा समितीचा अध्यक्ष बहुतांशी ठिकाणी असतो. त्यातच गावांतील राजकारण टोकाचे असेल तर अशा समित्या या वाद मिटविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून आलेले आहे.

- ग्रामीण भागात छोट्या ग्रामपंचायती असतात. तशाच ४, ५ हजार मतदार असणाऱ्याही आहेत. अशा ठिकाणी वाद अधिक राहतात. त्यामुळे वाद कमी होत नाहीत, तसेच ते सुटलेही जात नाहीत, हे वास्तव आहे.

..............................................

निवडणूक झालेल्या ठिकाणी समितीच नाही...

ग्रामपंचायत निवडणूक झाली की ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती तयार करण्यात येते; पण जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैअखेर ८७९ ग्रामपंचायतींची निवडणूक झालेली आहे. कोरोनामुळे सध्या ग्रामसभाच घेता येत नाही. त्यामुळे निवडणूक झालेल्या गावांत तंटामुक्त समिती अस्तित्वातच नाही, तर जिल्ह्यातील जवळपास १५ ते २० ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे.

................................................