शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

तंटामुक्त गावांतील तंटे पोहोचले पोलीस ठाण्यात ! (टेम्प्लेट १०२१)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:43 IST

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त ...

सातारा : मागील सव्वावर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे, त्यामुळे अनेक गावांत ग्रामसभा झाल्या नाहीत. परिणामी जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्त समित्या या राहिलेल्याच नाहीत. त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज होत नसल्याने तंटामुक्त झालेल्या गावांतील तंटेही आता पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. यावरून तंटामुक्त समित्या किती फायदेशीर ठरतात हे यावरून सिद्ध होते.

नजर आकडेवारीवर...

तंटामुक्त समित्या...

माण ४१

खटाव ५५

कोरेगाव ५८

फलटण ६२

कऱ्हाड ६५

...............................

समित्या नावालाच...

- अनेक गावांत तंटामुक्त समित्या या नावालाच असल्याचे दिसून येत आहे. कारण, ग्रामपंचायतीत सत्ता ज्यांची असते. त्याच गटाचा समितीचा अध्यक्ष बहुतांशी ठिकाणी असतो. त्यातच गावांतील राजकारण टोकाचे असेल तर अशा समित्या या वाद मिटविण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून आलेले आहे.

- ग्रामीण भागात छोट्या ग्रामपंचायती असतात. तशाच ४, ५ हजार मतदार असणाऱ्याही आहेत. अशा ठिकाणी वाद अधिक राहतात. त्यामुळे वाद कमी होत नाहीत, तसेच ते सुटलेही जात नाहीत, हे वास्तव आहे.

..............................................

निवडणूक झालेल्या ठिकाणी समितीच नाही...

ग्रामपंचायत निवडणूक झाली की ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती तयार करण्यात येते; पण जिल्ह्यात जानेवारीपासून जुलैअखेर ८७९ ग्रामपंचायतींची निवडणूक झालेली आहे. कोरोनामुळे सध्या ग्रामसभाच घेता येत नाही. त्यामुळे निवडणूक झालेल्या गावांत तंटामुक्त समिती अस्तित्वातच नाही, तर जिल्ह्यातील जवळपास १५ ते २० ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे.

................................................