शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पारावर चर्चा... अन् आकड्यांवर पैजा!

By admin | Updated: October 17, 2014 22:55 IST

आमदार कोण? : माण-खटावसह कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे अनेकांच्या नजरा

सातारा : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून सातारा जिल्ह्यातील गावोगावी राजकीय वातावरण तापू लागले होते. निवडणूक काळात तर प्रचार शिगेला पोहोचला होता. बुधवारी झालेल्या मतदानानंतर निवडणूक निकालांकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी अमूकच आमदार होणार म्हणून पैजा लागू लागल्या आहेत. त्यातून कऱ्हाड दक्षिण, माण-खटावमध्ये जास्त प्रमाण आहे.सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखानदारी राष्ट्रवादीकडेच असल्याने सातारा जिल्ह्याकडे आजवर कोणत्याच पक्षश्रेष्ठी गांर्भीयाने पाहिले नव्हते. बालेकिल्ला म्हणून राष्ट्रवादी तर आपला निभाव लागणार नाही, फुक्कट ताकद वाया घालवायला नको म्हणून सेना-भाजपने दुर्लक्ष केले. तर आघाडी असल्याने काँग्रेसच्या वाट्याला फारसे मतदारसंघच येत नव्हते.यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत फाटाफूट तर आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघांत चौरंगी, पंचरंगी लढती झाल्या. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. बहुतांश उमेदवारांनी प्रचारकाळात विरोधकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानली. त्यातील अनेकजण एकेकाळी मित्र पक्ष होते. त्यामुळे मतदारांची मात्र चांगलीच करमणूक झाली.जिल्ह्यातील आठही मतदारसंघांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. निवडणूक काळात प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी विश्रांती घेणेच पसंत केले. निवडणूक निकालाविषयी उमेदवारांना जेवढी उत्सुकता लागली आहे. तेवढीच उत्सुकता कार्यकर्त्यांनाही लागली आहे. त्यामुळे कोण विजयी होणार याविषयी तर्क-वितर्क लावले जाऊ लागले आहेत. पंधरा दिवस वेगवेगळ्या उमेदवारांबरोबरच फिरत असलेले गावागावातील कार्यकर्ते आता कोठे एकत्र येऊ लागले आहे. त्यांच्यामध्येही आमचाच नेता विजयी होणार म्हणून दावे केले जाऊ लागले आहे. हे दावे करत असताना कोणत्या गावातील प्रचारसभांना कसा प्रतिसाद मिळाला. कोणत्या गावातून प्रतिसाद मिळाला नाही. कोणत्या भागातील कोणता नेता आपल्याबरोबर असल्याचे सांगत असला तरी आतून दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा दिला होता. याचे दाखले देण्यात येऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांच्या विजयाबद्दल दावे होत असतानाच चर्चा शिगेला पोहोचत असून, ती शेवटी पैजेपर्यंत येऊन थांबत आहे. यामध्ये विजयाची खात्री असलेल्या कार्यकर्ते चहाच्या पैजेपासून नास्टा, जेवण, दिवाळीच्या सुटीत लांब कोठे तरी फिरायला जाण्याचे नियोजन होऊ लागले आहे. हे करत असतानाच जो पैज हरेल त्यालाच खर्च करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)शासकीय कार्यालयांमध्येही याच गप्पाविधानसभा निकालाविषयी राजकीय नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त उत्सुकता सर्वसामान्य मतदारांना लागली आहे. त्यामुळे मंडई, हॉटेलमध्ये चर्चा रंगू लागली आहे. त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांमध्ये निवडणूक निकालाविषयीच गप्पा रंगत आहेत. त्यांच्यातही लहान-मोठ्या पैजा लागत आहेत. पण, कऱ्हाड दक्षिण आणि माण-खटाव मतदारसंघात काय निकाल लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.