शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनच्या काळातील घरपट्टीत सवलत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

मलकापूर : मार्च २०२०पासून कोरोना संकटाने थैमान घातले आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून, प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली ...

मलकापूर : मार्च २०२०पासून कोरोना संकटाने थैमान घातले आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून, प्रचंड प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तसेच लॉकडाऊनमुळे लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याचा विचार करून मलकापूर नगरपालिकेने लॉकडाऊनच्या काळातील घरपट्टीत सवलत द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र शिवसेनेचे कऱ्हाड दक्षिण तालुकाप्रमुख नितीन काशीद-पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना दिले आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, गेले वर्षभर सर्वत्र टाळेबंदीची परिस्थिती आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्याकरिता, रुग्णसंख्येसह जीवितहानी रोखण्याकरिता पालिका हद्दीत वारंवार लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवनमानावर टाळेबंदीचा विपरीत प्रभाव पडून सर्वसामान्यांचे आर्थिक जीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण बाजारपेठ, व्यापारी संस्थाने, उद्योग, व्यावसायिक, फेरीवाले, रिक्षावाले व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. याचा परिणाम जनतेच्या क्रयशक्तीवर होऊन बेरोजगारी व आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व बाबींमुळे मलकापूर पालिका क्षेत्रातील मालमत्ताधारक नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छता आदी विविध कर भरणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, त्याचे दूरगामी परिणाम पालिका व मालमत्ताधारकांवर होणार आहेत. म्हणून याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून नागरिकांना दिलासा देण्याकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षांतील घरपट्टीत ५० टक्के सवलत द्यावी तसेच थकीत घरपट्टीवरील व्याज माफ करण्यात यावे. घरपट्टी भरण्यास हप्ते बांधून देण्यात यावेत, पाणीपट्टी बिलात ३० टक्के सवलत देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या पत्रकावर रामभाऊ रैनाक, मलकापूर शहरप्रमुख मधुकर शेलार, उपशहरप्रमुख सूर्यकांत मानकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

चौकट...

५० टक्के सवलतीची मागणी...

सर्वसामान्य नागरिकांचे थकलेल्या बिलामुळे नळ कनेक्शन तोडू नये. स्वच्छता कराच्या बाबतीतही ५० टक्के सवलत देण्याचा विचार करावा. या महत्त्वपूर्ण मागण्या पालिकेच्या पटलावर ठेवून यावर चर्चा करण्यात यावी व नगर परिषदेने सर्वसामान्य नागरिकांना सवलतीचे पॅकेज देऊन सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.