शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:39 IST

किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला ...

किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, कण्हेर धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अद्यापही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने किडगाव - हमदाबाज पूल अद्यापही पाण्याखालीच आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

महिन्याभरापासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शुक्रवारपासून या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे कण्हेर धरण ओव्हरफ्लो झाले असून, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या चारही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याने वेण्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. रविवारपासून या परिसरात पावसाने उसंत दिली असून, दिवसभरामध्ये पावसाची उघडझाप होत होती. मात्र, रात्री दहानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला.

दिवसा पावसाने उघडीप दिल्याने जनावरांना चारा आणणे व शेतातील काही किरकोळ कामे शेतकऱ्यांनी केली. कण्हेर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. धरण ७५ टक्के भरले असून, गतवर्षी याचदिवशी धरण फक्त ४५ टक्के भरले होते. यावर्षी धरण लवकर भरल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदले आहेत तर पावसाने उघडीप दिल्याने घेवडा आणि भुईमूग पिकांना आधार मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही पिके धोक्यात येऊ शकतात. जोरदार वाऱ्यामुळे ऊसाची शेती भुईसपाट झाली आहे.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video