शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:39 IST

किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला ...

किडगाव : ‘गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या कोसळधार पावसाने किडगाव आणि कण्हेर परिसरात उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, कण्हेर धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी अद्यापही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने किडगाव - हमदाबाज पूल अद्यापही पाण्याखालीच आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

महिन्याभरापासून पावसाने दडी मारली होती. मात्र, शुक्रवारपासून या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे कण्हेर धरण ओव्हरफ्लो झाले असून, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या चारही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात असल्याने वेण्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गावांमधील स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत. रविवारपासून या परिसरात पावसाने उसंत दिली असून, दिवसभरामध्ये पावसाची उघडझाप होत होती. मात्र, रात्री दहानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला.

दिवसा पावसाने उघडीप दिल्याने जनावरांना चारा आणणे व शेतातील काही किरकोळ कामे शेतकऱ्यांनी केली. कण्हेर धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. धरण ७५ टक्के भरले असून, गतवर्षी याचदिवशी धरण फक्त ४५ टक्के भरले होते. यावर्षी धरण लवकर भरल्याने शेतकऱ्यांचे चेहरे आनंदले आहेत तर पावसाने उघडीप दिल्याने घेवडा आणि भुईमूग पिकांना आधार मिळणार आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास काही पिके धोक्यात येऊ शकतात. जोरदार वाऱ्यामुळे ऊसाची शेती भुईसपाट झाली आहे.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video