शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोयना वगळता इतर धरणांतील विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३१ मिलीमीटरची नोंद ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३१ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाऊस कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. परिणामी कोयना वगळता इतर प्रमुख धरणांतील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यापूर्वी धुवांधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी या सारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस कमी झाल्याने धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कोयना वगळता अन्य धरणांतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ११ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत ३४४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे १५ व यावर्षी आतापर्यंत ४४०३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ३१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर जूनपासून महाबळेश्वरला ४५११ मिलीमीटर पर्जन्यमान नोंद झालेले आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ९०.८८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणांत २१०० क्युसेक पाणी येत होते. धरणाचे सर्व दरवाजे बंद बसून फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

चौकट :

कोयना धरणात ८६ टक्के पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे. तर पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावलेली आहे. त्यामुळे धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तर सध्या धोम धरणात ८३ टक्क्यांच्यावर पाणीसाठा आहे. कण्हेर धरणात ८४.२७, कोयना ८६.३६, उरमोडी ८१.८३, बलकवडी ८६.४६ आणि तारळी धरणामध्ये ८८.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

.......................................................