शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कोयना वगळता इतर धरणांतील विसर्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३१ मिलीमीटरची नोंद ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून तुरळक स्वरुपात पाऊस होत असून, शुक्रवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ३१ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाऊस कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. परिणामी कोयना वगळता इतर प्रमुख धरणांतील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यापूर्वी धुवांधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी या सारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस कमी झाल्याने धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कोयना वगळता अन्य धरणांतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ११ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत ३४४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजा येथे १५ व यावर्षी आतापर्यंत ४४०३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ३१ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. तर जूनपासून महाबळेश्वरला ४५११ मिलीमीटर पर्जन्यमान नोंद झालेले आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ९०.८८ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणांत २१०० क्युसेक पाणी येत होते. धरणाचे सर्व दरवाजे बंद बसून फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

चौकट :

कोयना धरणात ८६ टक्के पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची दडी कायम आहे. तर पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावलेली आहे. त्यामुळे धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तर सध्या धोम धरणात ८३ टक्क्यांच्यावर पाणीसाठा आहे. कण्हेर धरणात ८४.२७, कोयना ८६.३६, उरमोडी ८१.८३, बलकवडी ८६.४६ आणि तारळी धरणामध्ये ८८.१० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

.......................................................