शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

दिग्दर्शन सर्वांत धाकटं बाळ... म्हणून लाडकं!

By admin | Updated: March 16, 2015 00:17 IST

अवधूत गुप्तेंची प्रसन्न मुलाखत : गायक ते दिग्दर्शक अशा बेधडक प्रवासाचे उलगडले अंतरंग--थेट संवाद

राजीव मुळ्ये - सातारा : ‘गायन हे माझं पहिलं बाळ. त्यातून पुढे संगीत दिग्दर्शन. मग त्यातून अँकरिंग आणि शेवटी दिग्दर्शन... अर्थातच दिग्दर्शन हे सगळ्यात धाकटं बाळ. त्यामुळं माझं ते जास्त लाडकं,’ अशा शब्दांत हरहुन्नरी कलावंत अवधूत गुप्ते यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातला दिग्दर्शक आगामी काळात अधिक सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले. मराठीतल्या पहिल्या ‘अ‍ॅडॉप्टेशन’पासून सुरू झालेल्या आपल्या बेधडक प्रवासाचे अंतरंग त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रसन्न मुलाखतीत उलगडले. एका कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले असता गुप्ते यांनी रविवारी वेळात वेळ काढून ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. मुंबईत ‘साउंड रेकॉर्डिंग’चा पदविका अभ्यासक्रम केल्यामुळेच अल्बमद्वारे संगीताच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची ऊर्मी मिळाली, असं सांगून ते म्हणाले, ‘माझा जन्म मुंबईचा असला तरी आजोबांची बदली झाल्यामुळे आम्ही कोल्हापूरला आलो. तिथेच शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. परंतु अल्बमद्वारे रसिकांपुढे येण्यास कारणीभूत ठरला तो साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमाच. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘तुझे देख के मेरी मधुबाला’ गाणी गाजली आणि गायक म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू संगीत दिग्दर्शनापर्यंत पोहोचला.’ पाश्चात्य शास्त्रीय संगीताचं शिक्षण गुप्ते यांनी घेतलेलं नाही. परंतु तरी त्याची झाक त्यांच्या गाण्यांमध्ये दिसते, ती साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमा करताना आलेल्या अनुभवांच्या बळावरच. कोल्हापुरात राहिल्यामुळं लोकसंगीताशीही चांगलीच जवळीक. दर दोन फर्लांगावर भाषा बदलते, तसंच लोकसंगीतही बदलतं, हा अनुभव घेतलेला. त्यामुळंच लोकसंगीताचा अस्सल बाज त्यांच्या गाण्यात ऐकायला मिळतो. ‘सर्वांत आधी ध्वनीची निर्मिती झाली. त्यातून साहजिकच आधी लोकसंगीत तयार झालं असणार आणि ते शास्त्रात बांधून शास्त्रीय संगीताची निर्मिती झाली असणार,’ अशी तर्कसंगती ते लावतात. मुंबईतल्या गणेशोत्सवात अवधूत गुप्ते नेहमीच सक्रिय. शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाल्यानंतरचा प्रसंग. त्यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून मोठी देणगी आणली आणि नेहमी शिवसेनेची जाहिरात असणाऱ्या मंडपात प्रथमच मनसेची जाहिरात झळकली. हेच मुंबईच्या अनेक मंडळांमध्ये घडत होतं. राजकारण गणपतीच्या मंडपापर्यंत आल्याचं जाणवून गुप्ते अस्वस्थ झाले आणि या अस्वस्थतेतूनच ‘मोरया’ चित्रपटाची निर्मिती झाली. महानगरीत येऊन संगीतात करिअर घडविणारा ग्रामीण तरुण त्यांच्या ‘इकतारा’चा नायक बनला. सभोवारच्या परिस्थितीकडे, घटना-घडामोडींकडे गुप्ते अत्यंत संवेदनशीलपणे पाहतात; म्हणूनच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची कथा ते स्वत:च लिहितात. मुंबईबाहेर असणारा ‘खरा महाराष्ट्र’ चित्रपटात दाखवायलाही उत्सुक असल्याचं गुप्ते यांनी सांगितलं. यावेळी माधव सुर्वे, डॉ. सोमनाथ साबळे, जे. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. ‘त्यावेळी’ गंमतच अनुभवता आली नाही ‘झेंडा’ हा अवधूत गुप्ते यांचा पहिला चित्रपट. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या अंतरंगाबाबत बोलणारं ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती,’ हे गीत आजही लोकप्रिय आहे. परंतु त्या दिवसांत दिग्दर्शनाची गंमतच आपल्याला अनुभवता आली नाही, असं गुप्ते सांगतात. या चित्रपटाच्या प्रक्रियेत तणावच अधिक होता. गुप्ते यांना धमक्या आल्या होत्या. पहिला चित्रपट असूनही दिग्दर्शन ‘एन्जॉय’ करता आलं नाही. त्यामुळंच आता ते दिग्दर्शक या नात्यानं रसिकांसमोर येण्यास अधिक उत्सुक आहेत.