शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शन सर्वांत धाकटं बाळ... म्हणून लाडकं!

By admin | Updated: March 16, 2015 00:17 IST

अवधूत गुप्तेंची प्रसन्न मुलाखत : गायक ते दिग्दर्शक अशा बेधडक प्रवासाचे उलगडले अंतरंग--थेट संवाद

राजीव मुळ्ये - सातारा : ‘गायन हे माझं पहिलं बाळ. त्यातून पुढे संगीत दिग्दर्शन. मग त्यातून अँकरिंग आणि शेवटी दिग्दर्शन... अर्थातच दिग्दर्शन हे सगळ्यात धाकटं बाळ. त्यामुळं माझं ते जास्त लाडकं,’ अशा शब्दांत हरहुन्नरी कलावंत अवधूत गुप्ते यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातला दिग्दर्शक आगामी काळात अधिक सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले. मराठीतल्या पहिल्या ‘अ‍ॅडॉप्टेशन’पासून सुरू झालेल्या आपल्या बेधडक प्रवासाचे अंतरंग त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रसन्न मुलाखतीत उलगडले. एका कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले असता गुप्ते यांनी रविवारी वेळात वेळ काढून ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. मुंबईत ‘साउंड रेकॉर्डिंग’चा पदविका अभ्यासक्रम केल्यामुळेच अल्बमद्वारे संगीताच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची ऊर्मी मिळाली, असं सांगून ते म्हणाले, ‘माझा जन्म मुंबईचा असला तरी आजोबांची बदली झाल्यामुळे आम्ही कोल्हापूरला आलो. तिथेच शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. परंतु अल्बमद्वारे रसिकांपुढे येण्यास कारणीभूत ठरला तो साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमाच. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘तुझे देख के मेरी मधुबाला’ गाणी गाजली आणि गायक म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू संगीत दिग्दर्शनापर्यंत पोहोचला.’ पाश्चात्य शास्त्रीय संगीताचं शिक्षण गुप्ते यांनी घेतलेलं नाही. परंतु तरी त्याची झाक त्यांच्या गाण्यांमध्ये दिसते, ती साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमा करताना आलेल्या अनुभवांच्या बळावरच. कोल्हापुरात राहिल्यामुळं लोकसंगीताशीही चांगलीच जवळीक. दर दोन फर्लांगावर भाषा बदलते, तसंच लोकसंगीतही बदलतं, हा अनुभव घेतलेला. त्यामुळंच लोकसंगीताचा अस्सल बाज त्यांच्या गाण्यात ऐकायला मिळतो. ‘सर्वांत आधी ध्वनीची निर्मिती झाली. त्यातून साहजिकच आधी लोकसंगीत तयार झालं असणार आणि ते शास्त्रात बांधून शास्त्रीय संगीताची निर्मिती झाली असणार,’ अशी तर्कसंगती ते लावतात. मुंबईतल्या गणेशोत्सवात अवधूत गुप्ते नेहमीच सक्रिय. शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाल्यानंतरचा प्रसंग. त्यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून मोठी देणगी आणली आणि नेहमी शिवसेनेची जाहिरात असणाऱ्या मंडपात प्रथमच मनसेची जाहिरात झळकली. हेच मुंबईच्या अनेक मंडळांमध्ये घडत होतं. राजकारण गणपतीच्या मंडपापर्यंत आल्याचं जाणवून गुप्ते अस्वस्थ झाले आणि या अस्वस्थतेतूनच ‘मोरया’ चित्रपटाची निर्मिती झाली. महानगरीत येऊन संगीतात करिअर घडविणारा ग्रामीण तरुण त्यांच्या ‘इकतारा’चा नायक बनला. सभोवारच्या परिस्थितीकडे, घटना-घडामोडींकडे गुप्ते अत्यंत संवेदनशीलपणे पाहतात; म्हणूनच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची कथा ते स्वत:च लिहितात. मुंबईबाहेर असणारा ‘खरा महाराष्ट्र’ चित्रपटात दाखवायलाही उत्सुक असल्याचं गुप्ते यांनी सांगितलं. यावेळी माधव सुर्वे, डॉ. सोमनाथ साबळे, जे. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. ‘त्यावेळी’ गंमतच अनुभवता आली नाही ‘झेंडा’ हा अवधूत गुप्ते यांचा पहिला चित्रपट. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या अंतरंगाबाबत बोलणारं ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती,’ हे गीत आजही लोकप्रिय आहे. परंतु त्या दिवसांत दिग्दर्शनाची गंमतच आपल्याला अनुभवता आली नाही, असं गुप्ते सांगतात. या चित्रपटाच्या प्रक्रियेत तणावच अधिक होता. गुप्ते यांना धमक्या आल्या होत्या. पहिला चित्रपट असूनही दिग्दर्शन ‘एन्जॉय’ करता आलं नाही. त्यामुळंच आता ते दिग्दर्शक या नात्यानं रसिकांसमोर येण्यास अधिक उत्सुक आहेत.