शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

दिग्दर्शन सर्वांत धाकटं बाळ... म्हणून लाडकं!

By admin | Updated: March 16, 2015 00:17 IST

अवधूत गुप्तेंची प्रसन्न मुलाखत : गायक ते दिग्दर्शक अशा बेधडक प्रवासाचे उलगडले अंतरंग--थेट संवाद

राजीव मुळ्ये - सातारा : ‘गायन हे माझं पहिलं बाळ. त्यातून पुढे संगीत दिग्दर्शन. मग त्यातून अँकरिंग आणि शेवटी दिग्दर्शन... अर्थातच दिग्दर्शन हे सगळ्यात धाकटं बाळ. त्यामुळं माझं ते जास्त लाडकं,’ अशा शब्दांत हरहुन्नरी कलावंत अवधूत गुप्ते यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वातला दिग्दर्शक आगामी काळात अधिक सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले. मराठीतल्या पहिल्या ‘अ‍ॅडॉप्टेशन’पासून सुरू झालेल्या आपल्या बेधडक प्रवासाचे अंतरंग त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या प्रसन्न मुलाखतीत उलगडले. एका कार्यक्रमासाठी साताऱ्यात आले असता गुप्ते यांनी रविवारी वेळात वेळ काढून ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. मुंबईत ‘साउंड रेकॉर्डिंग’चा पदविका अभ्यासक्रम केल्यामुळेच अल्बमद्वारे संगीताच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची ऊर्मी मिळाली, असं सांगून ते म्हणाले, ‘माझा जन्म मुंबईचा असला तरी आजोबांची बदली झाल्यामुळे आम्ही कोल्हापूरला आलो. तिथेच शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. परंतु अल्बमद्वारे रसिकांपुढे येण्यास कारणीभूत ठरला तो साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमाच. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ आणि ‘तुझे देख के मेरी मधुबाला’ गाणी गाजली आणि गायक म्हणून सुरू झालेला प्रवास हळूहळू संगीत दिग्दर्शनापर्यंत पोहोचला.’ पाश्चात्य शास्त्रीय संगीताचं शिक्षण गुप्ते यांनी घेतलेलं नाही. परंतु तरी त्याची झाक त्यांच्या गाण्यांमध्ये दिसते, ती साउंड रेकॉर्डिस्टचा डिप्लोमा करताना आलेल्या अनुभवांच्या बळावरच. कोल्हापुरात राहिल्यामुळं लोकसंगीताशीही चांगलीच जवळीक. दर दोन फर्लांगावर भाषा बदलते, तसंच लोकसंगीतही बदलतं, हा अनुभव घेतलेला. त्यामुळंच लोकसंगीताचा अस्सल बाज त्यांच्या गाण्यात ऐकायला मिळतो. ‘सर्वांत आधी ध्वनीची निर्मिती झाली. त्यातून साहजिकच आधी लोकसंगीत तयार झालं असणार आणि ते शास्त्रात बांधून शास्त्रीय संगीताची निर्मिती झाली असणार,’ अशी तर्कसंगती ते लावतात. मुंबईतल्या गणेशोत्सवात अवधूत गुप्ते नेहमीच सक्रिय. शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाल्यानंतरचा प्रसंग. त्यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यकर्त्याने मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून मोठी देणगी आणली आणि नेहमी शिवसेनेची जाहिरात असणाऱ्या मंडपात प्रथमच मनसेची जाहिरात झळकली. हेच मुंबईच्या अनेक मंडळांमध्ये घडत होतं. राजकारण गणपतीच्या मंडपापर्यंत आल्याचं जाणवून गुप्ते अस्वस्थ झाले आणि या अस्वस्थतेतूनच ‘मोरया’ चित्रपटाची निर्मिती झाली. महानगरीत येऊन संगीतात करिअर घडविणारा ग्रामीण तरुण त्यांच्या ‘इकतारा’चा नायक बनला. सभोवारच्या परिस्थितीकडे, घटना-घडामोडींकडे गुप्ते अत्यंत संवेदनशीलपणे पाहतात; म्हणूनच त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची कथा ते स्वत:च लिहितात. मुंबईबाहेर असणारा ‘खरा महाराष्ट्र’ चित्रपटात दाखवायलाही उत्सुक असल्याचं गुप्ते यांनी सांगितलं. यावेळी माधव सुर्वे, डॉ. सोमनाथ साबळे, जे. डी. गायकवाड आदी उपस्थित होते. ‘त्यावेळी’ गंमतच अनुभवता आली नाही ‘झेंडा’ हा अवधूत गुप्ते यांचा पहिला चित्रपट. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाच्या अंतरंगाबाबत बोलणारं ‘विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती,’ हे गीत आजही लोकप्रिय आहे. परंतु त्या दिवसांत दिग्दर्शनाची गंमतच आपल्याला अनुभवता आली नाही, असं गुप्ते सांगतात. या चित्रपटाच्या प्रक्रियेत तणावच अधिक होता. गुप्ते यांना धमक्या आल्या होत्या. पहिला चित्रपट असूनही दिग्दर्शन ‘एन्जॉय’ करता आलं नाही. त्यामुळंच आता ते दिग्दर्शक या नात्यानं रसिकांसमोर येण्यास अधिक उत्सुक आहेत.