शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

दरेखुर्द सजाला तलाठी नसल्याने सजा

By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST

ग्रामस्थांची परवड : चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच नाही

कुडाळ : जावळी तालुक्यातील दरेखुर्द सजामध्ये दरे खुर्दसह मोरघर, नरफदेव ग्रामपंचायतींचे महसूल कामकाज चालते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दरेखुर्द सजाला गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच तहसील कार्यालयाकडून मिळाला नाही. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील नरफदेवसह मोरघर, दरेखुर्द, जावळेवाडी, मोरवाडी ग्रामस्थांची सात बाऱ्यासह इतर कामकाजासाठी परवड होत आहे. तलाठीच नसल्यामुळे ग्रामस्थांना सजा भोगावी लागत आहे. तरी कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.याबाबत माहिती अशी की, दरेखुर्द सजाअंतर्गत मोरेवाडी, जावळेवाडी, मोरघर, धनगरपेठ, नरफदेव गावे येतात. गेल्या चार वर्षांपासून गावाला कायमस्वरूपी गावकामगार तलाठीच महसूल विभागाने दिलेला नाही. तर आता कुठे तांदळे तलाठी देण्यात आला होता. तो देखील प्रांताधिकारी कार्यालयाकडून भूसंपादन विभागात सातारा कार्यालयात त्यांना ठेवण्यात आले आहे. तर सायगाव गावकामगार तलाठी तोडरमल यांच्याकडे हा सजा जोडला आहे. त्यांच्याच सजामध्ये कामे अधिक असल्यामुळे ते दरेखुर्द सजासाठी वेळच देऊ शकत नाहीत. पर्यायी या सजाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना उतारा कोतवालाकडून करून घ्यावी लागते.मात्र, तलाठी सहीसाठी सायगाव गाठून दफ्तर घेऊन कोतवालादेखील सही आणावी लागत असल्यामुळे उतारा मिळवायला सात-सात दिवस विलंब होत आहे. तलाठी नसल्यामुळे धनगरपेठा, नरफदेव ग्रामस्थांना डोंगर उतरून तलाठीच भेटत नसल्यामुळे त्यांची तर नुसतीच पायपीट होत आहे. अनेकदा दरेखुर्द सजाला कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी तहसीलदारांकडे मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, या सजासाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा, अशी मागणी या सजामधील ग्रामस्थांमधूनच होत आहे. याबाबत प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी संपर्क साधला असता, दरेखुर्द सजासाठी स्वतंत्र गावकामगार तलाठी देण्याची व्यवस्था केली जाईल. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. (प्रतिनिधी)कोतवाल बनला ‘तलाठी’दरेखुर्द सजाला गावकामगार तलाठी नसल्याने या सजाअंतर्गत येणाऱ्या सहा गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर नरफदेव, धनगरपेठा या डोंगरमाथ्यावरील नागरिकांना तलाठी नसल्याचा मोठा फटका बसत आहे. या सजात काम करणाऱ्या कोतवालावर नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देण्याची वेळ आली आहे. तर महसुली दफ्तरही सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत. कोतवालाच ‘अण्णासाहेब’ बनले आहे.दरेखुर्द सजामध्ये एकूण सहा गावे येतात. त्यामुळे प्रभारी तलाठी या गावांना सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे महसूल विभागाने नागरिकांची गैरसोय ओळखून कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा.-चंद्रकांत गायकवाड, मोरघर नागरिक