शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

दरेखुर्द सजाला तलाठी नसल्याने सजा

By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST

ग्रामस्थांची परवड : चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच नाही

कुडाळ : जावळी तालुक्यातील दरेखुर्द सजामध्ये दरे खुर्दसह मोरघर, नरफदेव ग्रामपंचायतींचे महसूल कामकाज चालते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दरेखुर्द सजाला गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच तहसील कार्यालयाकडून मिळाला नाही. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील नरफदेवसह मोरघर, दरेखुर्द, जावळेवाडी, मोरवाडी ग्रामस्थांची सात बाऱ्यासह इतर कामकाजासाठी परवड होत आहे. तलाठीच नसल्यामुळे ग्रामस्थांना सजा भोगावी लागत आहे. तरी कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.याबाबत माहिती अशी की, दरेखुर्द सजाअंतर्गत मोरेवाडी, जावळेवाडी, मोरघर, धनगरपेठ, नरफदेव गावे येतात. गेल्या चार वर्षांपासून गावाला कायमस्वरूपी गावकामगार तलाठीच महसूल विभागाने दिलेला नाही. तर आता कुठे तांदळे तलाठी देण्यात आला होता. तो देखील प्रांताधिकारी कार्यालयाकडून भूसंपादन विभागात सातारा कार्यालयात त्यांना ठेवण्यात आले आहे. तर सायगाव गावकामगार तलाठी तोडरमल यांच्याकडे हा सजा जोडला आहे. त्यांच्याच सजामध्ये कामे अधिक असल्यामुळे ते दरेखुर्द सजासाठी वेळच देऊ शकत नाहीत. पर्यायी या सजाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना उतारा कोतवालाकडून करून घ्यावी लागते.मात्र, तलाठी सहीसाठी सायगाव गाठून दफ्तर घेऊन कोतवालादेखील सही आणावी लागत असल्यामुळे उतारा मिळवायला सात-सात दिवस विलंब होत आहे. तलाठी नसल्यामुळे धनगरपेठा, नरफदेव ग्रामस्थांना डोंगर उतरून तलाठीच भेटत नसल्यामुळे त्यांची तर नुसतीच पायपीट होत आहे. अनेकदा दरेखुर्द सजाला कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी तहसीलदारांकडे मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, या सजासाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा, अशी मागणी या सजामधील ग्रामस्थांमधूनच होत आहे. याबाबत प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी संपर्क साधला असता, दरेखुर्द सजासाठी स्वतंत्र गावकामगार तलाठी देण्याची व्यवस्था केली जाईल. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. (प्रतिनिधी)कोतवाल बनला ‘तलाठी’दरेखुर्द सजाला गावकामगार तलाठी नसल्याने या सजाअंतर्गत येणाऱ्या सहा गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर नरफदेव, धनगरपेठा या डोंगरमाथ्यावरील नागरिकांना तलाठी नसल्याचा मोठा फटका बसत आहे. या सजात काम करणाऱ्या कोतवालावर नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देण्याची वेळ आली आहे. तर महसुली दफ्तरही सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत. कोतवालाच ‘अण्णासाहेब’ बनले आहे.दरेखुर्द सजामध्ये एकूण सहा गावे येतात. त्यामुळे प्रभारी तलाठी या गावांना सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे महसूल विभागाने नागरिकांची गैरसोय ओळखून कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा.-चंद्रकांत गायकवाड, मोरघर नागरिक