शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

दरेखुर्द सजाला तलाठी नसल्याने सजा

By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST

ग्रामस्थांची परवड : चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच नाही

कुडाळ : जावळी तालुक्यातील दरेखुर्द सजामध्ये दरे खुर्दसह मोरघर, नरफदेव ग्रामपंचायतींचे महसूल कामकाज चालते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दरेखुर्द सजाला गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी तलाठीच तहसील कार्यालयाकडून मिळाला नाही. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील नरफदेवसह मोरघर, दरेखुर्द, जावळेवाडी, मोरवाडी ग्रामस्थांची सात बाऱ्यासह इतर कामकाजासाठी परवड होत आहे. तलाठीच नसल्यामुळे ग्रामस्थांना सजा भोगावी लागत आहे. तरी कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.याबाबत माहिती अशी की, दरेखुर्द सजाअंतर्गत मोरेवाडी, जावळेवाडी, मोरघर, धनगरपेठ, नरफदेव गावे येतात. गेल्या चार वर्षांपासून गावाला कायमस्वरूपी गावकामगार तलाठीच महसूल विभागाने दिलेला नाही. तर आता कुठे तांदळे तलाठी देण्यात आला होता. तो देखील प्रांताधिकारी कार्यालयाकडून भूसंपादन विभागात सातारा कार्यालयात त्यांना ठेवण्यात आले आहे. तर सायगाव गावकामगार तलाठी तोडरमल यांच्याकडे हा सजा जोडला आहे. त्यांच्याच सजामध्ये कामे अधिक असल्यामुळे ते दरेखुर्द सजासाठी वेळच देऊ शकत नाहीत. पर्यायी या सजाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना उतारा कोतवालाकडून करून घ्यावी लागते.मात्र, तलाठी सहीसाठी सायगाव गाठून दफ्तर घेऊन कोतवालादेखील सही आणावी लागत असल्यामुळे उतारा मिळवायला सात-सात दिवस विलंब होत आहे. तलाठी नसल्यामुळे धनगरपेठा, नरफदेव ग्रामस्थांना डोंगर उतरून तलाठीच भेटत नसल्यामुळे त्यांची तर नुसतीच पायपीट होत आहे. अनेकदा दरेखुर्द सजाला कायमस्वरूपी तलाठी मिळावा, अशी तहसीलदारांकडे मागणी करूनही या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे, या सजासाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा, अशी मागणी या सजामधील ग्रामस्थांमधूनच होत आहे. याबाबत प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी संपर्क साधला असता, दरेखुर्द सजासाठी स्वतंत्र गावकामगार तलाठी देण्याची व्यवस्था केली जाईल. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल. (प्रतिनिधी)कोतवाल बनला ‘तलाठी’दरेखुर्द सजाला गावकामगार तलाठी नसल्याने या सजाअंतर्गत येणाऱ्या सहा गावांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तर नरफदेव, धनगरपेठा या डोंगरमाथ्यावरील नागरिकांना तलाठी नसल्याचा मोठा फटका बसत आहे. या सजात काम करणाऱ्या कोतवालावर नागरिकांच्या प्रश्नांना तोंड देण्याची वेळ आली आहे. तर महसुली दफ्तरही सांभाळण्याची जबाबदारी पार पाडत. कोतवालाच ‘अण्णासाहेब’ बनले आहे.दरेखुर्द सजामध्ये एकूण सहा गावे येतात. त्यामुळे प्रभारी तलाठी या गावांना सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे महसूल विभागाने नागरिकांची गैरसोय ओळखून कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा.-चंद्रकांत गायकवाड, मोरघर नागरिक