शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

पोस्टमनमुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

सातारा : साताऱ्यातील नागरिकांना टपाल सेवा व्यवस्थित मिळत नाही. अनेक इमारती चारमजली आहेत. पोस्टमन टपाल पार्किंगमध्ये ठेवून जात असतात. ...

सातारा : साताऱ्यातील नागरिकांना टपाल सेवा व्यवस्थित मिळत नाही. अनेक इमारती चारमजली आहेत. पोस्टमन टपाल पार्किंगमध्ये ठेवून जात असतात. त्यामुळे ते टपाल गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. टपाल वेळेत न मिळाल्याने अनेकदा आर्थिक दंड भरण्याची वेळ सातारकरांवर येत आहे.

000000

वाहनचालकांची चौकशी

सातारा : जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे पोवई नाका, सातारा मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा परिसरात दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सातारकर कशासाठी बाहेर पडत आहेत, याची चौकशी केली जात आहे.

पथदिवे बंदच

सातारा : साताऱ्यातील त्रिशंकू भागात गेल्या काही दिवसांपासून पथदिव्यांचे काम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागात पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.

एटीएममध्ये गैरसोय

सातारा : साताऱ्यातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. कोठेही सॅनिटायझर नसल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. सॅनिटायझरची सोय करण्याची मागणी केली जात आहे.

घंटागाड्या सुरू

सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात पूर्वी घंटागाडी जात नव्हती, त्याठिकाणीही आता पालिकेची घंटागाडी जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना सुविधा मिळत आहे. ही सुविधा कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.

पाणी वाया जाण्याचे सत्र

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या जलवाहिनीला दररोज कोठे ना कोठे गळती लागत असते. त्यामुळे त्या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असून उतारावरुन पाणी लांबपर्यंत वाहत जात असते. त्यामुळे संबंधित ठिकाणची गळती काढण्याची मागणी केली जात आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सातारा : कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकावर बेरोजगारी ओढावली होती. डिसेंबरमध्ये सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे वर्षाअखेरीस तीनचाकी रिक्षा, ट्रॅक्समधून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ग्रामीण भागात एसटीच्या ठरावीक फेऱ्या होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.