शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
3
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
4
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
5
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
6
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
7
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
8
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
9
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
10
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
11
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
12
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
13
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
14
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
15
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
16
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
17
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
18
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
19
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
20
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमनमुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

सातारा : साताऱ्यातील नागरिकांना टपाल सेवा व्यवस्थित मिळत नाही. अनेक इमारती चारमजली आहेत. पोस्टमन टपाल पार्किंगमध्ये ठेवून जात असतात. ...

सातारा : साताऱ्यातील नागरिकांना टपाल सेवा व्यवस्थित मिळत नाही. अनेक इमारती चारमजली आहेत. पोस्टमन टपाल पार्किंगमध्ये ठेवून जात असतात. त्यामुळे ते टपाल गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. टपाल वेळेत न मिळाल्याने अनेकदा आर्थिक दंड भरण्याची वेळ सातारकरांवर येत आहे.

000000

वाहनचालकांची चौकशी

सातारा : जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे पोवई नाका, सातारा मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा परिसरात दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सातारकर कशासाठी बाहेर पडत आहेत, याची चौकशी केली जात आहे.

पथदिवे बंदच

सातारा : साताऱ्यातील त्रिशंकू भागात गेल्या काही दिवसांपासून पथदिव्यांचे काम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागात पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.

एटीएममध्ये गैरसोय

सातारा : साताऱ्यातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. कोठेही सॅनिटायझर नसल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. सॅनिटायझरची सोय करण्याची मागणी केली जात आहे.

घंटागाड्या सुरू

सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात पूर्वी घंटागाडी जात नव्हती, त्याठिकाणीही आता पालिकेची घंटागाडी जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना सुविधा मिळत आहे. ही सुविधा कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.

पाणी वाया जाण्याचे सत्र

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या जलवाहिनीला दररोज कोठे ना कोठे गळती लागत असते. त्यामुळे त्या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असून उतारावरुन पाणी लांबपर्यंत वाहत जात असते. त्यामुळे संबंधित ठिकाणची गळती काढण्याची मागणी केली जात आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सातारा : कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकावर बेरोजगारी ओढावली होती. डिसेंबरमध्ये सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे वर्षाअखेरीस तीनचाकी रिक्षा, ट्रॅक्समधून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ग्रामीण भागात एसटीच्या ठरावीक फेऱ्या होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.