शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पोस्टमनमुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

सातारा : साताऱ्यातील नागरिकांना टपाल सेवा व्यवस्थित मिळत नाही. अनेक इमारती चारमजली आहेत. पोस्टमन टपाल पार्किंगमध्ये ठेवून जात असतात. ...

सातारा : साताऱ्यातील नागरिकांना टपाल सेवा व्यवस्थित मिळत नाही. अनेक इमारती चारमजली आहेत. पोस्टमन टपाल पार्किंगमध्ये ठेवून जात असतात. त्यामुळे ते टपाल गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. टपाल वेळेत न मिळाल्याने अनेकदा आर्थिक दंड भरण्याची वेळ सातारकरांवर येत आहे.

000000

वाहनचालकांची चौकशी

सातारा : जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे पोवई नाका, सातारा मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा परिसरात दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सातारकर कशासाठी बाहेर पडत आहेत, याची चौकशी केली जात आहे.

पथदिवे बंदच

सातारा : साताऱ्यातील त्रिशंकू भागात गेल्या काही दिवसांपासून पथदिव्यांचे काम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागात पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.

एटीएममध्ये गैरसोय

सातारा : साताऱ्यातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. कोठेही सॅनिटायझर नसल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. सॅनिटायझरची सोय करण्याची मागणी केली जात आहे.

घंटागाड्या सुरू

सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात पूर्वी घंटागाडी जात नव्हती, त्याठिकाणीही आता पालिकेची घंटागाडी जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना सुविधा मिळत आहे. ही सुविधा कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.

पाणी वाया जाण्याचे सत्र

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या जलवाहिनीला दररोज कोठे ना कोठे गळती लागत असते. त्यामुळे त्या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असून उतारावरुन पाणी लांबपर्यंत वाहत जात असते. त्यामुळे संबंधित ठिकाणची गळती काढण्याची मागणी केली जात आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

सातारा : कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकावर बेरोजगारी ओढावली होती. डिसेंबरमध्ये सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे वर्षाअखेरीस तीनचाकी रिक्षा, ट्रॅक्समधून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ग्रामीण भागात एसटीच्या ठरावीक फेऱ्या होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.