शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

अटलजींबरोबर बसून जेवणाचा योग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 22:53 IST

सातारा : आपल्या काव्यमधूर बोलण्यातून सोबत येणाऱ्यावर गारुड घालणाºया अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत जवळ बसून भोजन करण्याची संधी जावळी तालुक्यातील आनेवाडी गावचे निवृत्त शिक्षकव भाजपचे त्या काळातील प्रचारक मधू पवार यांना मिळाला होता. ‘सतारा से आए हो तो डट केखाओ,’ असंही अटलजी त्यांना म्हणाले होते.सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा ...

सातारा : आपल्या काव्यमधूर बोलण्यातून सोबत येणाऱ्यावर गारुड घालणाºया अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत जवळ बसून भोजन करण्याची संधी जावळी तालुक्यातील आनेवाडी गावचे निवृत्त शिक्षकव भाजपचे त्या काळातील प्रचारक मधू पवार यांना मिळाला होता. ‘सतारा से आए हो तो डट केखाओ,’ असंही अटलजी त्यांना म्हणाले होते.सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढलेले व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम पाहिलेले आनेवाडी गावचे मधू पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या.तुम्ही भाजपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले आहे. अटलजींसोबतच्या आठवणी काही आहेत का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशमध्ये गेलो होतो. तेव्हा एका कार्यकर्त्याच्या घरी भोजनाची व्यवस्था केली होती. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष असणाºया अटलबिहारी वाजपेयी यांनाही येथे निमंत्रण होते. एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असणाºया या नेत्याचा कुठलाही बडेजाव नव्हता. मोजकेच कार्यकर्ते सोबत असायचे. अटलजी, त्यांच्या कुटुंबातील मोजके दोघे सदस्य आणि मी स्वत: असे चौघेच डायनिंग टेबलावर जेवायला बसलो होतो. अटलजींच्या शेजारच्या खुर्चीवर बसून मी जेवलो. ही आठवण अजूनही ताजी आहे.’दरम्यान, साताºयातील आठवण सांगताना पवार म्हणाले, ‘जनसंघाच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेतील नोकरी सोडून वसंतदादांच्याविरोधात सातारा-सांगली विधानपरिषदेची निवडणूक लढवली. त्यानंतर जिल्हा बँकेत तत्कालीन संचालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात मी राजवाड्यावरील गांधी मैदानावर उपोषणाला बसलो होतो. त्याच कालावधीत अटलजींची मुंबईत सभा सुरू होती. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मी साताºयात उपोषणाला बसलो होतो, त्याची कोणीतरी अटलजींना माहिती दिली.आपल्या भाषणात तेव्हा त्यांनी ‘उधर सतरा में भ्रष्टाचार के खिलाफ हमारा मधू पवार नामका कार्यकर्ता लढ रहा है,’ असा उल्लेख केला होता.वाईत अटलबिहारी वाजपेयी यांची जाहीर सभा झाली होती, तेव्हा सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच कुठल्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवणाºया तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही अटलजींच्या सांगण्यावरून व्यासपीठावर येण्याचे मान्य केले होते, असेही पवार यांनी सांगितले. जगात शांतता राहण्यासाठी राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे, असे प्लुटो म्हणायचा. अटलजींच्या बाबतीत हे तत्त्वज्ञान सार्थठरणारे आहे, असेही पवार यांनी सांगितले.भारत मेरे लिए केवलजमीन का टुकडा नही७० च्या दशकात जनसंघाच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांनी श्री हनुमान जयंतीच्या दिवशी साताºयातील गांधी मैदानावर एक सभा घेतली होती. या सभेच्या शेवटी ‘भारत मेरे लिए केवल जमीन का टुकडा नही ये जिता जागता राष्ट्रपुरुष है....’अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर ते वडूज, वाई, पाचगणी आणि लोणंद येथील कार्यक्रमालाही उपस्थित राहिले होते. तसेच कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली होती.