शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

पाच दिवसांचा आठवडा केला; माणूस हेलपाटे घालून मेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:46 IST

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी ...

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी विविध शासकीय कार्यालयांत येरझाऱ्या मारून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू राहणे गरजेचे आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने नागरिकांची होणारी अडचण व गैरसोय विचारात घेत पुसेगाव येथील युवा नेते राम जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. कामकाजाची निर्धारित वेळ ही ठरवून दिली, त्यानुसार शासकीय कार्यालयात पाच दिवस, दुपारचा भोजनाचा अर्धा तास वगळता साडेसात तास कामकाज होणे अपेक्षित आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत अद्यापही ‘जुन्याच चालीने’ कामकाज होत आहे. सकाळी कामावर येण्याची वेळ अकरानंतर, तर घरी जाण्याची वेळ ४ किंवा ५ वाजताच! असा रिवाजच पडला आहे. त्यातही काहीही कारण सांगून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कमी वेळ उपस्थित राहत आहेत. हजर असलेच तर इकडे-तिकडे फिरत गप्पा-गोष्टीत निव्वळ टाईमपास केला जात आहे. संबंधितांकडून वेळेचे गांभीर्य व शिस्त पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात साहेबच नसल्याने कर्मचाऱ्यांकरवी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ‘उद्या या’ या शब्दाचा सराव होऊ लागला आहे, तर साहेबांकडून ‘कर्मचारी नाही, सांगितलेले कळते का? या उद्या मग बघू’ अशी अपमानास्पद वागणूक गोरगरीब नागरिकांना अनुभवावी लागत आहे.

चौकट..

जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी..

सर्वच शासकीय कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळून नागरिकांच्या प्रश्नांची उकल करावी, ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा, संबंधितांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा आठ दिवसांचा आठवडा करून कामकाज सुरू ठेवावे, असा तक्रार अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाला लवकरच पाठवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.