शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

पाच दिवसांचा आठवडा केला; माणूस हेलपाटे घालून मेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:46 IST

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी ...

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी विविध शासकीय कार्यालयांत येरझाऱ्या मारून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू राहणे गरजेचे आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने नागरिकांची होणारी अडचण व गैरसोय विचारात घेत पुसेगाव येथील युवा नेते राम जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. कामकाजाची निर्धारित वेळ ही ठरवून दिली, त्यानुसार शासकीय कार्यालयात पाच दिवस, दुपारचा भोजनाचा अर्धा तास वगळता साडेसात तास कामकाज होणे अपेक्षित आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत अद्यापही ‘जुन्याच चालीने’ कामकाज होत आहे. सकाळी कामावर येण्याची वेळ अकरानंतर, तर घरी जाण्याची वेळ ४ किंवा ५ वाजताच! असा रिवाजच पडला आहे. त्यातही काहीही कारण सांगून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कमी वेळ उपस्थित राहत आहेत. हजर असलेच तर इकडे-तिकडे फिरत गप्पा-गोष्टीत निव्वळ टाईमपास केला जात आहे. संबंधितांकडून वेळेचे गांभीर्य व शिस्त पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात साहेबच नसल्याने कर्मचाऱ्यांकरवी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ‘उद्या या’ या शब्दाचा सराव होऊ लागला आहे, तर साहेबांकडून ‘कर्मचारी नाही, सांगितलेले कळते का? या उद्या मग बघू’ अशी अपमानास्पद वागणूक गोरगरीब नागरिकांना अनुभवावी लागत आहे.

चौकट..

जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी..

सर्वच शासकीय कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळून नागरिकांच्या प्रश्नांची उकल करावी, ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा, संबंधितांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा आठ दिवसांचा आठवडा करून कामकाज सुरू ठेवावे, असा तक्रार अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाला लवकरच पाठवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.