शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
2
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
4
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
5
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
6
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
7
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
8
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
9
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
10
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
11
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
12
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
13
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
14
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
15
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
16
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
17
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
18
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
19
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
20
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद

पाच दिवसांचा आठवडा केला; माणूस हेलपाटे घालून मेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:46 IST

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी ...

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी विविध शासकीय कार्यालयांत येरझाऱ्या मारून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू राहणे गरजेचे आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने नागरिकांची होणारी अडचण व गैरसोय विचारात घेत पुसेगाव येथील युवा नेते राम जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. कामकाजाची निर्धारित वेळ ही ठरवून दिली, त्यानुसार शासकीय कार्यालयात पाच दिवस, दुपारचा भोजनाचा अर्धा तास वगळता साडेसात तास कामकाज होणे अपेक्षित आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत अद्यापही ‘जुन्याच चालीने’ कामकाज होत आहे. सकाळी कामावर येण्याची वेळ अकरानंतर, तर घरी जाण्याची वेळ ४ किंवा ५ वाजताच! असा रिवाजच पडला आहे. त्यातही काहीही कारण सांगून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कमी वेळ उपस्थित राहत आहेत. हजर असलेच तर इकडे-तिकडे फिरत गप्पा-गोष्टीत निव्वळ टाईमपास केला जात आहे. संबंधितांकडून वेळेचे गांभीर्य व शिस्त पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात साहेबच नसल्याने कर्मचाऱ्यांकरवी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ‘उद्या या’ या शब्दाचा सराव होऊ लागला आहे, तर साहेबांकडून ‘कर्मचारी नाही, सांगितलेले कळते का? या उद्या मग बघू’ अशी अपमानास्पद वागणूक गोरगरीब नागरिकांना अनुभवावी लागत आहे.

चौकट..

जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी..

सर्वच शासकीय कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळून नागरिकांच्या प्रश्नांची उकल करावी, ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा, संबंधितांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा आठ दिवसांचा आठवडा करून कामकाज सुरू ठेवावे, असा तक्रार अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाला लवकरच पाठवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.