शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

पाच दिवसांचा आठवडा केला; माणूस हेलपाटे घालून मेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:46 IST

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी ...

पुसेगाव : ‘सरकारी काम अन् चार महिने थांब’ ही म्हण सर्वपरिचित आहे. पाच दिवसांचा आठवडा झाला तरीही आपल्या कामकाजासाठी विविध शासकीय कार्यालयांत येरझाऱ्या मारून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी सर्व शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. त्यानुसार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत संबंधित शासकीय कार्यालयाचे कामकाज सुरू राहणे गरजेचे आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून निर्धारित वेळेचे बंधन पाळले जात नसल्याने नागरिकांची होणारी अडचण व गैरसोय विचारात घेत पुसेगाव येथील युवा नेते राम जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला. कामकाजाची निर्धारित वेळ ही ठरवून दिली, त्यानुसार शासकीय कार्यालयात पाच दिवस, दुपारचा भोजनाचा अर्धा तास वगळता साडेसात तास कामकाज होणे अपेक्षित आहे.

खटाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांत अद्यापही ‘जुन्याच चालीने’ कामकाज होत आहे. सकाळी कामावर येण्याची वेळ अकरानंतर, तर घरी जाण्याची वेळ ४ किंवा ५ वाजताच! असा रिवाजच पडला आहे. त्यातही काहीही कारण सांगून संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यालयात कमी वेळ उपस्थित राहत आहेत. हजर असलेच तर इकडे-तिकडे फिरत गप्पा-गोष्टीत निव्वळ टाईमपास केला जात आहे. संबंधितांकडून वेळेचे गांभीर्य व शिस्त पालन होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात साहेबच नसल्याने कर्मचाऱ्यांकरवी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना ‘उद्या या’ या शब्दाचा सराव होऊ लागला आहे, तर साहेबांकडून ‘कर्मचारी नाही, सांगितलेले कळते का? या उद्या मग बघू’ अशी अपमानास्पद वागणूक गोरगरीब नागरिकांना अनुभवावी लागत आहे.

चौकट..

जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी..

सर्वच शासकीय कार्यालयांत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळून नागरिकांच्या प्रश्नांची उकल करावी, ठरवून दिलेल्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा, संबंधितांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घ्यावी, अन्यथा आठ दिवसांचा आठवडा करून कामकाज सुरू ठेवावे, असा तक्रार अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाला लवकरच पाठवणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.