शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

बिबट्याच्या भीतीने ‘सातच्या आत घरात’!

By admin | Updated: October 7, 2016 00:10 IST

उरूलमध्ये दहशत : शिवारात जाण्याचीही शेतकऱ्यांना भीती

मल्हारपेठ : गेल्या महिन्यापासून उरूल घाटासह डोंगर भागातील वाड्या-वस्तीवर बिबट्याची दहशत सुरू असून, तांबेवाडी-ठोमसे रस्ता व उरूल घाटात वारंवार दर्शन होत आहे. सुगीचे दिवस सुरू असल्याने शेतात जाण्यास शेतमजूर, शेतकरी, महिला घाबरत आहेत. उरूल भागातील कुत्र्यांची संख्या महिनाभरात घटल्याने रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना कुटुंबांनी नोकरीस असणाऱ्या सदस्यांना दिल्या आहेत. वन विभागास माहिती देऊन ही उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याची तक्रार ग्रामस्थांच्यातून होत आहे.महिन्यापूर्वी उंब्रज-पाटण मार्गावरील उरूल घाटात बिबट्याचे दर्शन झाले. ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांच्या मागे बिबट्या लागत होता. त्या दिवसापासून दोन बिबट्यांचा वावर उरूल, ठोमसे भागातील जुगाई माळ, लाठ्यांचा माळ, मल्हारपेठ जवळील गवळण दरा, देसाई शेत व उरूल घाटात बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे उरूल भागातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत माजली असून, गेल्या महिन्यापासून शेतातही दोघे, तिघेजण जात आहेत. जनावरे उघड्यावर न बांधता शेडात बांधत आहेत. तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या मंडळींना रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात असणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या कमी झाली असून, बिबट्यानेच त्यांचा फडशा पाडला असावा, असा अंदाज ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजता दुचाकीवरून आलेले उरूलचे ग्रामस्थ बापू चव्हाण यांना उरूल घाटात बिबट्या मृत जनावर खात असल्याचे दिसले. त्यानंतर उरूल बस थांब्यावर असणाऱ्या सागर देशमुख, महेश निकम व मनोज चव्हाण यांनीही खात्री केली. बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे भागात पसरत असून, खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कडधान्ये काढण्याची सुगी चालू असल्याने शेतकरी, महिला व शेतमजूर शिवारात जाण्यास भीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागास माहिती देऊनही बघतो, येतो की, लोकांनी काळजी घ्यावी अशी उत्तरे ऐकण्यास मिळत आहेत. पाळीव जनावरे किंंवा एखाद्या मनुष्यावर हल्ला होण्यापूर्वी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उरूल भागातील ठोमसे, पोळाचीवाडी, तांबेवाडी, गणेवाडी, बोडकेवाडी ग्रामस्थांच्यातून होत आहे. (वार्ताहर)दुचाकीस्वारांचा जीव मुठीतकाही दिवसांपूर्वी उरूल घाटात उंब्रज-पाटण मार्गानजीक बिबट्या ठाण मांडून बसला होता. या मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचाही त्याने पाठलाग केला. त्यामुळे त्यावेळी घाटात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजही तेथे हिच परिस्थिती असून, घाटातून मार्गस्थ होताना दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरूनच जावे लागत आहेत.