शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

बिबट्याच्या भीतीने ‘सातच्या आत घरात’!

By admin | Updated: October 7, 2016 00:10 IST

उरूलमध्ये दहशत : शिवारात जाण्याचीही शेतकऱ्यांना भीती

मल्हारपेठ : गेल्या महिन्यापासून उरूल घाटासह डोंगर भागातील वाड्या-वस्तीवर बिबट्याची दहशत सुरू असून, तांबेवाडी-ठोमसे रस्ता व उरूल घाटात वारंवार दर्शन होत आहे. सुगीचे दिवस सुरू असल्याने शेतात जाण्यास शेतमजूर, शेतकरी, महिला घाबरत आहेत. उरूल भागातील कुत्र्यांची संख्या महिनाभरात घटल्याने रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना कुटुंबांनी नोकरीस असणाऱ्या सदस्यांना दिल्या आहेत. वन विभागास माहिती देऊन ही उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याची तक्रार ग्रामस्थांच्यातून होत आहे.महिन्यापूर्वी उंब्रज-पाटण मार्गावरील उरूल घाटात बिबट्याचे दर्शन झाले. ये-जा करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांच्या मागे बिबट्या लागत होता. त्या दिवसापासून दोन बिबट्यांचा वावर उरूल, ठोमसे भागातील जुगाई माळ, लाठ्यांचा माळ, मल्हारपेठ जवळील गवळण दरा, देसाई शेत व उरूल घाटात बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे उरूल भागातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत माजली असून, गेल्या महिन्यापासून शेतातही दोघे, तिघेजण जात आहेत. जनावरे उघड्यावर न बांधता शेडात बांधत आहेत. तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या मंडळींना रात्री सातच्या आत घरात येण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात असणाऱ्या मोकाट कुत्र्यांची संख्या कमी झाली असून, बिबट्यानेच त्यांचा फडशा पाडला असावा, असा अंदाज ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेनऊ वाजता दुचाकीवरून आलेले उरूलचे ग्रामस्थ बापू चव्हाण यांना उरूल घाटात बिबट्या मृत जनावर खात असल्याचे दिसले. त्यानंतर उरूल बस थांब्यावर असणाऱ्या सागर देशमुख, महेश निकम व मनोज चव्हाण यांनीही खात्री केली. बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्याप्रमाणे भागात पसरत असून, खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग व कडधान्ये काढण्याची सुगी चालू असल्याने शेतकरी, महिला व शेतमजूर शिवारात जाण्यास भीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागास माहिती देऊनही बघतो, येतो की, लोकांनी काळजी घ्यावी अशी उत्तरे ऐकण्यास मिळत आहेत. पाळीव जनावरे किंंवा एखाद्या मनुष्यावर हल्ला होण्यापूर्वी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उरूल भागातील ठोमसे, पोळाचीवाडी, तांबेवाडी, गणेवाडी, बोडकेवाडी ग्रामस्थांच्यातून होत आहे. (वार्ताहर)दुचाकीस्वारांचा जीव मुठीतकाही दिवसांपूर्वी उरूल घाटात उंब्रज-पाटण मार्गानजीक बिबट्या ठाण मांडून बसला होता. या मार्गावरून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांचाही त्याने पाठलाग केला. त्यामुळे त्यावेळी घाटात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आजही तेथे हिच परिस्थिती असून, घाटातून मार्गस्थ होताना दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरूनच जावे लागत आहेत.