शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

‘धोम-बलकवडी’ ओव्हरफ्लो!

By admin | Updated: August 3, 2016 00:19 IST

कोयनेत ६८.५१ टीएमसी पाणी : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; अनेक पूल पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

सातारा : मंगळवारपासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला असून, पश्चिम भागासह पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यातही ओढे-नाले तुडुंब वाहू लागले आहेत. अवघ्या चोवीस तासांत तब्बल ७.०८ टीएमसी इतका पाणीसाठा वाढण्याचा विक्रमही यंदाच्या मोसमात कोयना धरणाने केला असून, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणही ओव्हरफ्लो झाले. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून महाबळेश्वर, पाचगणीसह अनेक शहरांचे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत चालला असताना मंगळवारी मध्यरात्रीपासून पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ७.०८ टीएमसीने वाढ झाली. धरणात ६८.५१ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचे आगर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाटण तालुक्यांत तर पावसाने थैमान घातले. महाबळेश्वर येथे मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चोवीस तासांत ३६२ मिलिमीटर, कोयना येथे १७८, तर नवजा येथे १८४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सातारा शहरातही मंगळवारी दिवसभर जलधारांचे बरसणे सुरू होते. पावसाचे पाणी सखल भागात साचल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. सायंकाळनंतर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या कास परिसरातही मंगळवारी दमदार पाऊस झाला. (प्रतिनिधी) धबधबे कोसळू लागले सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडे असलेल्या कोरेगाव, खटाव परिसरातही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. या पावसात यंदा प्रथमच या भागातील धबधबे, ओढे व नाले खळाळून वाहू लागलेत. काही ठिकाणी गटारांतील पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या आगमनाने शेतकरी आनंदीत असले तरी शेती जलमय झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सात हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग धोम-बलकवडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून प्रतिसेकंद सात हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग धोम धरणात सुरू आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद ३१ हजार ४०४, तर कण्हेर धरणात १२ हजार ६९९ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मोरणा, तारळी, केरा तुडुंब पाटण तालुक्यातील मोरणा, तारळी, केरा, काजळी, काफना, वांग या नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे डोंगरकपारीतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडता आले नाही. अनेक ठिकाणी शेतीमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने शेती जलमय झाली. अनेक पूल पाण्याखाली वाई तालुक्यातील कृष्णा नदीची पाणीपातळी वाढल्याने चिंधवली येथील कृष्णा नदीवरील पूल मंगळवारी पाण्याखाली गेला. तसेच पाटण तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पांढरेपाणी, निवी, कसणी या गावांना वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. वीजवाहिन्या तुटल्याने अनेक गावे अंधारात गेली आहेत.