शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी ग्रामस्थ तारळीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण केले. मात्र, यावर्षी मार्च संपला. शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तरीही प्रकल्प कालव्यातून पाणी आले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी आजही तारळीतील पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून तारळी प्रकल्प कालव्याची कामे खटाव तालुक्यातील पूर्व भागातील पळसगाव, धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, मायणी आदी गावांच्या परिसरात अपूर्ण होती. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना मिळत नव्हते. पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत होता. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी अपूर्ण कालव्याच्या कामासाठी स्वखर्चाने सुमारे ऐशी हजारांची रक्कम घालून या कालव्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण केले होते.

त्यावर्षी तारळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाण्याची चाचणी घेण्यासाठी कालव्यामध्ये पाणी सोडले होते तर गतवर्षी धोंडेवाडी व सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी सुमारे पंचेचाळीस हजार रुपये भरून चार दिवसांसाठी पाणी विकत घेतले होते. पाणी विकत घेतल्यामुळे गतवर्षी या परिसरातील शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. त्यामुळे या भागात फारसा दुष्काळ जाणवला नाही व पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला होता. त्यामुळे शासनाला टँकर सुरू करावे लागले नाहीत.

धोंडेवाडी, सूर्याचीवाडी भागांमध्ये पाणी आल्याने हे पाणी पुढे मायणी परिसरात येत असल्याने मायणी परिसरातील शेतकऱ्यांनीही पैसे गोळा करून हे पाणी विकत घेतले होते. त्यामुळे एकंदरीत गतवर्षी थोड्याफार प्रमाणात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. मात्र, यावर्षी मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला तरीही अधिकाऱ्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्च संपून एप्रिल लागला तरीही तारळीचे पाणी शिवारात न आल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकरी आजही या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट...

पाणी शेतीसाठी सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, हे अधिकारी गतवर्षीचे पैसे तुम्ही देणे आहे. ते भरल्याशिवाय पाणी सुटणार नाही, असे सांगत आहेत. मात्र, नेमके किती पैसे भरायचे हे सांगत नाहीत व गतवर्षी पैसे भरल्याची पावतीही अद्याप दिलेली नाही.

- हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी

चौकट-

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे

अनेक ठिकाणी मुख्य कालव्याला जोडणाऱ्या उपपाटांची कामे अपूर्ण आहेत, तरीही या कामाबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तरीही पाणी वाटप समित्या करून पाट हस्तांतराचा घाट घातला जात आहे.

उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे आता खरी पाण्याची गरज आहे व पाणी मिळण्यासाठी शेतकरी पैसे भरायला तयार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

तारळी प्रकल्पातून धोंडेवाडी, सूर्याचीवाडी व मायणी भागाला पाणी देणारा कालवा आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. (छाया : संदीप कुंभार)