शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी ग्रामस्थ तारळीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण केले. मात्र, यावर्षी मार्च संपला. शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तरीही प्रकल्प कालव्यातून पाणी आले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी आजही तारळीतील पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून तारळी प्रकल्प कालव्याची कामे खटाव तालुक्यातील पूर्व भागातील पळसगाव, धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, मायणी आदी गावांच्या परिसरात अपूर्ण होती. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना मिळत नव्हते. पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत होता. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी अपूर्ण कालव्याच्या कामासाठी स्वखर्चाने सुमारे ऐशी हजारांची रक्कम घालून या कालव्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण केले होते.

त्यावर्षी तारळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाण्याची चाचणी घेण्यासाठी कालव्यामध्ये पाणी सोडले होते तर गतवर्षी धोंडेवाडी व सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी सुमारे पंचेचाळीस हजार रुपये भरून चार दिवसांसाठी पाणी विकत घेतले होते. पाणी विकत घेतल्यामुळे गतवर्षी या परिसरातील शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. त्यामुळे या भागात फारसा दुष्काळ जाणवला नाही व पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला होता. त्यामुळे शासनाला टँकर सुरू करावे लागले नाहीत.

धोंडेवाडी, सूर्याचीवाडी भागांमध्ये पाणी आल्याने हे पाणी पुढे मायणी परिसरात येत असल्याने मायणी परिसरातील शेतकऱ्यांनीही पैसे गोळा करून हे पाणी विकत घेतले होते. त्यामुळे एकंदरीत गतवर्षी थोड्याफार प्रमाणात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. मात्र, यावर्षी मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला तरीही अधिकाऱ्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्च संपून एप्रिल लागला तरीही तारळीचे पाणी शिवारात न आल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकरी आजही या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट...

पाणी शेतीसाठी सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, हे अधिकारी गतवर्षीचे पैसे तुम्ही देणे आहे. ते भरल्याशिवाय पाणी सुटणार नाही, असे सांगत आहेत. मात्र, नेमके किती पैसे भरायचे हे सांगत नाहीत व गतवर्षी पैसे भरल्याची पावतीही अद्याप दिलेली नाही.

- हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी

चौकट-

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे

अनेक ठिकाणी मुख्य कालव्याला जोडणाऱ्या उपपाटांची कामे अपूर्ण आहेत, तरीही या कामाबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तरीही पाणी वाटप समित्या करून पाट हस्तांतराचा घाट घातला जात आहे.

उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे आता खरी पाण्याची गरज आहे व पाणी मिळण्यासाठी शेतकरी पैसे भरायला तयार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

तारळी प्रकल्पातून धोंडेवाडी, सूर्याचीवाडी व मायणी भागाला पाणी देणारा कालवा आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. (छाया : संदीप कुंभार)