शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी ग्रामस्थ तारळीच्या पाण्याच्या प्रतीक्षेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : दोन वर्षांपूर्वी मोठा संघर्ष करून मायणीसह धोंडेवाडी, सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी तारळी प्रकल्प कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण केले. मात्र, यावर्षी मार्च संपला. शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तरीही प्रकल्प कालव्यातून पाणी आले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी आजही तारळीतील पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या अनेक दशकांपासून तारळी प्रकल्प कालव्याची कामे खटाव तालुक्यातील पूर्व भागातील पळसगाव, धोंडेवाडी, सूर्याचीवाडी, मायणी आदी गावांच्या परिसरात अपूर्ण होती. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी या भागातील शेतकऱ्यांना मिळत नव्हते. पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत होता. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी दोन वर्षांपूर्वी अपूर्ण कालव्याच्या कामासाठी स्वखर्चाने सुमारे ऐशी हजारांची रक्कम घालून या कालव्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण केले होते.

त्यावर्षी तारळी प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाण्याची चाचणी घेण्यासाठी कालव्यामध्ये पाणी सोडले होते तर गतवर्षी धोंडेवाडी व सूर्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी सुमारे पंचेचाळीस हजार रुपये भरून चार दिवसांसाठी पाणी विकत घेतले होते. पाणी विकत घेतल्यामुळे गतवर्षी या परिसरातील शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. त्यामुळे या भागात फारसा दुष्काळ जाणवला नाही व पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला होता. त्यामुळे शासनाला टँकर सुरू करावे लागले नाहीत.

धोंडेवाडी, सूर्याचीवाडी भागांमध्ये पाणी आल्याने हे पाणी पुढे मायणी परिसरात येत असल्याने मायणी परिसरातील शेतकऱ्यांनीही पैसे गोळा करून हे पाणी विकत घेतले होते. त्यामुळे एकंदरीत गतवर्षी थोड्याफार प्रमाणात पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. मात्र, यावर्षी मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला तरीही अधिकाऱ्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मार्च संपून एप्रिल लागला तरीही तारळीचे पाणी शिवारात न आल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकरी आजही या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट...

पाणी शेतीसाठी सोडण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, हे अधिकारी गतवर्षीचे पैसे तुम्ही देणे आहे. ते भरल्याशिवाय पाणी सुटणार नाही, असे सांगत आहेत. मात्र, नेमके किती पैसे भरायचे हे सांगत नाहीत व गतवर्षी पैसे भरल्याची पावतीही अद्याप दिलेली नाही.

- हणमंत भोसले, उपसरपंच, धोंडेवाडी

चौकट-

अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करणे गरजेचे

अनेक ठिकाणी मुख्य कालव्याला जोडणाऱ्या उपपाटांची कामे अपूर्ण आहेत, तरीही या कामाबाबत अजून कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. तरीही पाणी वाटप समित्या करून पाट हस्तांतराचा घाट घातला जात आहे.

उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे आता खरी पाण्याची गरज आहे व पाणी मिळण्यासाठी शेतकरी पैसे भरायला तयार आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

तारळी प्रकल्पातून धोंडेवाडी, सूर्याचीवाडी व मायणी भागाला पाणी देणारा कालवा आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. (छाया : संदीप कुंभार)