शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

धर्ममार्तंडांनी विवेकानंदांना धर्माच्या वर्तुळात बंदिस्त केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST

सातारा : जात, वर्ग, लिंग, वंश यापलीकडे जाऊन समृध्द आणि प्रबुध्द भारत घडविण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंदांचे होते. यासाठी ‘उठा, ...

सातारा : जात, वर्ग, लिंग, वंश यापलीकडे जाऊन समृध्द आणि प्रबुध्द भारत घडविण्याचे स्वप्न स्वामी विवेकानंदांचे होते. यासाठी ‘उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य झाल्याशिवाय थांबू नका’, अशी आर्त साद ते भारतीय युवकांना घालत होते. न्याय, नीती, समता, बंधुता आणि विज्ञाननिष्ठता ही त्यांची विचारदृष्टी होती; परंतु इथल्या धर्ममार्तंडानी विवेकानंदांना धर्माच्या वर्तुळात बंदिस्त करुन त्यांचे सांस्कृतिक अपहरण केले असे परखड मत साहित्यिक अरुण जावळे यांनी व्यक्त केले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित संत तुकाराम हायस्कूल, कऱ्हाड येथे विवेकानंद जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्यिक अरुण जावळे बोलत होते. यावेळी हायस्कूलचे प्रभारी प्राचार्य पी. ए. कुंभार, श्रीधर सवाखंडे, पी. एम. काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी विवेकानंदांच्या प्रतिमेला साहित्यिक अरुण जावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानशिदोरी या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यादरम्यान काही विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कारही केला गेला.

अरुण जावळे पुढे म्हणाले, विवेकानंद भारतीय युवकांचे आयडॉल आहेत. त्यामुळे तरुणांच्यापुढे खरेखुरे विवेकानंद जाणे गरजेचे आहे. विवेकानंदांनी नवभारताच्या नवनिर्माणासाठी का ध्यास घेतला होता याच्या मुळाशी आणि तळाशी आजच्या तरुणाईने जायला हवे. तसे जर मार्गक्रमण झाले तर निकोप आणि आदर्श भारतीय समाजव्यवस्था निर्माण करणे सहज शक्य होईल.

प्रभारी प्राचार्य पी. ए. कुंभार यांनी विवेकानंदांचा आदर्श घेऊन युवा पिढीने घडले पाहिजे असे सांगत विवेकानंद जयंती सप्ताहापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. श्रुती रघुनाथ म्हेत्रे आणि त्रिवेणी सचिन चव्हाण या विद्यार्थ्यांनी विवेकानंदांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. व्ही. पी. देसाई यांनी सूत्रसंचालन केले. श्रीधर सवाखंडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. एच. पी. कदम यांनी आभार मानले.

फोटो : ०२ अरुण जावळे

कºहाड येथील संत तुकाराम हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात अरूण जावळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा ग्रंथ भेट देण्यात आले.