शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

देऊर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध

By admin | Updated: October 18, 2015 23:34 IST

कोरेगाव तालुका : शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेत्यांचा एकमुखी निर्धार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याला राजकीय दिशा देणाऱ्या देऊरकरांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर १९५२ नंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊर गावचे पालकत्व घेतल्याने गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती गावाअंतर्गत असलेल्या सर्वच राजकीय गटांतील कार्यकर्त्यांना केली होती. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेला सर्वांनीच पाठिंबा देत शनिवारी शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवड बिनविरोध झाली. १९५२ मध्ये देऊर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. १९९५ ते २००० या काळात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर कदम हे गावचे सरपंच तर चेतनसिंग कदम-पाटील हे उपसरपंचपदी कार्यरत होते. या काळात त्यांनी देऊर गावचा विकास गतिमान केला होता. यामुळे २००० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना गावाने पुन्हा बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर आता १५ वर्षांनंतर देऊरची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार दि. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. एकूण ११ जागांसाठी वार्ड क्र. १ मधून संगीता अरुण थोरात, अजित चंद्रसेन कदम, नंदा तानाजी काकडे. वार्ड क्र. मधून प्रदीप महादेव कदम, नंदा गुलाबसिंग कदम, वसंत हणमंत जाधव. वार्ड क्र. ३ मधून बाळासाहेब तानाजी कदम, नीलिमा विजय कदम, शुभांगी उमेश देशमुख. तर वार्ड क्र. ४ मधून राजेंद्र बळीराम कदम, धनश्री अमोल कुंभार या ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. अर्ज भरल्यानंतर देऊर ग्रामस्थांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करीत गावातून गुलाल-फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. यावेळी धनसिंग कदम, किसनराव कदम, अ‍ॅड. संजीव कदम, गुलाबसिंग कदम, हंबीरराव कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)गाव दत्तक...देऊर गावच्या विकासासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी प्रत्येकवर्षी निधी मिळणार आहे. यामुळे प्राधान्याने गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच गावास जोडणारे आसनगाव, बनवडी, बिचुकले, दहिगाव या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे गावाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत आहे.