शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

देऊर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध

By admin | Updated: October 18, 2015 23:34 IST

कोरेगाव तालुका : शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेत्यांचा एकमुखी निर्धार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याला राजकीय दिशा देणाऱ्या देऊरकरांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर १९५२ नंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊर गावचे पालकत्व घेतल्याने गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती गावाअंतर्गत असलेल्या सर्वच राजकीय गटांतील कार्यकर्त्यांना केली होती. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेला सर्वांनीच पाठिंबा देत शनिवारी शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवड बिनविरोध झाली. १९५२ मध्ये देऊर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. १९९५ ते २००० या काळात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर कदम हे गावचे सरपंच तर चेतनसिंग कदम-पाटील हे उपसरपंचपदी कार्यरत होते. या काळात त्यांनी देऊर गावचा विकास गतिमान केला होता. यामुळे २००० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना गावाने पुन्हा बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर आता १५ वर्षांनंतर देऊरची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार दि. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. एकूण ११ जागांसाठी वार्ड क्र. १ मधून संगीता अरुण थोरात, अजित चंद्रसेन कदम, नंदा तानाजी काकडे. वार्ड क्र. मधून प्रदीप महादेव कदम, नंदा गुलाबसिंग कदम, वसंत हणमंत जाधव. वार्ड क्र. ३ मधून बाळासाहेब तानाजी कदम, नीलिमा विजय कदम, शुभांगी उमेश देशमुख. तर वार्ड क्र. ४ मधून राजेंद्र बळीराम कदम, धनश्री अमोल कुंभार या ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. अर्ज भरल्यानंतर देऊर ग्रामस्थांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करीत गावातून गुलाल-फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. यावेळी धनसिंग कदम, किसनराव कदम, अ‍ॅड. संजीव कदम, गुलाबसिंग कदम, हंबीरराव कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)गाव दत्तक...देऊर गावच्या विकासासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी प्रत्येकवर्षी निधी मिळणार आहे. यामुळे प्राधान्याने गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच गावास जोडणारे आसनगाव, बनवडी, बिचुकले, दहिगाव या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे गावाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत आहे.