शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

देऊर ग्रामपंचायत दुसऱ्यांदा बिनविरोध

By admin | Updated: October 18, 2015 23:34 IST

कोरेगाव तालुका : शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेत्यांचा एकमुखी निर्धार

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याला राजकीय दिशा देणाऱ्या देऊरकरांनी गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर १९५२ नंतर दुसऱ्यांदा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देऊर गावचे पालकत्व घेतल्याने गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती गावाअंतर्गत असलेल्या सर्वच राजकीय गटांतील कार्यकर्त्यांना केली होती. त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेला सर्वांनीच पाठिंबा देत शनिवारी शेवटच्या दिवशी ११ जागांसाठी ११ उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवड बिनविरोध झाली. १९५२ मध्ये देऊर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. १९९५ ते २००० या काळात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर कदम हे गावचे सरपंच तर चेतनसिंग कदम-पाटील हे उपसरपंचपदी कार्यरत होते. या काळात त्यांनी देऊर गावचा विकास गतिमान केला होता. यामुळे २००० मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना गावाने पुन्हा बिनविरोध निवडून दिले. त्यानंतर आता १५ वर्षांनंतर देऊरची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार दि. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी होता. एकूण ११ जागांसाठी वार्ड क्र. १ मधून संगीता अरुण थोरात, अजित चंद्रसेन कदम, नंदा तानाजी काकडे. वार्ड क्र. मधून प्रदीप महादेव कदम, नंदा गुलाबसिंग कदम, वसंत हणमंत जाधव. वार्ड क्र. ३ मधून बाळासाहेब तानाजी कदम, नीलिमा विजय कदम, शुभांगी उमेश देशमुख. तर वार्ड क्र. ४ मधून राजेंद्र बळीराम कदम, धनश्री अमोल कुंभार या ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडली. अर्ज भरल्यानंतर देऊर ग्रामस्थांनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करीत गावातून गुलाल-फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली. यावेळी धनसिंग कदम, किसनराव कदम, अ‍ॅड. संजीव कदम, गुलाबसिंग कदम, हंबीरराव कदम आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)गाव दत्तक...देऊर गावच्या विकासासाठी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. या गावाच्या विकासासाठी प्रत्येकवर्षी निधी मिळणार आहे. यामुळे प्राधान्याने गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. तसेच गावास जोडणारे आसनगाव, बनवडी, बिचुकले, दहिगाव या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यामुळे गावाने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत होत आहे.