शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिवगडाच्या विकासास खोडा घालू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

कराड छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून रस्ता करण्यात येत आहे. ...

कराड

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून रस्ता करण्यात येत आहे. यामुळे सदाशिवगडाच्या विकासासह सदाशिवाच्या दर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे गड विभागाच्या विकासास कोणी खोडा घालू नये. विरोध करणाऱ्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यात येईल. मात्र केवळ स्वार्थ जपण्यासाठी विरोध केलाच, तर विरोध मोडून रस्ता करण्यासाठी पाच गावांतील ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा पाच गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे.

किल्ले सदाशिवगडावर होणाऱ्या रस्त्याला विरोध करणाऱ्या वृत्तांना उत्तर देण्यासाठी सोमवारी पाच गावच्यावतीने येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारमाचीच्या सरपंच विद्या घबाडे, उपसरपंच प्रशांत यादव, बाबरमाचीच्या सरपंच सुनीता कदम, उपसरपंच राहुल जांभळे, राजमाचीचे सरपंच शिवाजीराव डुबल, वनवासमाचीचे सरपंच महादेव माने, विरवडे गावचे सह्याद्री कारखान्याचे संचालक रामदास पवार, अधिक सुर्वे. ॲड. चंद्रकांत कदम, प्रल्हादराव डुबल, ॲड..दादासाहेब जाधव, पोलीसपाटील मुकुंदराव कदम, दीपक लिमकर, प्रकाश पवार, एस. के. डुबल, सतीश पवार, जनार्दन डुबल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी ॲड .चंद्रकांत कदम व प्रल्हादराव डुबल म्हणाले, वयोवृद्ध, आजारी, अपंग, अनेक महिला व ज्यांना वेळेअभावी गडावर चालत जाणे शक्य नाही, असे लोक दर्शनापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे गडावर रस्ता करावा, असे पाच गावांच्या ग्रामसभेत ठराव करण्यात आले आहेत. तसेच पाच गावांतील ग्रामपंचायती व सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे गडावर रस्ता व शिवसृष्टी प्रकल्प साकारण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. सदाशिवगडाच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या चार माच्यांनी गडाच्या विकासासाठी आजवर मोठयाप्रमाणात योगदान दिले आहे. चार माच्यांच्या ग्रामपंचायतींनी गडाच्या विकासासाठी नवनवीन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास कुणी खोडा घालू नये.

सदाशिवगड ही चार माच्यांसह परिसरातील गावांची अस्मिता आहे. गडाच्या संरक्षण व संवर्धनासाठी चार माच्या सक्षम आहेत. गडाच्या विकासकामांत आजवर ग्रामस्थांनी कधी विरोध केला नाही. त्यामुळे चार गावचे ग्रामस्थ करीत असलेल्या विकासकामांना कोणी विरोध करून त्यास विध्वंसक स्वरूप देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा विरोध करणाऱ्यांचा विरोध मोडण्यासाठी ग्रामस्थ सक्षम आहेत, असा इशारा प्रकाश पवार यांनी दिला.