शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

डोंगरांना लागलेल्या वणव्यात वनसंपदा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात. हा रानमेवा ...

वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात. हा रानमेवा खाल्ल्याने शरीरात तरतरी येऊन पुन्हा काम करण्यास उत्साह येत असतो. वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले असतानाही यावर्षी कऱ्हाड, उंब्रज, मसूर यासारख्या लहान-मोठ्या बाजारपेठेत तोरणे, धामणे, आवळा, चिंचा, जांभळे हा रानमेव दिसून आलाच नाही. हा रानमेवा व वनसंपदा नष्ट होण्यामागे वणव्याचे कारण आहे. एकंदरीत नेहमीच लागणाऱ्या वणव्यांकडे वन विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. हे वणवे वेळीच रोखले नाहीत, तर भविष्यात पाटण तालुक्यातून रानमेवा नष्ट होईल, अशी भीती आहे.

या वणव्यांमुळे जंगलातील दुर्मिळ औषधी वनस्पतींसह पशु-पक्ष्यांची घरटी व घरट्यांमधील त्यांची अंडी, पिले जळून जात आहेत. त्यामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, वन विभागाकडून जनजागृती करीत असताना, हे वणवे का लागतात, ते रोखण्यासाठी त्यावर अधिक उपाययोजना काय केल्या पाहिजेत याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.

- चौकट

वनऔषधींसह फळझाडांवरही परिणाम

गत दोन ते तीन वर्षांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम डोंगररांगातून मिळणाऱ्या रानमेव्यांच्या झाडांवर झाला आहे. करवंदे, धामणे, तोरणे असा रानमेवा देणारी लहान झाडे वणव्याच्या आगीत जळून खाक होत आहेत. वणव्यांमुळे जांभूळ, चिंच, आवळा, आंबा या मोठ्या झाडांवरही परिणाम होऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या फळांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. तसेच अनेक वनौषधी झाडे या वणव्यांमुळे नष्ट होत आहेत.