शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डोंगरांना लागलेल्या वणव्यात वनसंपदा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST

वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात. हा रानमेवा ...

वसंत ऋतूतल्या कडक उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या घशाला ओलावा म्हणून शहरातील लोक वेगवेगळ्या फळांचा रस घेत असतात. हा रानमेवा खाल्ल्याने शरीरात तरतरी येऊन पुन्हा काम करण्यास उत्साह येत असतो. वसंत ऋतू संपून ग्रीष्म ऋतूचे आगमन झाले असतानाही यावर्षी कऱ्हाड, उंब्रज, मसूर यासारख्या लहान-मोठ्या बाजारपेठेत तोरणे, धामणे, आवळा, चिंचा, जांभळे हा रानमेव दिसून आलाच नाही. हा रानमेवा व वनसंपदा नष्ट होण्यामागे वणव्याचे कारण आहे. एकंदरीत नेहमीच लागणाऱ्या वणव्यांकडे वन विभागाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. हे वणवे वेळीच रोखले नाहीत, तर भविष्यात पाटण तालुक्यातून रानमेवा नष्ट होईल, अशी भीती आहे.

या वणव्यांमुळे जंगलातील दुर्मिळ औषधी वनस्पतींसह पशु-पक्ष्यांची घरटी व घरट्यांमधील त्यांची अंडी, पिले जळून जात आहेत. त्यामुळे पशु-पक्ष्यांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, वन विभागाकडून जनजागृती करीत असताना, हे वणवे का लागतात, ते रोखण्यासाठी त्यावर अधिक उपाययोजना काय केल्या पाहिजेत याबाबत ठोस कारवाई होताना दिसत नाही.

- चौकट

वनऔषधींसह फळझाडांवरही परिणाम

गत दोन ते तीन वर्षांपासून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा परिणाम डोंगररांगातून मिळणाऱ्या रानमेव्यांच्या झाडांवर झाला आहे. करवंदे, धामणे, तोरणे असा रानमेवा देणारी लहान झाडे वणव्याच्या आगीत जळून खाक होत आहेत. वणव्यांमुळे जांभूळ, चिंच, आवळा, आंबा या मोठ्या झाडांवरही परिणाम होऊन त्यांच्यापासून मिळणाऱ्या फळांचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. तसेच अनेक वनौषधी झाडे या वणव्यांमुळे नष्ट होत आहेत.