शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नियती रुसली... पण अन्नपूर्णा हसली--सिने अभिनेत्यांकडूनही कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:13 IST

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : घरातील कर्त्या माणसाच्या निधनानंतर मुलांना कसं वाढवायचं हा प्रश्न होता. एक-दोन जणांना जेवणाचे डबे सुरू केले. हे करत असतानाच सामाजिक कार्यही सुरू होते. अन् त्यातूनच भोजनालयाचा मार्ग सापडला. सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट कलाकरांना डबे बनवून देऊ लागल्या अन् त्यातूनच त्यांच्या घराला आधार मिळाला.ही कहाणी आहे ...

जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : घरातील कर्त्या माणसाच्या निधनानंतर मुलांना कसं वाढवायचं हा प्रश्न होता. एक-दोन जणांना जेवणाचे डबे सुरू केले. हे करत असतानाच सामाजिक कार्यही सुरू होते. अन् त्यातूनच भोजनालयाचा मार्ग सापडला. सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट कलाकरांना डबे बनवून देऊ लागल्या अन् त्यातूनच त्यांच्या घराला आधार मिळाला.

ही कहाणी आहे पसरणी येथील समिंद्रा साहेबराव येवले यांची. पतीचे निधन झाल्यानंतर दोन मुलं, मुलगी यांना घेऊन त्या माहेरी आसगावला आल्या. तेव्हा आसगावने ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. या चळवळीत त्यांनीही योगदान दिले. गावात पाहणीसाठी राज्यभरातून मोठ-मोठी माणसं येत होती.त्यांना गावाची माहिती देणं, त्यांच्या जेवणाची सोय समिंद्रा येवले याच करू लागल्या. गावातील महिलांना व्यासपीठ मिळावे म्हणून येवले यांनी पुढाकार घेऊन दुर्गोत्सव सुरू केला. त्यातून अनेक कार्यक्रम आयोजित करुन महिलांना व्यासपीठ उपलब्ध केले.

दरम्यानच्या काळात ‘बाबा लगीन’चं चित्रीकरण आसगावमध्ये चार महिने चालले. त्यातील तीनशेहून अधिक कलाकारांना जेवण बनविण्याचे काम त्यांना मिळाले. अशोक सराफ, मंगेश देसाई, सुरेखा कुडची, किशोरी आंबी, किशोर गोडबोले ही दिग्गज मंडळी त्यांच्याकडे जेवायला येत. येवले यांच्या हाताला चव असल्याचे कलाकारांनी अनेकदा कौतुक केले. त्यानंतरही त्यांनी एका चित्रपटातील कलाकारांसाठी जेवण बनवून दिले.

समिंद्रा येवले यांनी पुढे गाव सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी साताºयात येऊन जिल्हा परिषदेच्या पाठीमागे एक भोजनालय सुरू केले. त्यामध्ये त्या व मुलगा सागर काबाड कष्ट करतात. हाच व्यवसाय वाढविण्याचा त्यांचा मानस असून घरोघरी डबे, पोळी-भाजी पोहोच करणे, छोट्या भोजनालयाचे मोठ्या व्यवसायात रुपांतर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे पाचला होते. नास्ट्याची तयारी केली जाते. सकाळी सातपासून साडेनऊपर्यंत नास्टा त्यानंतर लगेच जेवणाची तयारी सुरू होते. तेथे दिवसाला शंभरहून अधिक लोक जेवणासाठी येतात. त्यामुळे भाज्या करणे, चपात्या बनविणे सर्वप्रकारची कामे ते स्वत: करतात. ग्राहकांच्या आवडीनुसार जेवण बनविण्यावर त्यांचा भर असतो.

 

समाजाशी झगडत, संकटाचा मुकाबला करत समिंद्रा येवले यांनी भोजनालयाच्या माध्यमातून संसार उभारला. त्यांचा एक मुलगा परदेशी असून, त्यांनी मुलीचंही लग्न लावून दिलं. पती निधनानंतर खचून न जाता जिद्दीनं उभं राहिलेल्या समिंद्रा येवले यांची कहाणी आजच्या महिलांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे.आसगावमध्ये असताना घर सांभाळत असतानाच सामाजिक कार्यही करत होते. वैभवलक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अनेक उपक्रम राबवत असत. महिलांसाठी दुर्गोत्सव सुरू केला. या कामाचं आजही गावामध्ये आठवण काढली जाते.- समिंद्रा येवले, सातारा